HomeArchiveम्हाडाचे ८०० कोटी...

म्हाडाचे ८०० कोटी ३ महिन्यांत मिळणार – मधु चव्हाण

Details
म्हाडाचे ८०० कोटी ३ महिन्यांत मिळणार – मधु चव्हाण

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्य सरकारने नुकतीच २६ हजार कोटी रूपयांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नव्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वेची जमीन तत्काळ खरेदी करण्यासाठी सरकारने म्हाडाकडून ८०० कोटींची मागणी केली आहे. सरकार हा निधी तीन महिन्यांत व्याजासह परत करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.

म्हाडाकडे केलेल्या निधीच्या मागणीला कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला होता. म्हाडाकडे निधीच नसताना पैशांची मागणी करणे अयोग्य असल्याचे सांगत म्हाडातील या कर्मचारी संघटनांनी निधी देण्यास विरोध दर्शविला. मात्र सभापती मधु चव्हाण यांनी त्यांच्या दालनात म्हाडा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून राज्य सरकारला म्हाडाचे ८०० कोटी दिल्याने म्हाडा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर काहीच परिणाम होणार नाही असे स्पष्ट सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८०० कोटी व्याजासहित परत देण्याची हमी दिली असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांच्या वेतानासाठी २५ कोटी लागतात आणि म्हाडा वेतन देण्यास समर्थ आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन प्रत्यनशील असून त्यासाठी रेल्वेची जमीन घेण्यासाठी शासनाने म्हाडाकडून ८०० कोटींचा निधी मागितला आहे. हा निधी तीन महिन्यात व्याजासह म्हाडाला परत मिळणार आहे. तसेच शासनाने यापूर्वी म्हाडाकडून विविध प्रकल्पांसाठी घेतलेला निधीही गृहनिर्माण योजनांसाठीच वापरण्यात येणार आहे. म्हाडाकडे गृहनिर्माण प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेला निधी लगेचच खर्च होणार नसल्यामुळे म्हाडाची वेगवेगळ्या बँकेत असलेली अनामत रक्कम मोडण्यात येणार असून त्यासाठी बँका तयार असल्याचे ते म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्य सरकारने नुकतीच २६ हजार कोटी रूपयांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नव्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वेची जमीन तत्काळ खरेदी करण्यासाठी सरकारने म्हाडाकडून ८०० कोटींची मागणी केली आहे. सरकार हा निधी तीन महिन्यांत व्याजासह परत करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.

म्हाडाकडे केलेल्या निधीच्या मागणीला कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला होता. म्हाडाकडे निधीच नसताना पैशांची मागणी करणे अयोग्य असल्याचे सांगत म्हाडातील या कर्मचारी संघटनांनी निधी देण्यास विरोध दर्शविला. मात्र सभापती मधु चव्हाण यांनी त्यांच्या दालनात म्हाडा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून राज्य सरकारला म्हाडाचे ८०० कोटी दिल्याने म्हाडा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर काहीच परिणाम होणार नाही असे स्पष्ट सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८०० कोटी व्याजासहित परत देण्याची हमी दिली असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांच्या वेतानासाठी २५ कोटी लागतात आणि म्हाडा वेतन देण्यास समर्थ आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन प्रत्यनशील असून त्यासाठी रेल्वेची जमीन घेण्यासाठी शासनाने म्हाडाकडून ८०० कोटींचा निधी मागितला आहे. हा निधी तीन महिन्यात व्याजासह म्हाडाला परत मिळणार आहे. तसेच शासनाने यापूर्वी म्हाडाकडून विविध प्रकल्पांसाठी घेतलेला निधीही गृहनिर्माण योजनांसाठीच वापरण्यात येणार आहे. म्हाडाकडे गृहनिर्माण प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेला निधी लगेचच खर्च होणार नसल्यामुळे म्हाडाची वेगवेगळ्या बँकेत असलेली अनामत रक्कम मोडण्यात येणार असून त्यासाठी बँका तयार असल्याचे ते म्हणाले.”

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content