HomeArchiveमहिंद्रा कंपनीमधून जाणारा...

महिंद्रा कंपनीमधून जाणारा डीपी रोड ६ महिन्यांत!

Details
महिंद्रा कंपनीमधून जाणारा डीपी रोड ६ महिन्यांत!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

आमदार अतुल भातखळकरांच्या पाठपुराव्याला यश
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईत कांदिवली पूर्व लोखंडवाला येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमधून जाणारा समता नगरकडील डीपी रोड येत्या ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतेच कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या मागणीच्या संदर्भात बोलताना दिले.

 

लोखंडवाला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमधून जाणारा समता नगरकडील डीपी रोड तातडीने पूर्णकरण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत अशी आग्रही मागणी भातखळकर यांनी केली होती. म्हाडा मुख्यालय, वांद्रे येथे गृहनिर्माण मंत्री विखे-पाटील यांनी मुंबईतील विशेषतः मुंबई उपनगरातील सर्व आमदारांबरोबर बैठक बोलावली होती. या बैठकीत कांदिवली पूर्व मतदारसंघातील म्हाडाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आमदार भातखळकर यांनी उपस्थित केले होते. या प्रश्नांचे निराकरण करून समस्यांसंदर्भात काही महत्त्वाचे आदेश यावेळी देण्यात आले. समता नगर विभागातील डीपी रोड पूर्ण करण्याबरोबरच कांदिवली पूर्व विधानसभेतील म्हाडाच्या काही भूखंडांवर झालेले अतिक्रमण तातडीने दूर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. कांदिवली पूर्व येथील अतिक्रमण झालेल्या भूखंडांवरवरील अतिक्रमण हटवून याठिकाणी निवासी घरे बांधण्यासपरवानगी द्यावी अशी मागणी भातखळकरांनी केली होती. त्याचबरोबर हनुमान नगर विभागातील एसआरए अंतर्गत येणाऱ्या काही सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सर्व्हे तसेच पात्र, अपात्रचे निर्णय, अपूर्ण राहिलेले आहेत. हे प्रलंबित प्रश्नही तातडीने मार्गी लावण्याचे आदेश आदेश विखे-पाटील यांनी या बैठकीत दिल्याची माहिती भातखळकर यांनी दिली.”
 
“आमदार अतुल भातखळकरांच्या पाठपुराव्याला यश
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईत कांदिवली पूर्व लोखंडवाला येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमधून जाणारा समता नगरकडील डीपी रोड येत्या ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतेच कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या मागणीच्या संदर्भात बोलताना दिले.

 

लोखंडवाला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमधून जाणारा समता नगरकडील डीपी रोड तातडीने पूर्णकरण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत अशी आग्रही मागणी भातखळकर यांनी केली होती. म्हाडा मुख्यालय, वांद्रे येथे गृहनिर्माण मंत्री विखे-पाटील यांनी मुंबईतील विशेषतः मुंबई उपनगरातील सर्व आमदारांबरोबर बैठक बोलावली होती. या बैठकीत कांदिवली पूर्व मतदारसंघातील म्हाडाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आमदार भातखळकर यांनी उपस्थित केले होते. या प्रश्नांचे निराकरण करून समस्यांसंदर्भात काही महत्त्वाचे आदेश यावेळी देण्यात आले. समता नगर विभागातील डीपी रोड पूर्ण करण्याबरोबरच कांदिवली पूर्व विधानसभेतील म्हाडाच्या काही भूखंडांवर झालेले अतिक्रमण तातडीने दूर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. कांदिवली पूर्व येथील अतिक्रमण झालेल्या भूखंडांवरवरील अतिक्रमण हटवून याठिकाणी निवासी घरे बांधण्यासपरवानगी द्यावी अशी मागणी भातखळकरांनी केली होती. त्याचबरोबर हनुमान नगर विभागातील एसआरए अंतर्गत येणाऱ्या काही सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सर्व्हे तसेच पात्र, अपात्रचे निर्णय, अपूर्ण राहिलेले आहेत. हे प्रलंबित प्रश्नही तातडीने मार्गी लावण्याचे आदेश आदेश विखे-पाटील यांनी या बैठकीत दिल्याची माहिती भातखळकर यांनी दिली.”
 

Continue reading

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...

साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे उद्यापासून!!

पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे...
Skip to content