HomeArchiveजोगेश्वरीच्या मेघवाडीत धारावीसारखा...

जोगेश्वरीच्या मेघवाडीत धारावीसारखा प्रकल्प राबवा – बाळा नर

Details
जोगेश्वरीच्या मेघवाडीत धारावीसारखा प्रकल्प राबवा – बाळा नर

    12-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडीत गेल्या ४ सप्टेंबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसात येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाला सदर परिस्थिती वारंवार निदर्शनास आणून अजूनही याबाबत कारवाई होत नाही. जर येथे मोठी जीवित व वित्तीय हानी झाल्यास त्याची जबाबदारी शासन व पालिका घेणार का, शासनाच्या झोपडपट्टी निर्मूलनाचा उद्देश कसा साध्य होणार, असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी केला आहे.
 
 
मौजे मजास येथे न.भू. क्रमांक ८१ ते १३२ या विभागात समाविष्ट भूभागांचे मापन करून येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याची येथील नागरिकांची आग्रही मागणी असून गेली अनेक वर्षे आपण यासाठी पाठपुरावा व पत्रव्यवहार केला आहे. मात्र शासन व पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला.
 
 
सदर भाग हा संपूर्ण आरक्षित व भारग्रस्त असून येथे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची नियमाप्रमाणे कार्यान्वित करणे अशक्य आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून सदर योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जोगेश्वरीच्या मेघवाडीचा भूखंड संपादीत करून येथे धारावीसारखा महत्त्वाकांक्षी पायलट झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवावा अशी आग्रही मागणी एसआरएचे सीईओ दीपक कपूर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे येथील आरक्षित भूखंडाचा विकास होऊन नागरिकांना सार्वजनिक सुविधादेखील मिळतील आणि येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना हक्काची घरे मिळतील असा विश्वास नर यांनी व्यक्त केला.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
“मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडीत गेल्या ४ सप्टेंबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसात येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाला सदर परिस्थिती वारंवार निदर्शनास आणून अजूनही याबाबत कारवाई होत नाही. जर येथे मोठी जीवित व वित्तीय हानी झाल्यास त्याची जबाबदारी शासन व पालिका घेणार का, शासनाच्या झोपडपट्टी निर्मूलनाचा उद्देश कसा साध्य होणार, असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी केला आहे.”
 
 
“मौजे मजास येथे न.भू. क्रमांक ८१ ते १३२ या विभागात समाविष्ट भूभागांचे मापन करून येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याची येथील नागरिकांची आग्रही मागणी असून गेली अनेक वर्षे आपण यासाठी पाठपुरावा व पत्रव्यवहार केला आहे. मात्र शासन व पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला.”
 
 
सदर भाग हा संपूर्ण आरक्षित व भारग्रस्त असून येथे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची नियमाप्रमाणे कार्यान्वित करणे अशक्य आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून सदर योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जोगेश्वरीच्या मेघवाडीचा भूखंड संपादीत करून येथे धारावीसारखा महत्त्वाकांक्षी पायलट झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवावा अशी आग्रही मागणी एसआरएचे सीईओ दीपक कपूर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे येथील आरक्षित भूखंडाचा विकास होऊन नागरिकांना सार्वजनिक सुविधादेखील मिळतील आणि येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना हक्काची घरे मिळतील असा विश्वास नर यांनी व्यक्त केला.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content