HomeArchiveविवाहित असूनही बजरंगबली...

विवाहित असूनही बजरंगबली ब्रह्मचारी!

Details
विवाहित असूनही बजरंगबली ब्रह्मचारी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
मुस्लिम आक्रमणापसून नंतर पुढे इंग्रज राजवट नि स्वातंत्र्याच्या १५-२० वर्षांनंतर हिंदुत्वाच्या नावे ओळखला जाणारा हा देश निधर्मी, धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखला जाईल अशी रचना राज्यकर्त्यांनी केली. मात्र, येथील देव-देवतांची छाप कोणी पुसू शकत नाही. शंकर, विष्णू, गणपती, अशा मुख्य देवतांसह त्यांचे भक्त, दासही इथे देवत्व मिरवतात. त्याचं उदाहरण म्हणजे बजरंगबली हनुमान! रामायण, महाभारत, गीता, या देशाचे धर्मग्रंथ. यातील व्यक्तिरेखा, पूजनीय देवत्व बहाल झालेल्या, त्यांच्या अचाट कामगिरीमुळे. असो, प्रभू श्रीरामाचा दास महाबली हनुमान देशातील पहिलवान, बल उपासकांचा देव. चैत्र शुद्ध पौर्णिमा ही त्याची जन्मतिथी. अनेक संकटात तारण करणारा म्हणूनही प्रसिद्ध. हनुमान चालीसा स्तोत्र श्रद्धेने म्हणणारे बहुसंख्य आहेत. त्याविषयी जाणून घेऊया.

भगवान शंकराचा अवतार म्हणून फार कमी लोकांना हनुमान ज्ञात असतील. आपल्या आईला शापातून मुक्त करण्यासाठी त्यांचा जन्म झाल्याचं सांगण्यात येतं. सीतामाई प्रभू रामांच्या दीर्घायुष्यासाठी भांगात सिंदूर लावते हे पाहून स्वतःचे शरीर शेंदरात त्यांनी रंगवून घेतलं. तेव्हापासून बजरंगबलीला शेंदूर लावण्याची प्रथा आली, अशी आख्यायिका आहे. हनुवटीच्या आकारामुळे हनुमान हे नाव आलं. संस्कृतमध्ये हनुमान म्हणजे वाकडी हनुवटी असं सांगतात. पृथ्वीवरच्या काही चिरंजीवींपैकी हनुमान एक. रामचंद्रांचे गुरू विश्वामित्र एकदा काही कारणाने कृद्ध झाले. त्यांनी हनुमानाचा वध करण्याची आज्ञा श्रीरामांना केली गुरू आज्ञा टाळता येईना. त्यामुळे रामानी तसं केलं, पण बुद्धिमत्ता असलेल्या हनुमानांनी रामनामाचा धावा सुरू केला. त्यामुळे झालं असं, रामाची सारी शस्त्र बोथट होऊन हनुमान तरले.

 

वाल्मिकीआधीच..

असं सांगितलं जातं की रामायण हे वाल्मिकींनी लिहिण्याआधी हिमालयात जाऊन हनुमानांनी ते लिहिलं होतं. लंकाकांड सुरू होताच आपल्या नखांनी रामायण लिहिण्यास घेतल्याची खातरजमा वाल्मिकींनी करून घेतली. रामभक्त हनुमानाचे भाऊ म्हणून भीमाचे नातं महित नसेल कारण पवनपुत्रचे चिरंजीव भीम आहे. श्रीराम निधनानंतर शोक असह्य होऊन पृथ्वीवर हनुमानांनी उत्पात माजवू नये म्हणून ब्रह्मदेवाच्या मदतीने या दासाला शांत करण्यासाठी रामाने पाताळलोकात धाडून दिल्याचं म्हंटलं जातं. आपल्या नवऱ्यावरची इतकी भक्ती, प्रेम पाहून खुश झालेल्या सीतामाईने हनुमानास एक किंमती हार भेट द्यायचे ठरवले. पण, तो घेतला जात नाही हे पाहून माईला प्रचंड राग आला. त्यावेळी तो शांत करण्यासाठी हनुमानजीनी आपली छाती फाडून प्रभू रामचंद्र दाखवून त्यांचा राग संपवला. याशिवाय फार किंमती असं जीवनात काही नाही असा संदेश दिला. हनुमंताची १०८ नावं ही त्यांच्या जीवनअध्यायाच सार असल्याचं सांगितलं जातं. ती घेऊनही रामाच्याजवळ मनुष्य जाऊ शकतो.

विवाहित हनुमान..

ब्रह्मचारी म्हणून हनुमंताची ओळख असली तरी पुराणांत मकरध्वज नावाच्या पुत्राचे ते पिता असल्याचा उल्लेख आहे. ती कथा अशी, ज्यावेळी हनुमंत समुद्र पार करीत होते, तेव्हा शरीरातून वाहणाऱ्या घामाचे थेंब एका मगरीने गिळले. यातून ती गर्भवती राहिली. यामुळे मकरध्वजचा जन्म झाला. ब्रह्मचारी असलेले हनुमंत विवाहित होते नि तरीही ओळख ब्रह्मचारी राहिली. हा आजच्या काळातील शासकीय तांत्रिक बाबीची पूर्तता करण्यासारखा विवाह होता. तेलंगणाच्या खम्माम जिल्ह्यात पत्नी सुर्वाचलासह हनुमंताची पूजा होते. ज्येष्ठ शुद्ध दशमीला विवाह वर्धापनदिन लोक धुमधडाक्यात साजरा करतात. मंदिरात त्यांच्या मूर्तीची पूजा होते.

या विवाहमागे कारण असे सांगितले जाते, भगवान सूर्याचे चेले मानले जाणारे हनुमान सूर्याकडील नऊ विद्या मिळवत असता राहिलेल्या चार विद्यांसाठी विवाहाची अट होती. त्याच्या निवारणार्थ सूर्यदेवानी हनुमानाची परवानगी मागितली. ती मिळताच त्यांनी आपल्या तेजाने मुलगी जन्माला घातली. तिचे नाव सुर्वाचला ठेवून तिच्याशी लग्न लावून दिले. तिचा जन्म योनीशिवाय झाल्याने लग्न करूनही हनुमंतजींच्या ब्रह्मचर्यात बाधा आली नाही, असे सांगतात. विद्यमान काळात प्रभू श्रीरामाचे मंदिर अयोध्येत जन्मस्थळी कधी होईल ते होईल पण बजरंगबलीची मंदिरे बरीच आहेत. अगदी विदेशातही मंदिरं आहेत. खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हनुमानभक्त आहेत. नाशिकच्या एका पाच-सहा वर्षीय मुलाला हनुमान मूर्ती संग्रहाचं वेड आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. तेव्हा ती पूजाअर्चा करा, जय बजरंगबली, तोड दुश्मन की नली, असे म्हणत मतदान अवश्य करा.”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
मुस्लिम आक्रमणापसून नंतर पुढे इंग्रज राजवट नि स्वातंत्र्याच्या १५-२० वर्षांनंतर हिंदुत्वाच्या नावे ओळखला जाणारा हा देश निधर्मी, धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखला जाईल अशी रचना राज्यकर्त्यांनी केली. मात्र, येथील देव-देवतांची छाप कोणी पुसू शकत नाही. शंकर, विष्णू, गणपती, अशा मुख्य देवतांसह त्यांचे भक्त, दासही इथे देवत्व मिरवतात. त्याचं उदाहरण म्हणजे बजरंगबली हनुमान! रामायण, महाभारत, गीता, या देशाचे धर्मग्रंथ. यातील व्यक्तिरेखा, पूजनीय देवत्व बहाल झालेल्या, त्यांच्या अचाट कामगिरीमुळे. असो, प्रभू श्रीरामाचा दास महाबली हनुमान देशातील पहिलवान, बल उपासकांचा देव. चैत्र शुद्ध पौर्णिमा ही त्याची जन्मतिथी. अनेक संकटात तारण करणारा म्हणूनही प्रसिद्ध. हनुमान चालीसा स्तोत्र श्रद्धेने म्हणणारे बहुसंख्य आहेत. त्याविषयी जाणून घेऊया.

भगवान शंकराचा अवतार म्हणून फार कमी लोकांना हनुमान ज्ञात असतील. आपल्या आईला शापातून मुक्त करण्यासाठी त्यांचा जन्म झाल्याचं सांगण्यात येतं. सीतामाई प्रभू रामांच्या दीर्घायुष्यासाठी भांगात सिंदूर लावते हे पाहून स्वतःचे शरीर शेंदरात त्यांनी रंगवून घेतलं. तेव्हापासून बजरंगबलीला शेंदूर लावण्याची प्रथा आली, अशी आख्यायिका आहे. हनुवटीच्या आकारामुळे हनुमान हे नाव आलं. संस्कृतमध्ये हनुमान म्हणजे वाकडी हनुवटी असं सांगतात. पृथ्वीवरच्या काही चिरंजीवींपैकी हनुमान एक. रामचंद्रांचे गुरू विश्वामित्र एकदा काही कारणाने कृद्ध झाले. त्यांनी हनुमानाचा वध करण्याची आज्ञा श्रीरामांना केली गुरू आज्ञा टाळता येईना. त्यामुळे रामानी तसं केलं, पण बुद्धिमत्ता असलेल्या हनुमानांनी रामनामाचा धावा सुरू केला. त्यामुळे झालं असं, रामाची सारी शस्त्र बोथट होऊन हनुमान तरले.

 

वाल्मिकीआधीच..

असं सांगितलं जातं की रामायण हे वाल्मिकींनी लिहिण्याआधी हिमालयात जाऊन हनुमानांनी ते लिहिलं होतं. लंकाकांड सुरू होताच आपल्या नखांनी रामायण लिहिण्यास घेतल्याची खातरजमा वाल्मिकींनी करून घेतली. रामभक्त हनुमानाचे भाऊ म्हणून भीमाचे नातं महित नसेल कारण पवनपुत्रचे चिरंजीव भीम आहे. श्रीराम निधनानंतर शोक असह्य होऊन पृथ्वीवर हनुमानांनी उत्पात माजवू नये म्हणून ब्रह्मदेवाच्या मदतीने या दासाला शांत करण्यासाठी रामाने पाताळलोकात धाडून दिल्याचं म्हंटलं जातं. आपल्या नवऱ्यावरची इतकी भक्ती, प्रेम पाहून खुश झालेल्या सीतामाईने हनुमानास एक किंमती हार भेट द्यायचे ठरवले. पण, तो घेतला जात नाही हे पाहून माईला प्रचंड राग आला. त्यावेळी तो शांत करण्यासाठी हनुमानजीनी आपली छाती फाडून प्रभू रामचंद्र दाखवून त्यांचा राग संपवला. याशिवाय फार किंमती असं जीवनात काही नाही असा संदेश दिला. हनुमंताची १०८ नावं ही त्यांच्या जीवनअध्यायाच सार असल्याचं सांगितलं जातं. ती घेऊनही रामाच्याजवळ मनुष्य जाऊ शकतो.

विवाहित हनुमान..

ब्रह्मचारी म्हणून हनुमंताची ओळख असली तरी पुराणांत मकरध्वज नावाच्या पुत्राचे ते पिता असल्याचा उल्लेख आहे. ती कथा अशी, ज्यावेळी हनुमंत समुद्र पार करीत होते, तेव्हा शरीरातून वाहणाऱ्या घामाचे थेंब एका मगरीने गिळले. यातून ती गर्भवती राहिली. यामुळे मकरध्वजचा जन्म झाला. ब्रह्मचारी असलेले हनुमंत विवाहित होते नि तरीही ओळख ब्रह्मचारी राहिली. हा आजच्या काळातील शासकीय तांत्रिक बाबीची पूर्तता करण्यासारखा विवाह होता. तेलंगणाच्या खम्माम जिल्ह्यात पत्नी सुर्वाचलासह हनुमंताची पूजा होते. ज्येष्ठ शुद्ध दशमीला विवाह वर्धापनदिन लोक धुमधडाक्यात साजरा करतात. मंदिरात त्यांच्या मूर्तीची पूजा होते.

या विवाहमागे कारण असे सांगितले जाते, भगवान सूर्याचे चेले मानले जाणारे हनुमान सूर्याकडील नऊ विद्या मिळवत असता राहिलेल्या चार विद्यांसाठी विवाहाची अट होती. त्याच्या निवारणार्थ सूर्यदेवानी हनुमानाची परवानगी मागितली. ती मिळताच त्यांनी आपल्या तेजाने मुलगी जन्माला घातली. तिचे नाव सुर्वाचला ठेवून तिच्याशी लग्न लावून दिले. तिचा जन्म योनीशिवाय झाल्याने लग्न करूनही हनुमंतजींच्या ब्रह्मचर्यात बाधा आली नाही, असे सांगतात. विद्यमान काळात प्रभू श्रीरामाचे मंदिर अयोध्येत जन्मस्थळी कधी होईल ते होईल पण बजरंगबलीची मंदिरे बरीच आहेत. अगदी विदेशातही मंदिरं आहेत. खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हनुमानभक्त आहेत. नाशिकच्या एका पाच-सहा वर्षीय मुलाला हनुमान मूर्ती संग्रहाचं वेड आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. तेव्हा ती पूजाअर्चा करा, जय बजरंगबली, तोड दुश्मन की नली, असे म्हणत मतदान अवश्य करा.”
 

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content