Homeपब्लिक फिगरमुख्यमंत्री कधी अयोध्येत,...

मुख्यमंत्री कधी अयोध्येत, कधी पांडुरंगापुढे, भक्तांचे मात्र वावडे!

मदिरेच्या सापडलेल्या बाटल्या मंत्रालयात टनावर गोळा होतात. हृदयसम्राटांनी आणि प्रबोधनकारांनी अंधश्रद्धेवर आघात करून मराठी मुलखाला श्रद्धेचा देव सांगितला होता. आज राज्याचे मुख्यमंत्री आयोध्येला जातात. पांडुरंगाच्या दर्शनाला येतात आणि भक्तांना मात्र सरकारी आदेशाने देवाच्या दर्शनाला बंदी घालतात. हा अन्याय, ही मुस्कटदाबी पांडुरंगाचे वारकरी आणि रामाचे भक्त कदापी सहन करणार नाही, असा इशारा राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी आज दिला.

सरकारने पाच महिने मंदिरे बंद ठेवून हिंदूंच्या भावना दुखावणारा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारने गेली पाच महिने सरकारी आदेशाने मंदिरे बंद ठेवली आहेत. मंदिरे बंद ठेवून मदिरा खुली करण्याचे महसुली कारस्थान आघाडी सरकारने केले आहे. त्यामुळे मंदिरावर उपजीविका अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे बुद्ध विहार असो अगर पांडुरंगाचे मंदिर असो, अशी श्रद्धास्थाने बंद असल्यामुळे सामान्य भक्ताच्या उपजीविकेची साधनेच या सरकारने बंदिस्त करून ठेवली आहेत. त्यामुळे श्रद्धाळू गरीब लोकांची उपासमार होत आहे, असे ते म्हणाले.

राज्य सरकार अशा गरीब लोकांना काहीतरी मदत करेल असे वाटले होते. देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरू झाली आहेत. येथे मोर्चा, बैठका, लग्नसोहळे, बारशाचे कार्यक्रम मात्र धुमधड्यात, दिमाखात चालू असून देवधर्मावर सातत्याने अन्याय करणारे देवीदेवतांना बंदिस्त करून श्रद्धाळू भक्तांची उपासमार करत आहे. आघाडी सरकारने तत्काळ मंदिरे उघडावीत. तुळजापूर, गांणगापूर, सिद्धेश्‍वर, रूपाभवानी ही भक्तांची श्रद्धास्थाने वारकऱ्यांचा पांडुरंग तत्काळ देवदेवतांचा दरवाजा उघडावा. श्रावणाच्या पवित्र मुहुर्तावर भाजपाच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे आज शंखनादाच्या राज्यव्यापी आंदोलन जाहीर केले आहे. संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केलेले आवाहन योग्य असून आंदोलनाला भारतीय जनता पार्टीने पाठींबा दिला आहे. परिसरातील प्रमुख मंदिरे, धार्मिक स्थळांसमोर टाळ, घंटा व शंख वाजवून नारा देत आंदोलन करावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलेच आहे. त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही ढोबळे यांनी केले आहे.

कंस मामाचा कर्दनकाळ अर्थात कृष्ण जन्माच्या भीतीने कंस मामाने वसुदेव देवकीला बंदिस्त केले होते. परंतु विधीलिखीत घडणारा प्रसंग राज्यालाही टाळता आला नव्हता. आज केवळ गोळा होणाऱ्या महसुलाच्या मोहापोटी सरकार मंदिरे बंद ठेवून दारूची दुकानं उघडी ठेवतंय. कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसने राष्ट्रीय पक्ष कुंटुंबातच मर्यादित केल्यामुळे कुंटुंबालाच कार्यकारणी समजून राष्ट्रीय पक्षाच्या मालकीचा सातबारा केला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content