Homeचिट चॅट‘गोवा काजू फेणी’ला...

‘गोवा काजू फेणी’ला आले ‘अच्छे दिन’!

दारूचा आनंद लुटणाऱ्या मद्यपींना गोवा काजू फेणीची लज्जत काय असते हे नव्याने सांगायला नको. त्यामुळेच गोव्यातून महाराष्ट्रात येणारे कित्येक जण गोवा काजू फेणीची तस्करी करतात. दारूच्या थेंबालाही न शिवणारेही असंख्य लोक यात कळतनकळत सहभागी होतात.

गोव्याच्या याच काजू फेणीला सध्या जरा जास्त महत्त्व आले आहे. कालच गोवा टपाल विभागाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 दरम्यान गोवापेक्स 2021 या जिल्हास्तरीय आभासी फिलाटेली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनातील पहिल्या टप्प्यात काल गोवा काजू फेणीवर विशेष कव्हर आणि कॅन्सलेशनचे प्रकाशन झाले. पोस्ट मास्तर जनरल कर्नल एस एफ एच रिझवी यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. पणजी मुख्यालयात हे कव्हर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

अमृत महोत्सव आणि गोवा मुक्ती हीरक महोत्सवी वर्ष यानिमित्ताने आगामी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात फिलाटेलीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि गोव्यातील वारसास्थळे आणि संस्कृतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

फेणी तयार करण्याच्या प्रक्रियेवर हे कव्हर आधारीत आहे. या विशेष कॅन्सलेशन प्रकाशनाप्रसंगी वरिष्ट टपाल अधीक्षक डॉ. सुधीर जाखेरे, गोवा फिलाटेली आणि न्यूमीस्मॅटीक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रमेश कुमार यांची उपस्थिती होती.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content