Homeएनसर्कलभारतीय तटरक्षक दलात...

भारतीय तटरक्षक दलात ‘अक्षर’ तैनात

भारतीय तटरक्षक दलाची अक्षर, ही अदम्य श्रेणीच्या मालिकेतील दुसरी गस्ती नौका काल पुद्दुचेरीत कराईकल येथे तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. गोवा शिपयार्ड लिमिटेडने स्वदेशी पद्धतीने तयार केलेली ही नौका 51 मीटर लांब आहे. 60%पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री असलेली आयसीजीएस ‘अक्षर’, ही केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत भारताच्या वाढत्या सागरी क्षमतेचे प्रतीक आहे.

या जहाजाचे जलविस्थापन सुमारे 320 टन आहे.  3000 किलोवॉट डिझेल इंजिनाच्या मदतीने ती 27 नॉट्स इतक्या कमाल वेगाने प्रवास करू शकते. कमीतकमी वेगाने 1500 सागरी मैल कापण्याची या नौकेची क्षमता आहे. तिच्यावर स्वदेशी बनावटीचे दोन नियंत्रणक्षम पिच प्रोपेलर्स आणि गिअरबॉक्स बसवले आहेत, ज्यामुळे समुद्रात अतिशय उत्तम पद्धतीने विहार करण्याची क्षमता आणि कार्यक्षम लवचिकता असलेली ही नौका आहे. त्याबरोबरच ती 30 मिमी सीआरएन 91 गन आणि दोन 12.7 मिमी स्टॅबिलाइज्ड रिमोटनियंत्रित गन यासारख्या एकात्मिक शस्त्रप्रणालीने सुसज्ज आहे. नौकेच्या परिचालनात्मक कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी यात इंटिग्रेटेड ब्रिज सिस्टीम, इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीम आणि ऑटोमेटेड पॉवर मॅनेजमेंट सिस्टीमसारख्या स्वयंचलित प्रणालींचा समावेश आहे. ‘आयसीजीएस अक्षर’ हे जहाज कराईकल, पुदुच्चेरी येथे तैनात असेल. संरक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव दीप्ती मोहिल चावला यांच्या हस्ते आयसीजीएस अक्षर तैनात करण्यात आली. अक्षर, या शब्दाचा अर्थ अविनाशी असा आहे.

Continue reading

हरमित सिंग ठरला ‘खासदार श्री’चा किंग!

मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस... मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेली लाख मोलाच्या बक्षिसांची उधळण, यामुळे ‘खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धे’ने...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः प्रतिका, स्नेह, रेणुकाला रेल्वेकडून बढती!

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली...

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...
Skip to content