Homeचिट चॅट30 सप्टेंबरला पणजीत...

30 सप्टेंबरला पणजीत टपाल खात्याची अदालत

भारतीय टपाल खात्याच्या गोवा क्षेत्रातल्या, पणजीमधल्या पोस्टमास्टर जनरल कार्यालयातर्फे येत्या 30 सप्टेंबरला 63व्या क्षेत्रीय स्तरावरच्या टपाल अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पणजीतल्या पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता ही टपाल अदालत आयोजित केली जाईल.

तक्रारींचे प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने टपाल विभागातर्फे वेळोवेळी अशा लोक अदालतीचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने टपाल विभागाचे अधिकारी पीडित ग्राहकांना भेटून, त्यांच्या तक्रारींची माहिती संकलित करतात आणि त्यांचे लवकरत लवकर निराकरण व्हावे म्हणून कार्यवाहीला सुरुवात करतात. गोवा क्षेत्राशी  संबंधित टपाल सेवांबाबतच्या ज्या तक्रारी 6 आठवड्यांत सोडवल्या गेल्या नाहीत, अशा तक्रारी या अदालतीत हाती घेतल्या जाणार आहेत. या अदालतीत टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँका आणि मनी ऑर्डरच्या न भरलेल्या पेमेंटसंबंधीच्या तक्रारीदेखील ऐकल्या जाणार आहेत.

नोंदवलेल्या तक्रारीमध्ये तारखा, नावे आणि ज्या अधिकाऱ्यांकडे मूळ तक्रार केली होती, त्यांचे पद अशा स्वरुपातील माहिती देणे अपेक्षित आहे. इच्छुक ग्राहक त्यांच्या टपाल सेवांबाबतच्या तक्रारी दोन प्रतींमध्ये सहाय्यक संचालक, टपाल सेवा-1, पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, गोवा क्षेत्र, पणजी- 403001 या पत्त्यावर 20 सप्टेंबर 2025पर्यंत पाठवू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मिझोराम, मणिपूर आणि आसामच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 13 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरदरम्यान मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत. या भेटींदरम्यान पंतप्रधान 71,850 कोटींहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी करणार आहेत. आज ते मिझोराम, मणिपूर तसेच आसामचा दौरा करणार...

दादर-माटुंगा केंद्रातर्फे ऑक्टोबरमध्ये तबलावादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५, यादिवशी सकाळी ९.३० वाजता तबलावादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहे. स्पर्धा १६ ते २५ वर्षे या मोठ्या वयोगटासाठी ९.३० वाजता तर १० ते १५ वर्षे,...

सी.पी. राधाकृष्णन भारताचे १५वे उपराष्ट्रपती!

महाराष्ट्राचे कालपर्यंतचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज दिल्लीत भारताचे १५वे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना अधिकारपदाची तसेच गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीनंतर राधाकृष्णन यांनी महात्मा गांधींच्या समाधीला...
Skip to content