Homeकल्चर +नीतांशीच्या सुरक्षेसाठी ७...

नीतांशीच्या सुरक्षेसाठी ७ बाऊंसर्स! 

११ मार्च २०२४ रोजी रिलीज झालेला, आमिर खान प्रोडक्शन प्रॉडक्शनची निर्मिती असलेला आणि किरण रावने अतिशय संवेदनशीलतेने दिग्दर्शित केलेला ‘लापता लेडीज’ या खुशखुशीत विनोदाची पेरणी असलेल्या सिनेमातली फुलकुमारी नीतांशी गोयल, या ५ फूट उंचीच्या अभिनेत्रीला सध्या ७ बाऊंसर्सचे सुरक्षाकवच आहे.

हा चित्रपट ऑस्करसाठीदेखील नामांकित झाला होता. याच सिनेमात ‘फुलकुमारी’ ही व्यक्तिरेखा साकारलेली नवोदित अभिनेत्री नीतांशी गोयल अवघी १७ वर्षांची आहे आणि कोवळ्या वयातला तिचा अभिनय परिपक्व करणारा होता हे जाणवले. नितांशीचा पुढील चित्रपट होता ‘मैदान’. पण मैदान सिनेमा मैदान गाजवू शकला नाही. तरीही नीतांशीचा पहिल्याच सिनेमातील यश तिच्यासोबत कायम राहिलंय. अनेक एंडोर्समेंट तिच्या वाट्याला येत आहेत. आयुर्वेदिक नीम अर्थात कडुलिंबाबाच्या प्रोडक्ट्साठी तिची नियुक्ती झाली.

नीतांशीसोबत किती बाऊंसर्स असावेत असे तुम्हाला वाटते? धिप्पाड असे ७ बाऊंसर्स नीतांशीच्या सभोवती कडे करून होते आणि जेमतेम ५ फूट उंची आणि किरकोळ देहयष्टी असलेली नीतांशी या बाऊंसर्सच्या सुरक्षाकड्यामुळे दिसेनाशी झाली! एका सिनेमाचे यश आणि त्यासाठी फिल्मी कलाकारांना मिळणारी इतकी कडेकोट सुरक्षाव्यवस्था, यामुळेच अनावश्यक स्टारडम वाढते!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content