Homeकल्चर +गोरेगावच्या चित्रनगरीत रंगला...

गोरेगावच्या चित्रनगरीत रंगला ‘सेलिब्रिटी योगा’चा उत्सव

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगविद्येच्या जागृतीसाठी आज मुंबईतल्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘सेलिब्रिटी योगा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या विशेष योग उपक्रमात मराठी चित्रपट व मालिकांमधील लोकप्रिय चेहरे सहभागी झाले. त्यात सुशांत शेलार, मेघा धाडे, अभिजीत केळकर, अविनाश नारकर, नंदिनी वैद्य, नियती राजवाडे, सुमिरन मोडक, भार्गवी चिरमुले, अनघा भगरे, मिलिंद गवळी, तीतिक्षा तावडे, शर्वानी पिल्ले, रोहिणी निनावे, गीतांजली ठाकरे, कल्पना जगताप, मानसी इंगळे यांचा समावेश होता.

यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, व्यवस्थापक कलागरे संतोष खामकर इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे कलाकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योग सत्राने झाली. या सत्रात उपस्थितांनी योगासने करत, आरोग्य, मानसिक शांतता आणि जीवनशैलीमध्ये समतोल साधण्यासाठी नियमित योगाभ्यास करण्याची शपथ घेतली.

याप्रसंगी आशिष शेलार म्हणाले की, “योग हा भारताच्या ऋषी परंपरेचा वारसा आहे. औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी आपण योगाद्वारे निरोगी जीवनशैली स्वीकारली पाहिजे. कलाकार समाजाचे आरसाच आहेत. त्यांनी योगप्रसाराचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचवावा, हीच अपेक्षा आहे.” चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील म्हणाल्या की, “योग हा केवळ व्यायाम नसून जीवनशैली आहे. धकाधकीच्या जीवनात हरवलेलं मानसिक संतुलन पुन्हा मिळवण्यासाठी योग अत्यावश्यक आहे.”

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content