Homeहेल्थ इज वेल्थडॉक्टरांच्या प्रयत्नाने वाचले...

डॉक्टरांच्या प्रयत्नाने वाचले सर्पदंश झालेल्या गर्भवतीचे प्राण

नाशिक योथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महाराष्ट्र वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्थेच्या डॉक्टरांनी सर्पदंश झालेल्या गर्भवती महिलेला आणि तिच्या गर्भातील बाळाला अथक प्रयत्नांनी नुकतेच वाचविले. इगतपुरीतील एका 30 वर्षीय गर्भवती महिलेला सर्पदंश झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दाखल होताना ती बेशुध्द (GCS 3) होती. तिला व्हेंटिलटेरवर (Intubation) ठेऊन अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तपासणीदरम्यान तिच्या रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रक्रिया (clotting time) सुरु झाल्य़ाचे आढळून आले. यामुळे “वास्कुलोटॉक्सिक + न्युरोपॅरालिटिक” असे निदान करण्यात आले, असे अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी सांगितले. म्हणून रुग्णाला 30 ASV वायलसह Atropine-Neostigmine चे इंजेक्शन देण्यात आले. तसेच ती सेप्टिक शॉकमध्ये असल्यामुळे उच्च प्रतीचे प्रतिजैविक (Antibiotics) देण्यात येऊन Mechanical Ventilation आणि Inotropic सपोर्ट देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

पहिले चार दिवस रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा नव्हती. गर्भ तपासणीमध्ये बाळाचे ठोके (Fetal Heart Sound) ऐकू न आल्यामुळे गर्भ मृत होण्याची शक्यता होती. मात्र पाचव्या दिवशी तिने डोळे उघडल्यामुळे उपचार सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तिची परिस्थिती लक्षात घेता तिला सोनोग्राफीसाठी (Obstetric Scan) तत्काळ हलविण्यात आले. डॉ. माधुरी किर्लोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी डॉक्टर्सच्या मदतीने हे धाडसी पाऊल उचलण्यात आले. स्कॅनिंगमध्ये गर्भ जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. पुढील उपचार काळात रुग्णाची परिस्थिती सुधारली. रुग्णाच्या मानेची हालचाल कमी असल्यामुळे डॉक्टर्सनी Tracheostomy करायचा विचार केला होता. मात्र, डॉ. राहुल केकाण आणि डॉ. पंकज चव्हाण यांच्या निर्णयानुसार Elective Extubation करुन मास्कच्या सहाय्याने श्वासोच्छ्वास Non-invasive ventilation (NIV) सुरु ठेवण्यात आला. अखेर रुग्णाने ऑक्सिजनवर स्वतः श्वास घेण्यास सुरुवात केली. आता रुग्ण पूर्णपणे शुद्ध व सुसंगत आहे. डॉ. किर्लोस्कर, डॉ. केकाण, डॉ. चव्हाणसह, निवासी डॉक्टर्स अनुश्री सोनवणे, आशीष साबणे, पवन तेजा, रोहिदास खंदारे यांच्या चमूने ही यशस्वी कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे. तज्ज्ञ डॉक्टर्सनी वेळेवर योग्य उपचार केल्यास कोणतीही जीवितहानी टाळता येते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

महाराष्ट्र सरकारने नाशिक येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाची महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ कायदा 1998 अन्वये 03 जून 1998 रोजी स्थापना केली. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि भारतीय पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण यांचा समतोल विकासासाठी तसेच आरोग्य विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता नियोजनबध्दरित्या वाढण्याच्या दृष्टीने राज्यात या विद्यापीठाची निर्मिती केली गेली. नाशिकच्या दिंडोरी रोड म्हसरूळ शिवारात 51 एकर क्षे़त्रात हे विद्यापीठ असून या परिसरात मुख्य प्रशासकीय भवन, शिक्षक प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, आतिथीगृह, कुलगुरूंचे निवासस्थान व अधिकाऱ्‍यांसाठी क्वार्टर्सच्या बांधण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आहे. उत्तम व तत्पर प्रशासनासाठी विद्यापीठाने प्रशासन, अॅकॅडमिक, वित्त व परीक्षा विभागाचे संगणकीकरण केले आहे. हे विद्यापीठ व्हीडिओ कॉन्फरन्सने मुंबई, पुणे, नागपूर, आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागाशी जोडण्यात आले आहे.

विद्यापीठ स्थापन करताना एकूण 11995 विद्यार्थ्यांच्या जागासहित 193 आरोग्य विज्ञान महाविद्यालये आणि कांही संस्था विद्यापीठाशी संलग्न करण्यात आल्या. अनेक आरोग्य विज्ञान महाविद्यालये जी पूर्वी परंपरागत विद्यापीठांशी संलग्न होती ती आता नाशिक कार्यक्षेत्रात आली आहेत. सध्या 35 मेडिकल, 28 डेंटल, 62 आयुर्वेद, 06 युनानी आणि 45 होमिओपॅथी महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत.  गेल्या 15 वर्षांत विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जात काही महत्त्वाच्या सुधारणा करुन महाविद्यालयांसाठी पायाभूत सुविधा आणि हॉस्पिटलच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांची सक्तीने उपस्थिती, अभ्यासक्रमात नियमित अद्ययावतीकरण, वेळापत्रकाची निष्चिती, विद्यार्थीनिहाय शिक्षण कार्यक्रम व सर्व विभागाच्या अभ्यासक्रमाचे नियोजन फिरत्या स्वरूपात करुन सक्तीच्या इंटर्नशीप कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या क्षमतेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

भाड्यापोटी विकासकांची म्हाडाकडे १३५ कोटींची थकबाकी!

मुंबईत भाड्यापोटी विकासकांडून म्हाडाला १३५ कोटी रुपयांहून अधिक थकबाकी येणे असतानाच म्हाडाने संक्रमण शिबिरात राहणाऱ्या सदनिकाधारकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या भाड्यात प्रचंड वाढ करण्याचे ठरविले असल्यामुळे भाडेकरूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या सेवाशुल्कवाढीस बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेने तीव्र विरोध करीत आंदोलनाचा ईशारा...

व्हिजन डॉक्युमेंटच्या नावावर होणार मंत्र्यांचे परदेश दौरे! मच्छिमार बोंबलणार!!

राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे व्हिजन डॉक्युमेंट 2047 तयार करत असताना त्यामध्ये वातावरण बदलामुळे मत्स्यव्यवसायावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय यांचा समावेश करावा असे मत्स्यव्यवसाय विभागाने ठरविले आहे. मात्र वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मच्छीमार प्रस्तावित व्हिजन डॉक्युमेंटबाबत साशंक आहेत. मुख्य म्हणजे व्हिजन डॉक्युमेंट तयार...

जगाला गवसणी घालून भारतात परतल्या नौदलाच्या नाविका!

आठ महिन्यांत 'आय.एन.एस.व्ही तारीणी' या विषेश नौकानयन जहाजावरील 25000हून अधिक नॉटिकल मैलाच्या प्रवासात, तीन महासागरे, चार मोठी बेटे आणि तीन समुद्रीतळांना भेट देऊन भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी गुरुवारी भारतात परतल्या. गोव्यातील भारतीय नौदलाच्या मोले जेट्टी, मार्मुगाव पोर्ट इथे आयोजित कार्यक्रमात, संरक्षणमंत्री...
Skip to content