Homeएनसर्कलपोप फ्रान्सिस यांच्यावरील...

पोप फ्रान्सिस यांच्यावरील अंत्यसंस्कारात राष्ट्रपती मुर्मू सहभागी

रोमन कॅथोलिक ख्रिश्चन समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रन्सिस यांचे २१ एप्रिलला वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. काल रोममधल्या व्हॅटिकन सिटीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर स्क्वेअर येथे पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराच्या प्रार्थनेत सहभागी झाल्या. पोप यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या अधिकृत भारतीय शिष्टमंडळाचा भाग असलेले केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष जोशुआ डिसुझा हेही यावेळी उपस्थित होते.

पोप फ्रान्सिस यांची समाजसेवा कायम स्मरणात राहील – पंतप्रधान मोदी

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्यावरील अंत्यसंस्काराच्या निमित्ताने एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, भारतीय जनतेच्या वतीने राष्ट्रपतीजींनी परमपूज्य पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहिली आहे. पोप फ्रान्सिस यांनी समाजासाठी केलेली सेवा, जगाच्या कायम स्मरणामध्‍ये राहील. जग त्यांच्या समाजसेवेचे कायम स्मरण करेल.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content