Homeकल्चर +'सजना'चं शीर्षकगीत प्रेक्षकांच्या...

‘सजना’चं शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला!

भारतीय संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारा ‘सजना’ चित्रपटाचे टायटल साँग (शिर्षकगीत) प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रेमातील हळव्या भावनांना स्पर्श करत, या गीतामध्ये प्रेमातील गोडवा, आठवणी, आणि नात्यांमधील निखळपणा अगदी हृदयस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आला आहे. गाण्याचं चित्रिकरणदेखील अत्यंत नयनरम्य आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि राजेश्वरी पवार यांच्या भावस्पर्शी आवाजात सजलेले हे गाणं प्रेमाची नाजूक आणि गहिरं भावना व्यक्त करते.

या गाण्याला संगीत दिलं आहे ओंकारस्वरूप यांनी, तर गाण्याचे बोल लिहिले आहेत सुहास मुंडे यांनी. हे गाणं केवळ एक संगीतकृती नसून, प्रेमाच्या भावना, आठवणी आणि नात्यांची गुंफण उलगडणारं एक सुंदर चित्रण आहे. गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘सजना’ ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित एक प्रेमकथा आहे. या चित्रपटाची निर्मिती सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनसुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत प्रेम, भावना आणि संगीत यांचं अनोखं मिश्रण घेऊन येणारा हा चित्रपट २३ मे २०२५ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content