Homeहेल्थ इज वेल्थलठ्ठपणाच्या समस्येवर पंतप्रधान...

लठ्ठपणाच्या समस्येवर पंतप्रधान मोदींना ओमर अब्दुल्लांची साथ!

भारतात वाढत असलेल्या लठ्ठपणाच्या समस्येशी दोन हात करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेतला असून या कामात त्यांना भारतीय जनता पार्टीचे विरोधक नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची साथ मिळणार आहे.

आकाशवाणीवर रविवारी झालेल्या मन की बात, या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी देशातल्या लठ्ठपणाच्या समस्येकडे भारतवासियांचे लक्ष वेधलं. ही लठ्ठपणाची समस्या सोडवण्यासाठी खाद्यतेलाचा वापर शक्य तितका कमी करावा असे आवाहन त्यांनी केले. हे आवाहन करतानाच त्यांनी या लढाईला बळकटी येण्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले. ही जनजागृती करण्यासाठी त्यांनी दहा जणांना नामांकित केले आहे. यामध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याव्यतिरिक्त या मान्यवरांमध्ये अभिनेता निरहुआ, नेमबाज मनु भाकर, वेटलिफ्टर मीराबाई चानू, अभिनेते मोहनलाल, इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन नीलकेणी, अभिनेता माधवन, गायिका श्रेया घोषाल, सुधा मूर्ती यांनाही पंतप्रधानांनी खाद्य तेलाचा वापर कमी करण्याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. या दहा जणांपैकी प्रत्येकाने इतर दहा जणांना नामांकित करावे. त्यांच्यातल्या प्रत्येकाने पुढे दहा-दहा जणांना नामांकित करावे. अशी नामांकनाची एक साखळी तयार होऊन त्या माध्यमातून ही जनजागृती करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधान

एक्सवर केलेल्या एका आवाहनात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येशी लढण्याची तातडीची गरज आहे. यासाठी खाद्यतेलाचा वापर कमी करायला हवा. या उद्देशाने एक चळवळ निर्माण करण्याची गरज आहे. या लढ्याला बळकटी देण्यासाठी आणि अन्नातला खाद्यतेलाचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी ही चळवळ जास्तीतजास्त व्यापक व्हायला हवी. एकत्रितपणे आपण भारताला अधिक तंदुरुस्त आणि निरोगी बनवूया. फाईट ओबेसिटी!

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात 57% महिला आणि साधारण 47% पुरुष लठ्ठपणाच्या समस्येला तोंड देत आहेl. आपण जे खाद्यतेल वापरतो त्यामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. समोसा, पकोडे, भजी, कचोरी असे तळलेले पदार्थ कटाक्षाने टाळले गेले पाहिजे. हे चवदार तर असतातच पण शरीराला हानिकारकही तितकेच असतात. शरीरामध्ये दिवसभरात खाद्यतेलाचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीला साधारणतः 30 ग्रॅम इतके असायला हवे. याचाच अर्थ चार जणांच्य एका कुटुंबाला महिन्याला एक लिटर खाद्यातेल पुरेसे आहे. पण आज प्रत्यक्षात लोकांकडून दरमहा दहा-दहा लिटर खाद्यतेलाचा वापर होत आहे. हे प्रमाण कमी झाले तर वजन कमी होण्यासही हातभार लागेल आणि त्याकरीताच आता पंतप्रधान मोदी सरसावले आहेत.

Continue reading

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...

देशभरात साठेबाजांविरूद्ध अत्यावश्यक सेवा कायदा लागू!

आखातात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात अत्यावश्याक वस्तू कायदा लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा अधिनियम १९५५, हा कायदा लागू केल्यानंतर घराघरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजांविरोधात कठोर कारवाई केली...
Skip to content