Friday, February 7, 2025
Homeचिट चॅटवस‌ईच्या सूर्योदय आरबीएल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले.

गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर संघावर सात गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबई उपनगरकडून जस्टीनने सर्वात अधिक 15 धावा, तर सिध्दांतने 14 धावा केल्या. सूर्योदय आरबीएल स्कूलच्या अनुज त्रिपाठी याने एकाच षटकात दोन गडी बाद केले. 56 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना सूर्योदय आरबीएल स्कूलचा पहिलाच गडी रोहन गुटाल शून्य धावांवर बाद झाला. पण नंतर अनुज त्रिपाठी 15 धावा केल्या. त्याला रोहित पोथेन आणि ओबेद डायस यांनी दहा, दहा धावा करून सुरेख साथ दिली. लवेश डऊलने सहा धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अनुज त्रिपाठी याला उत्कृष्ट गोलंदाज व सर्वाेत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार ओबेद डायसला देण्यात आला. विजयी संघातील सर्व खेळाडूंचे तसेच अविनाश महाडीक (क्रीडा शिक्षक), शिक्षक शंकर परब, स्टेफी टिचर व महिमा टिचर यांचे प्रिन्सिपॉल अनुसया प्रधान यांनी खास अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

‘छबी’तून उलगडणार अनोखी छबी!

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली...

पंतप्रधान मोदींबरोबर दीपिका पदुकोणही करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी, 10 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता देशभरातील विद्यार्थ्यांशी दूरदर्शनसह अनेक माध्यमांतून ‘परीक्षा पे चर्चा’च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यातून ते सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतून निवडक 36 विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतील. मानसिक आरोग्यापासून ते तंत्रज्ञानापर्यंत, अशा विविध...
Skip to content