Homeन्यूज अँड व्ह्यूजहा पाहा मालाड...

हा पाहा मालाड रेल्वेस्थानकाचा मेकओव्हर!

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकाची दुरुस्ती वा मेकओव्हर गेली तब्बल सात-आठ वर्षे सुरु आहे. (काहींनी तर हे काम सुरु होऊन दहा वर्षे तरी झाली असावीत असा अंदाज व्यक्त केला आहे.) मालाड, कांदिवली व बोरिवली ही वाढणारी रेल्वेस्थानके आहेत हे रेल्वेच्या नियोजन विभागास माहित नाही काय? शिवाय मालाडमधून दररोज लाखो रुपयांचा महसूल मिळत असूनही मलाडाची अशी हेळसांड का? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. तर त्याचे उत्तर आहे की गुळमुळीत व मुळमुळीत लोकप्रतिनिधी. राजकीय नेत्यांच्या कमरेला बांधलेला वा न बांधलेला ‘कटदोरा’ दिसणारी दिव्यदृष्टी असणाऱ्या राजकीय नेत्यांना पाच-दहा स्थानकापालिकडील स्थानक दिसू नये यावर ‘राजकारण’ असे उत्तर दिल्यास तोंडातून काय प्रतिउत्तर उमटेल? याचा ज्याचा त्याने विचार केलेला बरा! पण त्या राजकारणात बिचाऱ्या नागरिकांची आहुती कशाला?

पुन्हा सरकार व महापालिका जागोजागी स्वच्छ मुंबईचे कौतुक करण्यास सज्जही असते. या स्वच्छतेचे गोडवे गाणाऱ्यांनी जरा पश्चिमेकडील सरकत्या जिन्यावरून चढून दाखवावे. सरकत्या जिन्यावरील पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताक्षणी हगीनदारीचा घाण वास तुमच्या नाकात जाऊन तुम्हाला कदाचित गुदमरायला होईल. हगीनदारी तसेच पानाच्या पिचकाऱ्यांनी आजूबाजूच्या भिंती रंगवून टाकलेल्या आहेत. त्या नियोजन समितीने एकदा कुणालाही न कळवता हा तथाकथित मेकओव्हर बघूनच घ्यावा. इतका भोंगळ कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदी सहनच करणार नाहीत याची आम्हाला खात्रीच आहे. मुंबईतील जनता सहशील आहे म्हणूनच आजपर्यंत हे सहन केले आहे. बंगाल किंवा मद्रासमधील जनतेने तर याआधीच कायदा हातात घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना बडवून काढले असते. परप्रांतीयांना मुंबईकर सहन करतच आला आहे. आता त्यांची हगीनदारीही सहन करावी असे दोन्ही सरकारांना वाटते काय? यावर कुणा राजकीय नेत्याने सुंगंधी फवाराचा उपाय सांगू नये म्हणजे पुरवली!!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

परदेशाप्रमाणे भांडुपमध्ये लवकरच दिसणार ‘कलते’ मनोरे?

मुंबईतला लालबहाद्दूर शास्त्री मार्ग, मेट्रो लाईनचे काम आणि भांडुप-मुलुंड परिसर यांचे काय नाते आहे हे एका परमेश्वरालाच माहित! कारण मेट्रोचे अपघात येथेच सुरू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात मेट्रोची एक स्लॅब कोसळून रिक्षा चक्काचूर झाली होती व माणसे...

मुंबई महापालिकेचा ‘दिव्याखालीच अंधार’!

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला वरूणराजा झोडपून काढत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेच्या कारभाराची लत्करे वेशीवर टांगली जात आहे. मी-मी म्हणणारे कित्येक आले. गेले. राजकारणातून संपले. पण, मुंबई काही तुंबायची राहिली नाही. यंदा तब्बल महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचे आगमन झाले....

माध्यमांना ठाकरेंच्या शिवसेनेचे का बरे वावडे?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दाकल झाले. या प्रक्रियेत गेल्या चार दिवसांपासून विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एक सवाल विचारला गेला- उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्तवाहिन्यांना उपलब्ध का नसतात? त्याबाबत निरीक्षणातून हाती आलेली...
Skip to content