Homeन्यूज अँड व्ह्यूजहा पाहा मालाड...

हा पाहा मालाड रेल्वेस्थानकाचा मेकओव्हर!

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकाची दुरुस्ती वा मेकओव्हर गेली तब्बल सात-आठ वर्षे सुरु आहे. (काहींनी तर हे काम सुरु होऊन दहा वर्षे तरी झाली असावीत असा अंदाज व्यक्त केला आहे.) मालाड, कांदिवली व बोरिवली ही वाढणारी रेल्वेस्थानके आहेत हे रेल्वेच्या नियोजन विभागास माहित नाही काय? शिवाय मालाडमधून दररोज लाखो रुपयांचा महसूल मिळत असूनही मलाडाची अशी हेळसांड का? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. तर त्याचे उत्तर आहे की गुळमुळीत व मुळमुळीत लोकप्रतिनिधी. राजकीय नेत्यांच्या कमरेला बांधलेला वा न बांधलेला ‘कटदोरा’ दिसणारी दिव्यदृष्टी असणाऱ्या राजकीय नेत्यांना पाच-दहा स्थानकापालिकडील स्थानक दिसू नये यावर ‘राजकारण’ असे उत्तर दिल्यास तोंडातून काय प्रतिउत्तर उमटेल? याचा ज्याचा त्याने विचार केलेला बरा! पण त्या राजकारणात बिचाऱ्या नागरिकांची आहुती कशाला?

पुन्हा सरकार व महापालिका जागोजागी स्वच्छ मुंबईचे कौतुक करण्यास सज्जही असते. या स्वच्छतेचे गोडवे गाणाऱ्यांनी जरा पश्चिमेकडील सरकत्या जिन्यावरून चढून दाखवावे. सरकत्या जिन्यावरील पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताक्षणी हगीनदारीचा घाण वास तुमच्या नाकात जाऊन तुम्हाला कदाचित गुदमरायला होईल. हगीनदारी तसेच पानाच्या पिचकाऱ्यांनी आजूबाजूच्या भिंती रंगवून टाकलेल्या आहेत. त्या नियोजन समितीने एकदा कुणालाही न कळवता हा तथाकथित मेकओव्हर बघूनच घ्यावा. इतका भोंगळ कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदी सहनच करणार नाहीत याची आम्हाला खात्रीच आहे. मुंबईतील जनता सहशील आहे म्हणूनच आजपर्यंत हे सहन केले आहे. बंगाल किंवा मद्रासमधील जनतेने तर याआधीच कायदा हातात घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना बडवून काढले असते. परप्रांतीयांना मुंबईकर सहन करतच आला आहे. आता त्यांची हगीनदारीही सहन करावी असे दोन्ही सरकारांना वाटते काय? यावर कुणा राजकीय नेत्याने सुंगंधी फवाराचा उपाय सांगू नये म्हणजे पुरवली!!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

तुमचे श्रीराम तर माझी सीतामैय्या! नितीशबाबूही लागले भजनी!!

सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे भव्यदिव्य राममंदिर बांधून देशातील मतदारांचे डोळे दिपवले होते, हे सर्वजण जाणतात! आता काही दिवसांतच बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. नेमका हाच मुहूर्त साधून बिहारचे मुख्यमंत्री नितीशबाबूंनी 'जानकी जन्मस्थल...

‘त्या’ बेवारस बोटीबाबत जाबजबान्या झाल्या तरी कुणाच्या?

आजकाल राज्यात वा केंद्रात जरा काही खुट्ट वाजले की उच्चस्तरीय चौकशी वा विशेष दक्षता पथकाकडून चौकशी केली जावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जाते. याच धर्तीवर सुमारे तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी सापडलेल्या बेवारस बोट व त्यातील...

देवाभाऊ गरिबांची कशाला चेष्टा करता?

आता डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत सत्ता व विरोधी पक्षांतील राजकीय नेते राज्यातील जनतेच्या तोंडावर कुठलेही आश्वासन फेकतील. कारण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व महापालिकांमधील निवडणुका होणार आहेत. अन्य कुठल्याही राजकीय नेत्यांनी आश्वासन दिल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येते. परंतु मुख्यमंत्रीपदावरील हुशार व्यक्तीने (देवाभाऊ)...
Skip to content