Homeकल्चर +अशोक सराफ करणार...

अशोक सराफ करणार छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक

‘बिग बॉस मराठी’, या बहुचर्चित कार्यक्रमाची नुकतीच सांगता झाली. पण प्रेक्षकांच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर आता नव्या मनोरंजनाची सुरुवात होणार आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्राचे आवडते अभिनेते, अभिनयसम्राट, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ घेऊन येत आहेत एक नवी मालिका ‘अशोक मा.मा.’.

अशोक सराफ

अशोकमामांची ही नवीकोरी मालिका तुफान एंटरटेनिंग असणार यात काही शंका नाही. ‘येतोय महाराष्ट्राचा महानायक’ म्हणत ‘कलर्स मराठी’ने काही दिवसांपूर्वी ‘अशोक मा.मा.’ या मालिकेची पहिली झलक समोर आणली होती. अशातच आता या मालिकेचा उत्सुकता वाढवणारा नवा प्रोमो समोर आला आहे. शिस्तीचं पालन करणारे, काटकसरीचा स्वभाव असणारे, स्वत:च्या निर्णयांवर ठाम असणारे ‘अशोक मा.मा.’ म्हणजेच अशोक माधव माजगावकर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

अशोक सराफ

बत्तीस वेळा काम सोडून गेलेली मोलकरीण तेहतीसव्यावेळी पुन्हा कामावर येते. त्यावेळी काटकसरी स्वभाव असलेले अशोक मा.मा. मोलकरीण थोडं जास्त वापरत असलेल्या तेलावरून, साबणावरून तिच्यासोबत वाद घालतात. त्यांच्यातला हा वादाचा गमतीशीर प्रसंग प्रेक्षकांची मात्र उत्कंठा वाढवतोय. ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री नेहा शितोळे या मालिकेत अशोक मामांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. तिने वठवलेली मोलकरीण चांगलाच भाव खाऊन जातेय.

अशोक सराफ

‘अशोक मा.मा’ या मालिकेच्या माध्यमातून एक आगळीवेगळी कथा घेऊन टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला महाराष्ट्राचे लाडके अशोकमामा सज्ज आहेत. आपल्या मिश्कील अंदाजाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारे अशोक सराफ या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content