‘वन नेशन, वन इलेक्शन’ला मोदी कॅबिनेटची मान्यता!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत (कॅबिनेट) ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संकल्पनेच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. केंद्रीय कॅबिनेटने याला मंजुरी दिल्यामुळे संसदेच्या शीतकालीन अधिवेशनात संबंधित विधेयक मांडण्यात येईल आणि शक्य झाले तर ते संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूरही करून घेतले जाईल. मात्र, निवडणुकीची ही पद्धत नेमकी कधीपासून अंमलात येईल, हे संसदेतच स्पष्ट होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

संपूर्ण देशात एकाचवेळी लोकसभा तसेच विधानसभा आणि शक्य झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची संकल्पना म्हणजे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ होय. याची शक्याशक्यता पडताळण्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने केंद्रीय निवडणूक आयोग, सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष तसेच इतर संबंधित शासकीय यंत्रणांशी चर्चा करून यावर आपला अहवाल तयार केला. या अहवालात ‘वन नेशन वन इलेक्शन’ देशात शक्य असल्याचे मत नोंदविले गेले असल्याचे कळते. या अहवालाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारले आणि त्यानुसार संबंधित मसुद्याला मान्यता दिली, असे सूत्रांनी सांगितले.

या धोरणानुसार कधीपासून ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी केली जाईल, त्याचे निकष, त्यातील कायदेशीर, घटनात्मक तरतुदी आदी सारा तपशील निश्चित केला जाईल. हे सारे निश्चित होऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीला कदाचित २०३४ सालच्या निवडणुका उजाडतील, असेही जाणकारांना वाटते. आज देशात कुठे ना कुठे निवडणुका चालू असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्च होचो आणि आचारसंहितेमुळे विकासकामांना बाधा निर्माण होते. या अडचणी दूर करण्याकरीता ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संकल्पना पुढे आली.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content