Homeटॉप स्टोरीपंतप्रधान मोदींची अशी...

पंतप्रधान मोदींची अशी माफी मान्य नाही!

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त असल्याने पंतप्रधान नरेंद्न मोदींनी माफी मागितली. पण ही माफी मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. आम्हाला अशी माफी मान्य नाही, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने मुंबईत हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधानांनी पुतळा पडला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचार झाला म्हणून, की भ्रष्टाचाराला पांघरूण घालण्यासाठी माफी मागितली? महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. देशाचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने या शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, मालवणच्या राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. गेट वे ऑफ इंडियासमोरचा पुतळा अनेक वर्षांपासून आहे. राज्यातही अनेक भागात असे पुतळे आजही भक्कमपणे उभे आहेत. ते कोसळले नाहीत. भ्रष्टाचारामुळे राजकोटच्या किल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना घडली.

भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. विधानसभा निवडणुकांचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, छत्रपती शाहू महाराज, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, संजय राऊत, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, आदित्य ठाकरे, अतुल लोंढे आदी सहभागी झाले होते. हुतात्म्यांना अभिवादन करून हा मार्चा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला.

1 COMMENT

  1. खरेच ओढून ताणून मागितल्यासारखी माफी वाटते. नाहीतर पहिल्याच दिवशी मागितली असती. निवडणूक असल्यामुळे माफी मागण्या शिवाय पर्यायच नाही.

Comments are closed.

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content