Homeटॉप स्टोरीपंतप्रधान मोदींची अशी...

पंतप्रधान मोदींची अशी माफी मान्य नाही!

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त असल्याने पंतप्रधान नरेंद्न मोदींनी माफी मागितली. पण ही माफी मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. आम्हाला अशी माफी मान्य नाही, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने मुंबईत हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधानांनी पुतळा पडला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचार झाला म्हणून, की भ्रष्टाचाराला पांघरूण घालण्यासाठी माफी मागितली? महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. देशाचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने या शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, मालवणच्या राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. गेट वे ऑफ इंडियासमोरचा पुतळा अनेक वर्षांपासून आहे. राज्यातही अनेक भागात असे पुतळे आजही भक्कमपणे उभे आहेत. ते कोसळले नाहीत. भ्रष्टाचारामुळे राजकोटच्या किल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना घडली.

भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. विधानसभा निवडणुकांचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, छत्रपती शाहू महाराज, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, संजय राऊत, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, आदित्य ठाकरे, अतुल लोंढे आदी सहभागी झाले होते. हुतात्म्यांना अभिवादन करून हा मार्चा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला.

1 COMMENT

  1. खरेच ओढून ताणून मागितल्यासारखी माफी वाटते. नाहीतर पहिल्याच दिवशी मागितली असती. निवडणूक असल्यामुळे माफी मागण्या शिवाय पर्यायच नाही.

Comments are closed.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content