Homeपब्लिक फिगरघटनात्मक पदावरची व्यक्ती...

घटनात्मक पदावरची व्यक्ती बेजबाबदारपणे वागते हे चिंताजनक!

घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती “आपल्या अर्थव्यवस्थेचा नाश करण्याच्या उद्देशाने प्रसारित केल्या जात असलेल्या खोट्या नरेटीव्हला बळ देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला अधिकार क्षेत्राचा वापर करण्याचे आवाहन करते ” ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कालकेले.

दिल्लीतील राष्ट्रीय विधि विद्यापीठात (एनएलयू) आयपी लॉ आणि मॅनेजमेंटमधील जॉईंट मास्टर्स / एलएलएम पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीला संबोधित करताना ते बोलत होते. संस्थेचे अधिकारक्षेत्र भारतीय राज्यघटनेने परिभाषित केले आहे. ते कायदेमंडळ असो किंवा कार्यपालिका, किंवा  न्यायपालिका. प्रत्येकाचे अधिकारक्षेत्र ठरवलेले आहे. जगभरात पाहा. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालय, ब्रिटनमधील सर्वोच्च न्यायालय पाहा. एकदा तरी स्वतःहून हस्तक्षेप केला आहे का? राज्यघटनेत दिलेल्या तरतूदीच्या पलीकडे उपाय निर्माण झाला आहे का? राज्यघटनेने मूळ अधिकारक्षेत्र, अपील अधिकारक्षेत्र प्रदान केले आहे. तसेच पुनरावलोकनाची तरतूददेखील केली आहे, असे ते म्हणाले.

आपल्याकडे क्युरेटीव्ह याचिका आहे! घटनात्मक पदावर असलेल्या एका व्यक्तीने, गेल्याच आठवड्यात माध्यमांत जाहीर केले की, आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा हेतू असलेल्या एका खोट्या नरेटीव्हला बळ देण्यासाठी स्वतःहून दखल घेण्याची सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली. ही बाब चिंताजनक आहे. राष्ट्रहितापेक्षा पक्षपाती किंवा स्वार्थाला प्राधान्य देणाऱ्या शक्तींना प्रभावहीन करण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले आणि अशा कृतींमुळे देशाच्या प्रगतीला खीळ बसते यावर भर दिला, असे त्यांनी सांगितले.

भारत ही बौद्धिक संपदेची सोन्याची खाण आहे. वेद, प्राचीन धर्मग्रंथ हे भारतीय तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान यांचा पाया आहे. भारताच्या बौद्धिक खजिन्याची ही प्रमुख उदाहरणे आहेत. प्रत्येकाने वेद त्यांच्या भौतिक स्वरूपात आत्मसात करावे, असे आवाहनही धनखड यांनी केले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content