Homeएनसर्कलआफ्रिकेतील उहुरु शिखरावर...

आफ्रिकेतील उहुरु शिखरावर दिव्यांगजनाने फडकवला भारतीय ध्वज

देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हिमालयीन गिर्यारोहण संस्थेच्या दिव्यांगजन मोहीम चमूने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर असलेल्या किलिमंजारो पर्वतावरील उहुरु शिखरावर 7800 चौरस फूटांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवला.

या चमूने त्यांचा प्रवास बेस कॅम्पपासून सुरू केला आणि 15500 फूट उंचीवरील किबू हट इथे 7 ऑगस्टला पोहोचले. तिथे त्यांनी 7800 चौरस फुटाचा राष्ट्रीय ध्वज जमीनीवर जाळे, दोर आणि खिळ्यांच्या सहाय्याने प्रदर्शित केला.

चमूचं नेतृत्त्व ग्रुप कॅप्टन जय किशन यांनी केलं. दिव्यांग उदयकुमार आणि इतरांचा समावेश असणाऱ्या या चमूने कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान ते किलिमंजारो मोहीम हाती घेतली होती आणि या मोहिमेत पहिल्यांदाच एका दिव्यांग गिर्यारोहकाने कुबड्या वापरून गिर्यारोहणाचा यशस्वी प्रयत्न करत एका ऐतिहासिक यशाची गाथा लिहीली.

हवामानाची स्थिती तसंच सर्व सहभागींची शारीरिक क्षमता लक्षात घेऊन, चमूने उहुरू शिखराकडे 8 ऑगस्टला पहाटे तीन वाजता प्रयाण केले. वादळी वातावरणात निसरड्या मार्गावर पर्वतीय भागात 85 अंश सरळ अशी कष्टदायक दहा तासांची चढाई करत त्यांनी दुपारी एक वाजता 5,895 मीटर उंचीवरील उहूरू शिखर गाठले आणि तिथे भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकवला. चिकाटी आणि सहकार्य यातून हे साध्य करता आले. भावी दिव्यांग पिढ्यांना स्फूर्ती देणे आणि इतर वंचित युवकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणे हा या ऐतिहासिक मोहिमेमागील उद्देश होता.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content