Homeहेल्थ इज वेल्थमुंबई महापालिकेच्या निवासी...

मुंबई महापालिकेच्या निवासी डॉक्टरांना शासनाप्रमाणे वेतनवाढ

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या, २२ जुलैपासून संप करण्याची सूचना दिली होती. या अनुषंगाने पदव्युत्तर निवासी वैद्यकीय विद्यार्थ्यांची संघटनेसोबत (मार्ड) पालिकेच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांप्रमाणे मासिक वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर समाधानकारक तोडगा निघाल्याने प्रस्तावित संप मागे घेत असल्याचे मार्डने जाहीर केले.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात मार्ड ही राज्यातील सर्व सरकारी आणि महापालिका वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांची संघटना आहे. या संघटनेच्या वतीने, मुंबई महापालिकेच्‍या वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्‍युत्‍तर निवासी विद्यार्थ्‍यांनी उद्या २२ जुलैला संपाची हाक दिली होती. पगारामध्‍ये वाढ, वसतिगृहामध्ये (हॉस्टेल) अधिक चांगल्‍या सुविधा तसेच इतर काही मागण्‍यांसाठी त्‍यांनी संपाचा इशारा दिला होता.

या अनुषंगाने पालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत मार्डसमवेत बैठक पार पडली. उपायुक्‍त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. नीलम अंद्राडे, वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्व अधिष्‍ठातादेखील यावेळी उपस्थित होते.

या निर्णयानुसार पदव्युत्तर निवासी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मासिक वेतनात शासकीय महाविद्यालयातील वि‍द्यार्थ्‍यांप्रमाणे वेतन देण्‍याचे व महागाईभत्‍त्‍यात वाढ देण्‍याचे तसेच गत ५ महिन्‍यांची थकबाकी १० ऑगस्‍टपर्यंत देण्‍याचे पालिका प्रशासनाने मान्‍य केले आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content