Homeमुंबई स्पेशल‘तुळशी’पाठोपाठ ‘विहार’ तलावही...

‘तुळशी’पाठोपाठ ‘विहार’ तलावही ओव्हरफ्लो!

मुंबई महापालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा दुसरा तलाव ‘विहार’, आज सकाळी ९ वाजता भरून वाहू लागला.

दोनच दिवसांपूर्वी मुंबईतच असलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा तुळशी, हा कृत्रिम तलाव भरून वाहू लागला होता. विहार तलावही मुंबईत असलेला दुसरा तलाव आहे. हा तलावही कृत्रिम तलाव आहे. गेल्या वर्षी विहार तलाव ५ ऑगस्‍ट २०२० रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला होता. तुळशी तलावाआधी पवई, हा कृत्रिम तलावही भरून वाहू लागला आहे. मात्र, या तलावातले पाणी पिण्यासाठी योग्य नसल्यामुळे ते औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते.

२७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष २०१९मध्ये ३१ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍याआधीच्‍या वर्षी म्‍हणजेच २०१८मध्‍ये १६ जुलैला विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.

मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव सर्वात लहान दोन तलावांपैकी एक असून यापैकी तुळशी तलाव सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

विहार तलावाबाबत महत्त्वाची माहिती

मुंबई महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. या तलावाचे बांधकाम सन १८५९मध्ये पूर्ण झाले. त्याच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र जवळजवळ सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा २७,६९८ दशलक्ष लीटर असतो. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते.

Continue reading

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात उभा राहतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...
Skip to content