Homeएनसर्कल'तुळशी' वाहू लागला!...

‘तुळशी’ वाहू लागला! पाण्याची चिंता कमी होणार!!

मुंबईला पाणीपुरवठा करणारा आणि मुंबई महापालिका क्षेत्रातच असणारा महापालिकेचा  ‘तुळशी’ तलाव आज (१६ जुलै) सकाळी ११ वाजता पूर्ण भरून वाहू लागला आहे. गेल्या वर्षी २७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता. याचाच अर्थ यंदा हा तलाव ११ दिवस आधीच भरून वाहू लागला आहे. तुळशी तलावाचे पाणी पिण्याकरीता वापरले जाते. त्यामुळे मुंबईकरांना भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थोडा सौम्य होण्याची शक्यता आहे.

८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष २०१९मध्ये १२ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍याआधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८मध्‍ये ९ जुलैला; वर्ष २०१७मध्‍ये १४ ऑगस्‍ट रोजी आणि वर्ष २०१६मध्‍ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.

मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

तुळशी तलाव मुंबई महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) अंतरावर आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८७९मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी तेव्हा सुमारे ४० लाख रुपये खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर एवढा (८०४६ दशलक्ष लीटर) असतो. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी विहार तलावाला जाऊन मिळते.

१२ जूनला दुपारी पवई तलाव भरून वाहू लागला. गेल्या वर्षाच्या तुलनेत २४ दिवस आधी हा तलाव भरून वाहिला. १८९०मध्ये ४० लाख रूपये खर्चून तो बांधण्यात आला होता. त्याचे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे त्याचा प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापर केला जातो.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content