Homeकल्चर +संदीप खरेंच्या आवाजात...

संदीप खरेंच्या आवाजात ऐका ‘मी.. कालिदास’!

आषाढस्य प्रथम दिवसे.. म्हणजे आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिवस म्हणून साजरा केला जातो. याचे कारण कवी कालिदासाने मेघदूत हे अजरामर काव्य लिहिले. हा दिवस रविवारी ११ जुलै रोजी येत आहे. ‘स्टोरीटेल मराठी’ने यानिमित्ताने ‘मी.. कालिदास’ ही डॉ. मंगला मिरासदार लिखित चरित्रात्मक कादंबरी ऑडिओबुक स्वरूपात प्रकाशित करत आहे. लोकप्रिय कवी, गायक आणि अभिनेता संदीप खरे यांच्या गोड आवाजात ‘मी.. कालिदास’ ऐकणं ही रसिक श्रोत्यांसाठी आणखी एक पर्वणी आहे.

भारतभूमीच्या इतिहासात रसिकांच्या हृदयावर विराजमान झालेले एक अनोखे व्यक्तिमत्व म्हणजे कालिदास. काव्य, नाट्य, शृंगार आदी नऊ रसांनी बहरलेल्या वाङ्मयीन कलाकृती निर्माण करणारा कालिदास हा सदैव सर्व रसिकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. त्याचे जीवन समजून घेणे सोपे नसले तरी मंगला मिरासदार यांनी लिहिलेल्या ‘मी.. कालिदास’ या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ग्रंथामधून कालिदासाच्या जीवनप्रवासाची ओळख करुन घेण्याची संधी या ऑडिओबुकमध्ये रसिक श्रोत्यांना लाभली आहे.

कालिदासाबद्दल सांगितल्या जाणार्‍या आख्यायिकांमधून, कालिमातेने प्रसन्न होऊन त्याला प्रतिभेच्या दिव्य गुणाचे वरदान दिले, असे म्हटले जात असले तरी लेखिकेने कालिदासाच्या वेगळ्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला आहे. कालिदासाने अवगत केलेल्या काव्य व शास्त्र या कला आणि त्यातील निपुणता त्याने किती कष्टाने साध्य केली हे वाचकांसमोर आणले आहे.

कालिदास हा नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. कालिदास कधी होऊन गेला हे केवळ त्यांच्या वाङ्मयीन कलाकृतीच्या अभ्यासाने अंदाज बांधून ठरवावे लागते. असे असले तरी कालिदासाच्या काव्य – नाट्य – कलाकृती आजही मनाला भुरळ घालतात, अभ्यासल्या जातात. कालिदासाचा मेघदूत तरुण-तरुणींना आजही स्वप्नमय दुनियेत घेऊन जातो. असा कालिदास अभ्यासणे सोपे नाही. मंगला मिरासदार यांनी आपल्या लेखनशैलीने सर्वांना समजणाऱ्या कादंबरीच्या परिभाषेत तो प्रस्तुत केला आहे.

‘मी.. कालिदास’ या अत्यंत वेगळ्या आणि वैशिट्यपूर्ण कादंबरीच्या लेखिका डॉ. मंगला मिरासदार पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात संस्कृत विषयाच्या प्राध्यापक होत्या. कौटिल्य अर्थशास्त्राच्या तज्ज्ञ म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांनी ‘मी.. कालिदास’सोबतच ‘श्री सत्यसाई’, ‘घोषवती’, ‘राजमुद्रा अर्थात मुद्राक्षसम’, ‘कथा सुभाषितांच्या’, ‘कौटिलीय अर्थशास्त्र – एक अध्ययन’ तसेच इंग्रजीतील ‘द पॉलिटिकल आयडीयाज इन द पंचमहाकाव्यज’ अशा  विविध विषयांवरील ग्रंथनिर्मिती केली आहे. ११ जुलैला कालिदास दिवसाचे औचित्य साधून कालिदासांवर निस्सीम प्रेम करणारे त्यांचे चाहते या चरित्ररूपी कादंबरीचे निश्चितच स्वागत करतील. ‘मी.. कालिदास’ ऐकण्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ डाउनलोड करावे लागेल.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content