Homeबॅक पेजघोष ट्रॉफी क्रिकेटमध्ये...

घोष ट्रॉफी क्रिकेटमध्ये एमआयजी आणि डॅशिंग अंतिम फेरीत

एमआयजी क्रिकेट क्लब (वांद्रे) या संघाने साईनाथ स्पोर्ट्स क्लबची घोडदौड संपुष्टात आणत चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यांना हे यश मिळवून देण्यात सलामी फलंदाज महेक मिस्त्रीची आक्रमक फलंदाजी कारणीभूत ठरली. तिने ५९ चेंडूत १० चौकार मारत नाबाद ७४ धावा फटकावल्या. त्यामुळे तिच्या संघाला साईनाथची ४ बाद १२६ ही तशी माफक धावसंख्या १९ षटकांमध्ये पार करता आली. त्यांची गाठ आता डॅशिंग स्पोर्ट्सशी उद्या बुधवारी माटुंगा जिमखान्यावर होईल.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने स्पोर्टिंग युनियनने कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेमसह आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये नॅशनल क्रिकेट क्लबचा ८ विकेट्सनी पराभव करून डॅशिंग स्पोर्ट्सने एमआयजीशी लढण्यासाठी आपली सिद्धता केली. नॅशनलला २० षटकांत केवळ ९ बाद ८६ अशी मजल मारता आली. त्यांची ध्रुवी त्रिवेदी ही १८ धावांची सर्वोच्च खेळी करू शकली. निलाक्षी तलाठी आणि श्रेया सुरेश यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. डॅशिंगने १५ षटकांमध्ये आपले लक्ष्य पार केले. २ बाद १८ नंतर खुशी निजाई (नाबाद २७) आणि किमया राणेने (नाबाद ३२) ६९ धावांची अभेद्य भागिदारी केली.

आजच्या पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये साईनाथने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण तो तसा चुकीचा ठरला. सलामीची अंशू पाल आणि या स्पर्धेत एका शतकासह दोन अर्धशतके फटकावणारी किंजल कुमारी केवळ ४ धावांवर बाद झाल्याने त्यांची २ बाद ८ अशी अवस्था झाली. त्यानंतर शेजल विश्वकर्मा (५७ चेंडूत ५७ आणि वेदिका पाटील ५३ चेंडूत ५२) यांनी ११५ धावांची भागीदारी केली खरी, पण त्यामुळे एमआयजीसमोर फार मोठे लक्ष्य साईनाथला ठेवता आले नाही. महेक मिस्त्रीने आपल्या ऑफ स्पिनवर ४ षटके टाकत स्वत:ची उपयुक्ततापण सिद्ध केली.

संक्षिप्त धावफलक

साईनाथ स्पोर्ट्स क्लब-  २० षटकांमध्ये ४ बाद १२६ (सेजल विश्वकर्मा ५७, वेदिका राजेश पाटील ५२)

पराभूत वि.

एमआयजी क्रिकेट क्लब- १९ षटकात ४ बाद १२७ (महेक मिस्त्री नाबाद ७४)

सर्वोत्तम खेळाडू- महेक मिस्त्री

नॅशनल क्रिकेट क्लब- २० षटकांमध्ये ९ बाद ८६ (ध्रुवी त्रिवेदी १८, पूर्ती नाईक २८/२, निलाक्षी तलाठी १०/२, श्रेया सुरेश ८/२, तिशा नाईक २५/२)

पराभूत वि.

डॅशिंग स्पोर्ट्स- १५ षटकांत २ बाद ८७ (किमया राणे ३२ नाबाद, खुशी निजाई २७ नाबाद, तनिषा शर्मा १०/२)

सर्वोत्तम खेळाडू- निलाक्षी तलाठी

Continue reading

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...

सुभाष देसाई लॉ कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

मुंबईतल्या सुभाष देसाई लॉ कॉलेजमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायिक अधिकारी पवन तापडिया आणि उत्तर विभाग गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला....

का लवकर होतो तंबाखू चघळणाऱ्या व्यक्तींना तोंडाचा कर्करोग?

तंबाखू चघळणाऱ्या काही व्यक्तींना तोंडाचा कर्करोग लवकर का होतो? याचे उत्तर टाटा मेमोरियल सेंटरच्या नवीन जीनोम-वाइड अभ्यासातून उघड झाले आहे. मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटर येथील एसीटीआरईसीमधल्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी यांनी केलेल्या एका जीनोम-वाईड असोसिएशन स्टडीमध्ये असे प्रमुख अनुवांशिक...
Skip to content