Homeपब्लिक फिगरमौदामधल्या पूल-रस्त्यांमुळे व्यवसायवृद्धी!

मौदामधल्या पूल-रस्त्यांमुळे व्यवसायवृद्धी!

नागपूरच्या मौदा तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग 53वरील नागपूर वैनगंगा ब्रिज सेक्शनवर मौदा वाय जंक्शनच्या सहा लेन उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन  झाल्यामुळे रामटेक आणि मौदा हे तालुके उमेरड आणि कुही तालुक्यांना जोडले जातील तसेच या पुलामुळे नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना कनेक्टेव्हिटी मिळून येथील व्यवसायालादेखील चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल मौदा येथे केले.  

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग 53वरील नागपूर वैनगंगा ब्रिज सेक्शनवर मौदा वाय जंक्शनच्या सहा लेन उड्डाणपूलांच बांधकाम, गोवरी कोरगाव राजोला मौदा येथे कन्नड नदीवरील पुलाच बांधकाम, रामटेक-मौदा मार्गाचे चौपदरीकरण त्याचप्रमाणे माथनी गावाजवळ कन्नड नदीवरील पुलाचं मजबुतीकरण या तब्बल 200 कोटींच्यावर निधीच्या तरतुदीने करण्यात येणाऱ्या चार कामांचं भूमिपूजन मौदा वाय जंक्शन त्याचप्रमाणे मौदा तालुक्यातील गोवरी या ठिकाणी गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते. या सहा लेन उड्डाणपुलाला मौदा भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत महादेव वाडीभस्मे यांचे नाव देण्याचे आश्वासनदेखील गडकरी यांनी यावेळी दिले.

उमरेड ते अंभोरा आणि पवनी ते भंडाराकडे जाणाऱ्या रस्त्यालासुद्धा पर्यावरण खात्याची परवानगी मिळाल्याने चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. भूमीपूजन झालेल्या बांधकामामुळे मौदामधील अपघातप्रवण ब्लॅक स्पॉटची दुरस्ती होणार होईल, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.

कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांनी सांगितलं की, या भूमिपूजनामुळे या तालुक्यातील दळणवळणाची सुविधा चांगली होणार असून हा मौदा, बुटीबोरी, उमरेड, कुही तालुक्याकरिता आनंदाचा क्षण आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनवार यांनी या चारही प्रकल्पाबद्दल माहिती दिली.

या चारही प्रकल्पामुळे दळणवळणाची सुविधा देणाऱ्या अत्याधुनिक रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन यामार्फत सुलभ सुरक्षित प्रवास आणि मालवाहतूक होणार आहे तसेच वेळ आणि इंजिनाची बचत होऊन वाहतुकीची कोंडीसुद्धा टळणार आहे.

Continue reading

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...

तृप्ती देसाईंच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंचा पलटवार!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिला नेतृत्त्वावरून नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत तातडीची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही नेत्यांमधील...

युद्धाच्या वणव्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!

पश्चिम आशियातील युद्धाचा ३१वा दिवस जागतिक अर्थव्यवस्थेसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे थेट पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड...
Skip to content