Homeन्यूज अँड व्ह्यूजआता नव्याने दुमदुमणार...

आता नव्याने दुमदुमणार भारतीय दलित पँथरची भिमगर्जना!

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय दलित पँथर पुनरूज्जीवित करण्यात येणार आहे. राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, साहित्यीक, पत्रकारांशी आणि निवडक ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी विचारविनीमय केल्यानंतर आठवले यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

या बदलत्या राजकीय सामाजिक घडामोडीत रिपब्लिकन पक्षाची भविष्यातील वाटचाल काय असेल यावर आज विचारमंथन करण्यात आले. त्यात रिपब्लिकन पक्षांशी संलग्न असणाऱ्या सामाजिक संघटनेची स्थापना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त झाले. ज्या दलित पँथरच्या चळवळीतून रामदास आठवलेंचे नेतृत्त्व उभे राहिले त्या भारतीय दलित पँथरची पुर्नस्थापना करावी अशी सूचना या बैठकीत सर्वसंमतीने मंजूर झाली. त्यामुळे आगामी काळात रामदास आठवले यांची भारतीय दलित पँथर पुन्हा एकदा भिमगर्जना करेल आणि भारतीय दलित पँथरचे वादळ पुन्हा तरुणांमध्ये घोंगावताना दिसेल, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

1970च्या दशकात दलित पँथरची स्थापना झाली. दलित पँथर राजा ढाले यांनी विसर्जित केल्यानंतर रामदास आठवले यांच्या पुढाकारात भारतीय दलित पॅंथरचे संगठन उभे राहिले. आणि ते देशभर भारतीय दलित पँथर रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वात वादळासारखे घोंगावत राहिले. दलितांच्या सामाजिक प्रश्नांवर त्यांनी प्रचंड मोठी आंदोलने केली. एक आक्रमक कृतीशील सामाजिक संघटन म्हणून भारतीय दलित पँथरने देशभरातील दलितांचा विश्वास संपादित केला. त्या विश्वासावर रामदास आठवले यांच्यातला पँथर भिमगर्जना करीत देशभर आणि जगभर यांचे नेतृत्त्व पोहोचले.

आता पुन्हा रामदास आठवले पँथरच्या आवेशात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात भिमगर्जना करणार आहेत. त्यामुळे नव्या पिढीच्या हाती भारतीय दलित पँथरचे क्रांतीकारी आक्रमक संघटन ते सोपवणार आहेत. आठवले यांच्यातला पँथर पुन्हा अन्याय-अत्याचारांवर झेप घेणार आहे. या बैठकीला विचारवंत साहित्यीक शरणकुमार लिंबाळे, एड. दिलीप काकडे, रिपाइंचे अविनाश महातेकर, आजचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, गौतम सोनवणे, बाबुराव कदम, मिलींद शेळके, ब्रह्मानंद चव्हाण, परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे आदी उपस्थित होते.  

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content