Homeन्यूज अँड व्ह्यूजआता नव्याने दुमदुमणार...

आता नव्याने दुमदुमणार भारतीय दलित पँथरची भिमगर्जना!

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय दलित पँथर पुनरूज्जीवित करण्यात येणार आहे. राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, साहित्यीक, पत्रकारांशी आणि निवडक ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी विचारविनीमय केल्यानंतर आठवले यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

या बदलत्या राजकीय सामाजिक घडामोडीत रिपब्लिकन पक्षाची भविष्यातील वाटचाल काय असेल यावर आज विचारमंथन करण्यात आले. त्यात रिपब्लिकन पक्षांशी संलग्न असणाऱ्या सामाजिक संघटनेची स्थापना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त झाले. ज्या दलित पँथरच्या चळवळीतून रामदास आठवलेंचे नेतृत्त्व उभे राहिले त्या भारतीय दलित पँथरची पुर्नस्थापना करावी अशी सूचना या बैठकीत सर्वसंमतीने मंजूर झाली. त्यामुळे आगामी काळात रामदास आठवले यांची भारतीय दलित पँथर पुन्हा एकदा भिमगर्जना करेल आणि भारतीय दलित पँथरचे वादळ पुन्हा तरुणांमध्ये घोंगावताना दिसेल, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

1970च्या दशकात दलित पँथरची स्थापना झाली. दलित पँथर राजा ढाले यांनी विसर्जित केल्यानंतर रामदास आठवले यांच्या पुढाकारात भारतीय दलित पॅंथरचे संगठन उभे राहिले. आणि ते देशभर भारतीय दलित पँथर रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वात वादळासारखे घोंगावत राहिले. दलितांच्या सामाजिक प्रश्नांवर त्यांनी प्रचंड मोठी आंदोलने केली. एक आक्रमक कृतीशील सामाजिक संघटन म्हणून भारतीय दलित पँथरने देशभरातील दलितांचा विश्वास संपादित केला. त्या विश्वासावर रामदास आठवले यांच्यातला पँथर भिमगर्जना करीत देशभर आणि जगभर यांचे नेतृत्त्व पोहोचले.

आता पुन्हा रामदास आठवले पँथरच्या आवेशात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात भिमगर्जना करणार आहेत. त्यामुळे नव्या पिढीच्या हाती भारतीय दलित पँथरचे क्रांतीकारी आक्रमक संघटन ते सोपवणार आहेत. आठवले यांच्यातला पँथर पुन्हा अन्याय-अत्याचारांवर झेप घेणार आहे. या बैठकीला विचारवंत साहित्यीक शरणकुमार लिंबाळे, एड. दिलीप काकडे, रिपाइंचे अविनाश महातेकर, आजचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, गौतम सोनवणे, बाबुराव कदम, मिलींद शेळके, ब्रह्मानंद चव्हाण, परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे आदी उपस्थित होते.  

Continue reading

माऊलींच्या कृपेने आळंदीतच विठ्ठल दर्शन घडले!

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने काल आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला...

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...
Skip to content