Homeन्यूज अँड व्ह्यूजआता नव्याने दुमदुमणार...

आता नव्याने दुमदुमणार भारतीय दलित पँथरची भिमगर्जना!

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय दलित पँथर पुनरूज्जीवित करण्यात येणार आहे. राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, साहित्यीक, पत्रकारांशी आणि निवडक ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी विचारविनीमय केल्यानंतर आठवले यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

या बदलत्या राजकीय सामाजिक घडामोडीत रिपब्लिकन पक्षाची भविष्यातील वाटचाल काय असेल यावर आज विचारमंथन करण्यात आले. त्यात रिपब्लिकन पक्षांशी संलग्न असणाऱ्या सामाजिक संघटनेची स्थापना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त झाले. ज्या दलित पँथरच्या चळवळीतून रामदास आठवलेंचे नेतृत्त्व उभे राहिले त्या भारतीय दलित पँथरची पुर्नस्थापना करावी अशी सूचना या बैठकीत सर्वसंमतीने मंजूर झाली. त्यामुळे आगामी काळात रामदास आठवले यांची भारतीय दलित पँथर पुन्हा एकदा भिमगर्जना करेल आणि भारतीय दलित पँथरचे वादळ पुन्हा तरुणांमध्ये घोंगावताना दिसेल, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

1970च्या दशकात दलित पँथरची स्थापना झाली. दलित पँथर राजा ढाले यांनी विसर्जित केल्यानंतर रामदास आठवले यांच्या पुढाकारात भारतीय दलित पॅंथरचे संगठन उभे राहिले. आणि ते देशभर भारतीय दलित पँथर रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वात वादळासारखे घोंगावत राहिले. दलितांच्या सामाजिक प्रश्नांवर त्यांनी प्रचंड मोठी आंदोलने केली. एक आक्रमक कृतीशील सामाजिक संघटन म्हणून भारतीय दलित पँथरने देशभरातील दलितांचा विश्वास संपादित केला. त्या विश्वासावर रामदास आठवले यांच्यातला पँथर भिमगर्जना करीत देशभर आणि जगभर यांचे नेतृत्त्व पोहोचले.

आता पुन्हा रामदास आठवले पँथरच्या आवेशात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात भिमगर्जना करणार आहेत. त्यामुळे नव्या पिढीच्या हाती भारतीय दलित पँथरचे क्रांतीकारी आक्रमक संघटन ते सोपवणार आहेत. आठवले यांच्यातला पँथर पुन्हा अन्याय-अत्याचारांवर झेप घेणार आहे. या बैठकीला विचारवंत साहित्यीक शरणकुमार लिंबाळे, एड. दिलीप काकडे, रिपाइंचे अविनाश महातेकर, आजचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, गौतम सोनवणे, बाबुराव कदम, मिलींद शेळके, ब्रह्मानंद चव्हाण, परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे आदी उपस्थित होते.  

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content