Homeचिट चॅटनौदलाचे कोविडसाठी ऑपरेशन...

नौदलाचे कोविडसाठी ऑपरेशन ‘समुद्र सेतू-2’ सुरू!

कोविड-19 महामारीविरोधात सुरू असलेल्या लढ्यात राष्ट्रीय स्तरावरच्या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या हेतूने, भारतीय नौदलाने ऑपरेशन ‘समुद्र सेतू-2’ सुरू केले आहे. या अंतर्गत, नौदलाच्या तिन्ही विभागातून म्हणजेच मुंबई, विशाखापट्टणम आणि कोची येथून भारताच्या युद्धनौका रवाना झाल्या आहेत. या नौकांमधून विविध मित्र राष्ट्रांकडून समुद्रमार्गे सध्या भारतात अत्यंत आवश्यक असलेले ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय साधने आणली जात जात आहेत.

पश्चिम समुद्रमार्गे काल दुपारी भारताची युद्धनौका आयएनएस तलवार बाहरीन इथून 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे दोन टॅंक घेऊन, भारतात कर्नाटकच्या न्यू मंगलोर पोर्टच्या धक्क्यावर पोहोचली. त्याशिवाय, आयएनएस कोलकाता कुवैतहून 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे दोन टॅंक घेऊन, 400 ऑक्सिजनयुक्त सिलेंडर्स, 47 काँसंट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय साधने घेऊन भारताकडे रवाना झाल्या आहेत. यासोबतच, आणखी चार युद्धनौका कुवैत तसेच कतार येथून 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे टॅंक आणि 1500पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स घेऊन येणार आहेत.

समुद्र सेतू

पूर्व समुद्रमार्गाने भारताची युद्धनौका आयएनएस ऐरावत सिंगापूरहून 3000पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स, 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे आठ टॅंक (216 टन), 10000 रॅपिड अँटीजेन टेस्ट कीट्स आणि 7 काँसंट्रेटर्स घेऊन भारताकडे रवाना झाली आहे. तसेच आयएनएस जलाश्व ही युद्धनौका सध्या नैऋत्य आशियात तैनात असून, परिस्थितीनुसार गरज भासल्यास, तिलाही त्या प्रदेशातील बंदरावर पाठवले जाऊ शकते.

आयएनएस शार्दूल, ही कोचीच्या तळावरील युद्धनौकादेखील आखाती देशांतून तीन द्रवरूप ऑक्सिजन भरलेले क्रायोजनिक कंटेनर्स घेऊन येत आहे. आयएनएस जलाश्व आणि आयएनएस शार्दूल यांनी गेल्यावर्षीच्या समुद्र सेतू अभियानातदेखील सहभाग घेतला होता.

गेल्या वर्षी नौदलाने जसे समुद्र सेतू अभियान राबवून हिंद महासागर प्रदेशातल्या-IOR देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले होते, तशाच प्रकारे, भारतीय नौदल आजही देशाच्या या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

1 COMMENT

  1. महिती अत्यंत उपयुक्त आहे…… असेच लिखाण व्हावे….

Comments are closed.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content