Homeपब्लिक फिगरयुवकांना अजिंठा परिसरातल्या...

युवकांना अजिंठा परिसरातल्या भू-वारसा स्थळांची माहिती हवी!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज अजिंठा येथे भू-वारसा शिबिराचे आयोजन केले होते. आपल्या परिसरातील भू-वारसा स्थळांची माहिती युवावर्गाला व्हावी त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे देशभर आयोजन करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 मध्ये विकसित भारताचे ध्येय दिले आहे. ते आपणा सर्वांना पूर्ण करायचे आहे. त्यादृष्टीने युवकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असे रावसाहेब पाटील दानवे म्हणाले. अशाप्रकारची माहिती विद्यार्थ्यांना आयुष्यभर मोलाची ठरणारी असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वारसा स्थळांची सहल घडवून आणावी, असे आवाहन मंत्र्यांनी केले.

देशात प्रथमच विकसित भारताचे ध्येय पूर्ण करण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करुन ठेवली आहे. भारताचा विकासाचा वेग पाहून जग भारताकडे आकर्षित होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे वाढते महत्त्व हे भारताची विकसित देशाकडे असलेली वाटचाल दर्शवते, असे ते म्हणाले. 

पुढे बोलताना राज्यमंत्री दानवे म्हणाले की, दळणवळणाची साधने आणि संपर्कव्यवस्था वाढल्याने विकासाला चालना मिळते. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परिसरात रेल्वेमार्गाच्या विकासाचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी भू-वारसा स्थळांसंबंधी आयोजित करण्यात आलेल्या विविध प्रश्नमंजूषेतील विद्यार्थ्यांना पारितोषकं प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खाण मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार शकील आलम, भारतीय भू-वैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. 

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content