Homeपब्लिक फिगर‘त्या’ १६ आमदारांच्या...

‘त्या’ १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच योग्य निर्णय!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्या १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल कायद्यानुसार लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

आपला चार दिवसांचा शासकीय दौरा आटोपून लंडनहून मुंबईत परतल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. उद्धव ठाकरे गटाच्या काही आमदारांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे दिलेल्या ७९ पानांच्या निवेदनाचाही अभ्यास केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

त्याआधी आज ठाकरे गटाच्या विधानसभा तसेच विधान परिषदेच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना विधान भवनातल्या कार्यालयात त्या १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल ७९ पानी निवेदन दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सर्व तपशील या निवेदनात समाविष्ट केला गेला आहे. या निर्णयाच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने या निवेदनाद्वारे केली आहे.

त्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. हा निर्णय तातडीने घ्यावा, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जोडून निवेदन दिले. अध्यक्ष अनुपस्थित असल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना हे निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर अध्यक्षांनी यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशा मागणीचे पत्र दिल्याचे ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी नंतर माध्यमांना सांगितले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content