Homeपब्लिक फिगरमराठा आरक्षणाबाबत राज्य...

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची इच्छाच नाही?

राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पण, तशी सरकारची इच्छाशक्ती हवी. या विषयावर सरकारने ११ न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जावे तसेच या विषयावर सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयन राजे भोसले यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.

राज्यात मराठा समाजाचे इतक्या प्रमाणात मोर्चे निघाले. आत्महत्त्या झाल्या गायकवाड समितीने मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाबद्दल आरक्षण द्यावे, अशी शिफारस केली. अशावेळी ५० टक्के आरक्षणाच्या चौकटीत न राहता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. तामिळनाडूसह ११ राज्ये तसा निर्णय घेऊ शकतात. पण, येथे सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही, असे ते म्हणाले.

तसा निर्णय घेतला तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल, असे सरकार म्हणते. तसा अवमान झाल्याचा मुद्दा आला तर तर तो आमच्यावर ढकला. आम्ही त्याला तोंड देऊ. डान्स बारच्या संदर्भात तीन वेळा न्यायालयाचा अवमान सरकारने केलाच ना, मग तेव्हा कसा निर्णय घेतला, असा सवाल त्यांनी केला. आज मराठा समाजाचा तरूण दिशाहीन झाला आहे. एकदा वेळ निघून गेली की मग काही करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...

आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! 

आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा...
Skip to content