Homeपब्लिक फिगरसंजय गांधी राष्ट्रीय...

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोठ्या प्रमाणात टाकले जाते डेब्रिज!

मुंबईचे फुफ्फुस म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ओळख आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील झाडे-झुडपे, हिरवळ नष्ट करत रोज शेकडो ट्रक, टेम्पो इमारतींचे डेब्रिज येथे टाकून पर्यावरणला मोठी हानी पोहोचवत आहेत, असे सांगत मागाठाणे येथील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी यासाठी जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या उद्यानातील काजूपाडा, हनुमान नगर येथे ट्रकमधून रोज डेब्रिज टाकण्यात येत असल्याने येथील झाडे नष्ट झाली आहेत. डेब्रिजमुळे येथे मोठे डोंगर झाल्याचे चित्र आहे. दरवर्षी आपण झाडे लावा, झाडे जगवा, या उक्तीप्रमाणे पावसाळ्यात सुमारे एक लाख झाडे लावतो आणि भूमाफिया अशाप्रकारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काजूपाडा, हनुमान नगर येथे ट्रक, टेम्पोमधून रोज डेब्रिज टाकतात. त्यामुळे येथील पर्यावरणाला मोठी हानी पोहोचत आहे. जर आदिवासी बांधवांनी आणि नागरिकांनी आपल्या घरांची डागडुजी केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येते. मात्र पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

याप्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री व वन मंत्र्यांनी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि येथील पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content