Homeपब्लिक फिगरघोटाळे करण्यात ज्यांची...

घोटाळे करण्यात ज्यांची हयात गेली त्यांना त्रास होणारच!

ज्यांची हयात घोटाळे करण्यात गेली त्यांना काँक्रीटचे रस्ते होत आहेत याचा त्रास होणारच. कारण त्यामुळे ४० वर्षे रस्तेच बनवता येणार नाहीत. दरवर्षी डांबरी रस्ते बनवायचे आणि त्यातून भ्रष्टाचार करायचा हे आता बंद होणार आहे. त्यांची दुकानदारी बंद करण्याचे हे काम असल्यामुळे यांची ओरड चालली आहे. जनता त्यांना उत्तर देईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर पलटवार केला.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे करत आहेत. त्यांचे नाव न घेता फडणवीस यांनी त्यांना टोला लगावला. २०१८ साली सुमारे २०० रस्त्यांची चौकशी झाली होती. या चौकशीत या रस्त्यांना खालचा लेयरच टाकण्यात आला नव्हता असे आढळून आले. आता सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने यांची दुकानदारी बंद होणार आहे. इनका गोरखधंदा बंद होगा, यही उनका दर्द है… अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना सुनावले.

मी मुख्यमंत्री असताना एसटीपी योजनांसाठी केंद्र सरकारकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून आणल्या होत्या. परंतु टक्केवारी ठरली नाही म्हणून हे टेंडर काढू शकले नाहीत. आता आमचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई महापालिकेने याच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे या कामाचे क्रेडिट घेण्याचा यांना हक्कच नाही, असे ते म्हणाले. १५ वर्षे ज्यांना ते करता आले नाही ते एसटीपी प्रोजेक्ट आमच्या काळात झाले असे कसे म्हणू शकतात? तसे म्हणण्याचा यांना अधिकारच काय, असा सवालच फडणवीस यांनी केला. यांच्या काळात हाती घेण्यात आलेला ब्रीमस्टोवॅड प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे इतर प्रकल्पांवर हे काय बोलणार, असेही ते म्हणाले.

संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, झोपेत बोलणारे हे लोक आहेत. मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते. आणि आता त्याचे उद्घाटनही तेच करणार आहेत. त्यामुळे आमच्या काळात झालेल्या योजनांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान येत आहेत, या बोलण्यात काही तथ्य नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्याचा मुंबईचा दौरा अपेक्षेपेक्षा जास्त चांगला होईल. अपेक्षेपेक्षा जास्त मोठा जनसागर येथे उसळेल. त्यामुळे सर्व व्यवस्थेची खात्री करून घेण्यासाठी आम्ही आज आढावा घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content