Homeपब्लिक फिगरघोटाळे करण्यात ज्यांची...

घोटाळे करण्यात ज्यांची हयात गेली त्यांना त्रास होणारच!

ज्यांची हयात घोटाळे करण्यात गेली त्यांना काँक्रीटचे रस्ते होत आहेत याचा त्रास होणारच. कारण त्यामुळे ४० वर्षे रस्तेच बनवता येणार नाहीत. दरवर्षी डांबरी रस्ते बनवायचे आणि त्यातून भ्रष्टाचार करायचा हे आता बंद होणार आहे. त्यांची दुकानदारी बंद करण्याचे हे काम असल्यामुळे यांची ओरड चालली आहे. जनता त्यांना उत्तर देईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर पलटवार केला.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे करत आहेत. त्यांचे नाव न घेता फडणवीस यांनी त्यांना टोला लगावला. २०१८ साली सुमारे २०० रस्त्यांची चौकशी झाली होती. या चौकशीत या रस्त्यांना खालचा लेयरच टाकण्यात आला नव्हता असे आढळून आले. आता सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने यांची दुकानदारी बंद होणार आहे. इनका गोरखधंदा बंद होगा, यही उनका दर्द है… अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना सुनावले.

मी मुख्यमंत्री असताना एसटीपी योजनांसाठी केंद्र सरकारकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून आणल्या होत्या. परंतु टक्केवारी ठरली नाही म्हणून हे टेंडर काढू शकले नाहीत. आता आमचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई महापालिकेने याच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे या कामाचे क्रेडिट घेण्याचा यांना हक्कच नाही, असे ते म्हणाले. १५ वर्षे ज्यांना ते करता आले नाही ते एसटीपी प्रोजेक्ट आमच्या काळात झाले असे कसे म्हणू शकतात? तसे म्हणण्याचा यांना अधिकारच काय, असा सवालच फडणवीस यांनी केला. यांच्या काळात हाती घेण्यात आलेला ब्रीमस्टोवॅड प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे इतर प्रकल्पांवर हे काय बोलणार, असेही ते म्हणाले.

संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, झोपेत बोलणारे हे लोक आहेत. मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते. आणि आता त्याचे उद्घाटनही तेच करणार आहेत. त्यामुळे आमच्या काळात झालेल्या योजनांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान येत आहेत, या बोलण्यात काही तथ्य नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्याचा मुंबईचा दौरा अपेक्षेपेक्षा जास्त चांगला होईल. अपेक्षेपेक्षा जास्त मोठा जनसागर येथे उसळेल. त्यामुळे सर्व व्यवस्थेची खात्री करून घेण्यासाठी आम्ही आज आढावा घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content