HomeArchive'अभिनंदन'चे अभिनंदन!

‘अभिनंदन’चे अभिनंदन!

Details
‘अभिनंदन’चे अभिनंदन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची सुटका करण्यात येणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकच्या संसदेत केली आहे. अटक झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात अभिनंदन यांची होत असलेली मुक्तता अभिनंदनीय आहे. अभिनंदन यांचे मन:पूर्वक अभिनंदन. खरं म्हणजे भारतीय हवाई दलाने हल्ला केल्यापासून इम्रान खान यांनी समझोत्याच्या गोष्टी सुरू केल्या होत्या. युद्ध सुरू झाल्यास त्याचे भयंकर परिणाम होतील. दोन्ही देशांच्या हाती मग पुढची परिस्थिती राहणार नाही, असेही ते म्हणाले होते. पाकिस्तानला युद्ध नको असल्याचे संकेतच त्यांनी दिले होते. आता भारतीय वैमानिकाला मुक्त करण्याची घोषणा करून पाकिस्तानने नांगी टाकली आहे. इम्रान खान यांनी ही, नाइलाजाने का होईना, घेतलेली सकारात्मक भूमिका दोन्ही देशांच्या दृष्टीने हितकारक आहे. पाकिस्तानला युद्ध परवडणारे नाही हे ओळखूनच भारतीय वैमानिकाला मुक्त करण्याचा समजूतदारपणा इम्रान खानने दाखविला आहे. पाकिस्तानने भारतापुढे अक्षरश: शरणागती पत्करली आहे. पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी भारताने युद्ध सुरू होण्याआधीच जिरवली आहे. त्याबद्दल जाँबाज भारतीय जवानांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. तथापि, आता भारतातील सत्ताधारी पक्षाने परिपक्वता दाखविण्याची खरी गरज आहे.

 

गेल्या दोन दिवसांत ज्या घटना घडल्या त्या शोभनीय नव्हत्या. दुर्दैवाने भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यात भारताचा एक वैमानिक पाकिस्तानात कैद झाल्यानंतर त्याला सोडवून भारतात सुखरूप परत आणणे हा भारत सरकारचा अग्रक्रमाचा कार्यक्रम असायला हवा होता. पण, तसे घडले नाही. भाजपचा आणि भाजपच्या नेत्यांचा डोळा सतत येत्या मे मध्ये होत असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांवर आहे. त्यामुळे ते प्रचारात गढून गेले होते. भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाला अटक होऊन दोन दिवस झाल्यानंतरही भाजपचा भर निवडणूक प्रचारावरच होता. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संवाद होता, अशी फुशारकी वर भाजपने मारली होती. एकीकडे भारताचे जवान शहीद होत असताना, देशात युद्धाचे वारे वाहत असताना, सर्वसामान्य माणूस जीव मुठीत धरून जगत असताना भाजप मात्र या वातावरणाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करीत असल्याचे धक्कादायक चित्र गेल्या दोन दिवसात दिसले. भाजपचे नेते निर्लज्जपणे निवडणुकीतील विजयाची स्वप्ने पाहात असल्याचेही आढळून आले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी तर निर्लज्जपणाचा कळसच केला. ते म्हणाले, `मंगळवारी पाकिस्तानातील जैश-ए-महम्मदच्या दहशतवादी केंद्रांवर भारताने हवाई हल्ला चढविल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशात लाट आली आहे. येत्या निवडणुकीत भाजप कर्नाटकातील लोकसभेच्या 28 पैकी 22 जागा नक्कीच जिंकेल′. येडियुरप्पा यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली. त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.

एकिकडे मोदी पक्ष कार्यकर्त्यांशी निवडणूक प्रचाराबाबत सर्वात मोठा व्हिडिओ संवाद साधत असताना, येडियुरप्पा मोदींची लाट आल्याचे स्वप्न पाहत असताना, दुसरीकडे काँग्रेसने मात्र गुरूवारी होणार असलेली आपल्या वर्कींग कमिटिची बैठक पुढे ढकलली. दिल्लीला राज्याचा दर्जा मिळावा म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आमरण उपोषण करणार होते. पण देशापुुढील संकट लक्षात घेऊन त्यांनीदेखील आपले आंदोलन पुढे ढकलले. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती विरोधी पक्षांपासून अलीकडे दुरावल्या आहेत. पण भाजपच्या प्रचारात गढलेल्या मोदींवर हल्ला चढविण्यात त्यादेखील मागे राहिल्या नाहीत. मायावती यांच्याशी हातमिळवणी करून आगामी लोकसभा निवडणुक लढवित असलेले समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांंनीदेखील मोदींवर निशाना साधला आहे. सारांश, पंतप्रधान मोदी आणि भाजप यांचा निवडणूक प्रचार म्हणजे प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. तो तिरस्कारणीय आणि निषेधार्ह आहे. आता भारतीय वैमानिकाच्या मुक्ततेनंतर मोदी आणि कंपनीला चेव आल्यास नवल नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी शहीदांच्या बलिदानाचे पावित्र्य कायम राखावे. त्याचे मार्केटिंग करू नये हीच आमची संबंधितांना कळकळीची विनंती.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची सुटका करण्यात येणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकच्या संसदेत केली आहे. अटक झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात अभिनंदन यांची होत असलेली मुक्तता अभिनंदनीय आहे. अभिनंदन यांचे मन:पूर्वक अभिनंदन. खरं म्हणजे भारतीय हवाई दलाने हल्ला केल्यापासून इम्रान खान यांनी समझोत्याच्या गोष्टी सुरू केल्या होत्या. युद्ध सुरू झाल्यास त्याचे भयंकर परिणाम होतील. दोन्ही देशांच्या हाती मग पुढची परिस्थिती राहणार नाही, असेही ते म्हणाले होते. पाकिस्तानला युद्ध नको असल्याचे संकेतच त्यांनी दिले होते. आता भारतीय वैमानिकाला मुक्त करण्याची घोषणा करून पाकिस्तानने नांगी टाकली आहे. इम्रान खान यांनी ही, नाइलाजाने का होईना, घेतलेली सकारात्मक भूमिका दोन्ही देशांच्या दृष्टीने हितकारक आहे. पाकिस्तानला युद्ध परवडणारे नाही हे ओळखूनच भारतीय वैमानिकाला मुक्त करण्याचा समजूतदारपणा इम्रान खानने दाखविला आहे. पाकिस्तानने भारतापुढे अक्षरश: शरणागती पत्करली आहे. पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी भारताने युद्ध सुरू होण्याआधीच जिरवली आहे. त्याबद्दल जाँबाज भारतीय जवानांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. तथापि, आता भारतातील सत्ताधारी पक्षाने परिपक्वता दाखविण्याची खरी गरज आहे.

 

गेल्या दोन दिवसांत ज्या घटना घडल्या त्या शोभनीय नव्हत्या. दुर्दैवाने भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यात भारताचा एक वैमानिक पाकिस्तानात कैद झाल्यानंतर त्याला सोडवून भारतात सुखरूप परत आणणे हा भारत सरकारचा अग्रक्रमाचा कार्यक्रम असायला हवा होता. पण, तसे घडले नाही. भाजपचा आणि भाजपच्या नेत्यांचा डोळा सतत येत्या मे मध्ये होत असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांवर आहे. त्यामुळे ते प्रचारात गढून गेले होते. भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाला अटक होऊन दोन दिवस झाल्यानंतरही भाजपचा भर निवडणूक प्रचारावरच होता. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संवाद होता, अशी फुशारकी वर भाजपने मारली होती. एकीकडे भारताचे जवान शहीद होत असताना, देशात युद्धाचे वारे वाहत असताना, सर्वसामान्य माणूस जीव मुठीत धरून जगत असताना भाजप मात्र या वातावरणाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करीत असल्याचे धक्कादायक चित्र गेल्या दोन दिवसात दिसले. भाजपचे नेते निर्लज्जपणे निवडणुकीतील विजयाची स्वप्ने पाहात असल्याचेही आढळून आले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी तर निर्लज्जपणाचा कळसच केला. ते म्हणाले, `मंगळवारी पाकिस्तानातील जैश-ए-महम्मदच्या दहशतवादी केंद्रांवर भारताने हवाई हल्ला चढविल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशात लाट आली आहे. येत्या निवडणुकीत भाजप कर्नाटकातील लोकसभेच्या 28 पैकी 22 जागा नक्कीच जिंकेल′. येडियुरप्पा यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली. त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.

एकिकडे मोदी पक्ष कार्यकर्त्यांशी निवडणूक प्रचाराबाबत सर्वात मोठा व्हिडिओ संवाद साधत असताना, येडियुरप्पा मोदींची लाट आल्याचे स्वप्न पाहत असताना, दुसरीकडे काँग्रेसने मात्र गुरूवारी होणार असलेली आपल्या वर्कींग कमिटिची बैठक पुढे ढकलली. दिल्लीला राज्याचा दर्जा मिळावा म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आमरण उपोषण करणार होते. पण देशापुुढील संकट लक्षात घेऊन त्यांनीदेखील आपले आंदोलन पुढे ढकलले. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती विरोधी पक्षांपासून अलीकडे दुरावल्या आहेत. पण भाजपच्या प्रचारात गढलेल्या मोदींवर हल्ला चढविण्यात त्यादेखील मागे राहिल्या नाहीत. मायावती यांच्याशी हातमिळवणी करून आगामी लोकसभा निवडणुक लढवित असलेले समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांंनीदेखील मोदींवर निशाना साधला आहे. सारांश, पंतप्रधान मोदी आणि भाजप यांचा निवडणूक प्रचार म्हणजे प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. तो तिरस्कारणीय आणि निषेधार्ह आहे. आता भारतीय वैमानिकाच्या मुक्ततेनंतर मोदी आणि कंपनीला चेव आल्यास नवल नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी शहीदांच्या बलिदानाचे पावित्र्य कायम राखावे. त्याचे मार्केटिंग करू नये हीच आमची संबंधितांना कळकळीची विनंती.”
 

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content