HomeArchive‘एमएसएमई’च्या सुधारीत मर्यादा...

‘एमएसएमई’च्या सुधारीत मर्यादा लागू करण्याचे रिझर्व्ह बँकेचे आदेश!

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
केंद्र सरकारने ‘आत्मनिर्भर पॅकेज’ घोषित करताना एमएसएमई क्षेत्राच्या वाढवलेल्या मर्यादा लागू करण्याचे दिलेले आदेश लागू करावेत, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँका, आर्थिक संस्था तसेच नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना दिल्याची माहिती ‘फिक्की’चे संचालक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
 
केंद्र सरकारने आत्मनिर्भर पॅकेज घोषित करताना सेवा क्षेत्र व उत्पादन क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना एकत्रित करून पात्रता निकष सुधारीत करताना एक कोटींची गुंतवणूक व 5 कोटी रूपयांची उलाढाल असणार्यास उद्योगांना सूक्ष्म श्रेणी, दहा कोटी रूपये गुंतवणूक व उलाढाल 50 कोटी रूपये असणार्याय उद्योगांना लघु उद्योग श्रेणी, तर 50 कोटी गुंतवणूक व 250 कोटी उलाढाल असणार्याय उद्योगांना मध्यम उद्योग श्रेणी देण्यात आली आहे. या नवीन श्रेणीप्रमाणे उद्योगांचे वर्गीकरण करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
 

 
 
हे वर्गीकरण करताना सेवा व वस्तूंच्या निर्यातीतून होणारी उलाढाल वगळून, उलाढाल निश्चिगत करण्याच्या सूचनाही रिझर्व्ह बँकेने 02 जुलै 2020च्या त्यांच्या आदेश क्रमांक RBI /2020-2021/10 अन्वये दिल्या असून या आदेशाची अंमलबजावणी 1 जुलै 2020पासून सुरू करण्यात आली आहे.
 
आत्मनिर्भर पॅकेजेच्या घोषणेप्रमाणे नवीन निकाषांमध्ये सूक्ष्म, लघु, व मध्यम श्रेणीमध्ये नव्याने समावेश झालेल्या उद्योगांना या पॅकेजचा लाभ अद्यापही मिळत नव्हता. रिझर्व्ह बँकेच्या या आदेशामुळे या सर्व घटकांना पॅकेजचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाल्याने व्यापारी व उद्योजक या दोन्ही घटकांची वाढीव भांडवलाची गरज पूर्ण होण्यात येणार्याँ अडचणी निश्चिदतपणे दूर होतील असा विश्वाभसही गांधी यांनी व्यक्त केला.
 “

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content