Homeटॉप स्टोरी'कोकण पदवीधर'मधले 99...

‘कोकण पदवीधर’मधले 99 हजार मतदार फक्त ठाणे जिल्ह्यातले

निरंजन डावखरे यांच्यासारखा तरुण, तडफदार उमेदवार महायुतीला मिळाला आहे. गेली 12 वर्षे निरंजन यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून आपल्या सुस्वभावाने आणि सक्रिय सहभागाने सर्वांची मने जिंकली. कोकण पदवीधर मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. यामध्ये विधानसभेचे 39 मतदारसंघ समाविष्ट आहेत. या मतदारसंघात 2,25,000 लाखांचे रजिस्ट्रेशन झाले असून यातील जवळपास 99,000 मतदार केवळ ठाणे जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली.

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतले महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ तीन हात नाका, ठाणे येथे आयोजित महायुती विजय संकल्प मेळाव्यास उपस्थित राहून जमलेल्या जनसमुदायास संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत निरंजन यांच्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशनही त्यांनी केले.

ही निवडणूक ‘मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट’ अशा प्रकारच्या प्रचारातून आपल्याला लढवायची आहे. ‘फेक नॅरेटिव्ह’ दूर करून महाराष्ट्रात नवीन ‘नॅरेटिव्ह’ निर्माण करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ठाणे आणि कोकण विभागात प्रचंड यश प्राप्त झाले. काही लोकांनी अशी गर्जना केली होती की आम्ही महायुतीला तडीपार करू. परंतु कोकणने त्यांना कोकणातूनच तडीपार केले. पुन्हा एकदा कोकणचा आशीर्वाद या निवडणुकीत महायुतीलाच मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

या मेळाव्यास रवींद्र चव्हाण, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, आ. गणेश नाईक, आ. मंदा म्हात्रे, कपिल पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content