Homeटॉप स्टोरी'कोकण पदवीधर'मधले 99...

‘कोकण पदवीधर’मधले 99 हजार मतदार फक्त ठाणे जिल्ह्यातले

निरंजन डावखरे यांच्यासारखा तरुण, तडफदार उमेदवार महायुतीला मिळाला आहे. गेली 12 वर्षे निरंजन यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून आपल्या सुस्वभावाने आणि सक्रिय सहभागाने सर्वांची मने जिंकली. कोकण पदवीधर मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. यामध्ये विधानसभेचे 39 मतदारसंघ समाविष्ट आहेत. या मतदारसंघात 2,25,000 लाखांचे रजिस्ट्रेशन झाले असून यातील जवळपास 99,000 मतदार केवळ ठाणे जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली.

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतले महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ तीन हात नाका, ठाणे येथे आयोजित महायुती विजय संकल्प मेळाव्यास उपस्थित राहून जमलेल्या जनसमुदायास संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत निरंजन यांच्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशनही त्यांनी केले.

ही निवडणूक ‘मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट’ अशा प्रकारच्या प्रचारातून आपल्याला लढवायची आहे. ‘फेक नॅरेटिव्ह’ दूर करून महाराष्ट्रात नवीन ‘नॅरेटिव्ह’ निर्माण करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ठाणे आणि कोकण विभागात प्रचंड यश प्राप्त झाले. काही लोकांनी अशी गर्जना केली होती की आम्ही महायुतीला तडीपार करू. परंतु कोकणने त्यांना कोकणातूनच तडीपार केले. पुन्हा एकदा कोकणचा आशीर्वाद या निवडणुकीत महायुतीलाच मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

या मेळाव्यास रवींद्र चव्हाण, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, आ. गणेश नाईक, आ. मंदा म्हात्रे, कपिल पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

जि.प. निवडणुकीत आंबेडकर, जानकरांपाठोपाठ शेंडगेही काँग्रेसबरोबर

महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तसेच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसने आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्त्वाखालील ओबीसी बहुजन आघाडीलाही बरोबर घेतले आहे. ही...

भाजपात निष्ठावंतांकडून उचल खाण्यास सुरूवात!

गेल्या काही वर्षांपासून पक्षवाढीच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीत (भाजपा) विविध पक्षांमधून होणाऱ्या इनकमिंगमुळे मूळच्या भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाला आता वाचा फुटू लागली आहे. पक्षवाढ करताना वेगवेगळ्या पक्षांमधून कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेलेच पाहिजेत. पण त्यामुळे वर्षानुवर्षे संधीच्या आशेवर कार्यरत...

महाराष्ट्रात थंडीची लाट हळूहळू ओसरणार!

या हंगामात हवामानाचा लहरीपणा सुरूच असून देशभरासह राज्याच्या काही भागात आता नव्याने थंडीचे पुनरागमन होत आहे. राज्यात सध्या हवामानाचे संमिश्र स्वरूप अनुभवायला मिळत आहे. पहाटे आणि रात्री जाणवणारा गारवा आणि दिवसा सूर्यप्रकाशामुळे जाणवणारा उकाडा, अशा दुहेरी वातावरणाने नागरिक काहीसे...
Skip to content