Homeटॉप स्टोरी'कोकण पदवीधर'मधले 99...

‘कोकण पदवीधर’मधले 99 हजार मतदार फक्त ठाणे जिल्ह्यातले

निरंजन डावखरे यांच्यासारखा तरुण, तडफदार उमेदवार महायुतीला मिळाला आहे. गेली 12 वर्षे निरंजन यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून आपल्या सुस्वभावाने आणि सक्रिय सहभागाने सर्वांची मने जिंकली. कोकण पदवीधर मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. यामध्ये विधानसभेचे 39 मतदारसंघ समाविष्ट आहेत. या मतदारसंघात 2,25,000 लाखांचे रजिस्ट्रेशन झाले असून यातील जवळपास 99,000 मतदार केवळ ठाणे जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली.

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतले महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ तीन हात नाका, ठाणे येथे आयोजित महायुती विजय संकल्प मेळाव्यास उपस्थित राहून जमलेल्या जनसमुदायास संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत निरंजन यांच्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशनही त्यांनी केले.

ही निवडणूक ‘मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट’ अशा प्रकारच्या प्रचारातून आपल्याला लढवायची आहे. ‘फेक नॅरेटिव्ह’ दूर करून महाराष्ट्रात नवीन ‘नॅरेटिव्ह’ निर्माण करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ठाणे आणि कोकण विभागात प्रचंड यश प्राप्त झाले. काही लोकांनी अशी गर्जना केली होती की आम्ही महायुतीला तडीपार करू. परंतु कोकणने त्यांना कोकणातूनच तडीपार केले. पुन्हा एकदा कोकणचा आशीर्वाद या निवडणुकीत महायुतीलाच मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

या मेळाव्यास रवींद्र चव्हाण, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, आ. गणेश नाईक, आ. मंदा म्हात्रे, कपिल पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

आता विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांतच मिळणार एसटीचे पास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यामुळे आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी...

रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढच्या २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांसाठी महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदूर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या...

पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या परदेशवारीसाठी रवाना

पाकिस्तानवरच्या लष्करी कारवाईनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याकरीता रवाना झाले. या दौऱ्यात पंतप्रधान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांना भेटी देतील. येत्या ते 19 जूनला पंतप्रधान मोदी मायदेशी परततील. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदीस यांच्या निमंत्रणावरुन...
Skip to content