Homeचिट चॅटसीएंची ३७वी प्रादेशिक...

सीएंची ३७वी प्रादेशिक परिषद १५ डिसेंबरला मुंबईत!

वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने येत्या १५ व १६ डिसेंबरला मुंबईतल्या गोरेगाव येथील नेस्को कॉम्प्लेक्समध्ये चार्टर्ड अकाऊंटंट्सच्या (सीए) बहुप्रतीक्षित ३७व्या प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए. अर्पित काबरा यांनी नमूद केले की, ही परिषद चार्टर्ड अकाऊंटन्सीच्या क्षेत्रातील तेजस्वी विचारांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योगतज्ज्ञ यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण, नेटवर्किंग आणि सहयोगासाठी गतिशील वातावरण प्रदान करणे हे परिषदेचे उद्दिष्ट आहे.

या परिषदेत नेटवर्किंगच्या संधी आणि सहयोग यासारख्या विषयांवर चर्चा केली जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान एआय, इनोव्हेशन, व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑटोमेशनचा अनुभव, अमृत कालमधील सीए प्रोफेशन, अर्थव्यवस्थेतील वाढीचे उत्प्रेरक म्हणून महिला व्यावसायिकांची भूमिका यावरही या परिषदेत चर्चा होणार आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए. अनिकेत सुनील तलाटी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सीए. रणजीत कुमार अग्रवाल, आदी मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

Continue reading

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...

इराणवर हल्ला करण्यास अमेरिकी सेनेटची मनाई!

गेल्या जवळपास चार महिन्यांपासून पश्चिम आशियाला अशांतेच्या गर्तेत लोटणाऱ्या अमेरिका-इराण संघर्षात एक मोठी घडामोडी समोर आली आहे. १७ जून रोजी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानंतर या दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबले असले, तरी आता दोन्ही देशांमध्ये अटी आणि नियमांवरून पुन्हा एकदा...
Skip to content