Homeचिट चॅटसीएंची ३७वी प्रादेशिक...

सीएंची ३७वी प्रादेशिक परिषद १५ डिसेंबरला मुंबईत!

वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने येत्या १५ व १६ डिसेंबरला मुंबईतल्या गोरेगाव येथील नेस्को कॉम्प्लेक्समध्ये चार्टर्ड अकाऊंटंट्सच्या (सीए) बहुप्रतीक्षित ३७व्या प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए. अर्पित काबरा यांनी नमूद केले की, ही परिषद चार्टर्ड अकाऊंटन्सीच्या क्षेत्रातील तेजस्वी विचारांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योगतज्ज्ञ यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण, नेटवर्किंग आणि सहयोगासाठी गतिशील वातावरण प्रदान करणे हे परिषदेचे उद्दिष्ट आहे.

या परिषदेत नेटवर्किंगच्या संधी आणि सहयोग यासारख्या विषयांवर चर्चा केली जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान एआय, इनोव्हेशन, व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑटोमेशनचा अनुभव, अमृत कालमधील सीए प्रोफेशन, अर्थव्यवस्थेतील वाढीचे उत्प्रेरक म्हणून महिला व्यावसायिकांची भूमिका यावरही या परिषदेत चर्चा होणार आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए. अनिकेत सुनील तलाटी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सीए. रणजीत कुमार अग्रवाल, आदी मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content