Homeचिट चॅटसीएंची ३७वी प्रादेशिक...

सीएंची ३७वी प्रादेशिक परिषद १५ डिसेंबरला मुंबईत!

वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने येत्या १५ व १६ डिसेंबरला मुंबईतल्या गोरेगाव येथील नेस्को कॉम्प्लेक्समध्ये चार्टर्ड अकाऊंटंट्सच्या (सीए) बहुप्रतीक्षित ३७व्या प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए. अर्पित काबरा यांनी नमूद केले की, ही परिषद चार्टर्ड अकाऊंटन्सीच्या क्षेत्रातील तेजस्वी विचारांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योगतज्ज्ञ यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण, नेटवर्किंग आणि सहयोगासाठी गतिशील वातावरण प्रदान करणे हे परिषदेचे उद्दिष्ट आहे.

या परिषदेत नेटवर्किंगच्या संधी आणि सहयोग यासारख्या विषयांवर चर्चा केली जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान एआय, इनोव्हेशन, व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑटोमेशनचा अनुभव, अमृत कालमधील सीए प्रोफेशन, अर्थव्यवस्थेतील वाढीचे उत्प्रेरक म्हणून महिला व्यावसायिकांची भूमिका यावरही या परिषदेत चर्चा होणार आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए. अनिकेत सुनील तलाटी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सीए. रणजीत कुमार अग्रवाल, आदी मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

Continue reading

निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज!

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाचाही विपर्यास होत आहे. झाडे, नद्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग अभ्यासक श्रीरंग फडके लिखित 'रानसावल्या' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. निसर्ग...

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...
Skip to content