Homeचिट चॅटसीएंची ३७वी प्रादेशिक...

सीएंची ३७वी प्रादेशिक परिषद १५ डिसेंबरला मुंबईत!

वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने येत्या १५ व १६ डिसेंबरला मुंबईतल्या गोरेगाव येथील नेस्को कॉम्प्लेक्समध्ये चार्टर्ड अकाऊंटंट्सच्या (सीए) बहुप्रतीक्षित ३७व्या प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए. अर्पित काबरा यांनी नमूद केले की, ही परिषद चार्टर्ड अकाऊंटन्सीच्या क्षेत्रातील तेजस्वी विचारांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योगतज्ज्ञ यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण, नेटवर्किंग आणि सहयोगासाठी गतिशील वातावरण प्रदान करणे हे परिषदेचे उद्दिष्ट आहे.

या परिषदेत नेटवर्किंगच्या संधी आणि सहयोग यासारख्या विषयांवर चर्चा केली जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान एआय, इनोव्हेशन, व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑटोमेशनचा अनुभव, अमृत कालमधील सीए प्रोफेशन, अर्थव्यवस्थेतील वाढीचे उत्प्रेरक म्हणून महिला व्यावसायिकांची भूमिका यावरही या परिषदेत चर्चा होणार आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए. अनिकेत सुनील तलाटी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सीए. रणजीत कुमार अग्रवाल, आदी मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content