Homeमाय व्हॉईस३४ याचिका, ११३...

३४ याचिका, ११३ प्रतिवादी, २ लाख पाने आणि ५४ जणांचा फैसला!

शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुदत वाढवून दिल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या १० जानेवारीला यावर निकाल देणार आहेत. ३४ याचिका, ११३ प्रतिवादी, २.११ लाख पाने आणि ५४ जणांचा फैसला यावेळी होणार आहे.

वीस डिसेंबरला दोन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे सादर झाल्यानंतर हा निकाल सुनावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुदताढ देण्याचे कारण म्हणजे ३४ याचिकांची सहा गटात विभागणी करून दोन लाख ११ हजार पानांची प्रतिज्ञापत्रे, ११३ प्रतिवाद्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर ५४ आमदारांच्या संदर्भातील निर्णय त्यांना घ्यावयाचा आहे. वीस तारखेनंतर कागदपत्रे मुंबईला नेण्यासाठीच चार दिवस लागणार आहेत. त्यानंतर आधीच्या मुदतीमध्ये म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत निकाल द्यायला केवळ चार ते पाच दिवस राहत होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांची विनंती मान्य करत मुदतवाढ दिली आहे.

याचिका

त्याबद्दल समाधान व्यक्त करून नार्वेकर म्हणाले की, मागितली तितकी मुदतवाढ मिळाली नसली तरी किमान आता निकाल देणे शक्य होणार आहे. त्याप्रमाणे ते १० जानेवारीला या बहुचर्चित आणि ऐतिहासिक प्रकरणावर ते निकाल देतील.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी सार्वजनिक सुटीची मागणी

अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने त्यादिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

याचिका

माहितीच्या मुद्द्याद्वारे ही मागणी करताना सरनाईक म्हणाले की, राम मंदिराचे उद्घाटन ही घटना जगाच्या कानाकोपऱ्यात बघितली जाणार आहे आणि देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त अयोध्येत जाणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने २२ जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला सरनाईक यांच्या सूचनेची दखल घ्यावी, असे निर्देश दिले.

Continue reading

क्यालिडोस्कोपिक नारळीकर…

जयंत नारळीकर... मनःपटलासमोर हे नाव आले की माझ्या पत्रकारितेच्या पहिल्या वर्षापासून म्हणजे १९८८पासूनच्या काही आठवणी डोळ्यासमोर फेर धरू लागतात. आठवणींचे हे कोलाज मनात, डोळ्यासमोर येते आणि त्यातून आपले मन मनातल्या मनात या थोर वैज्ञानिकासमोर नतमस्तक होत आहे, हे जाणवू...

अजित पवारबरोबर राहिलात तर कल्याण होते…

महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अण्णा बनसोडे यांनी पुण्याच्या चिंचवडमध्ये पानाची टपरी चालवली आहे. पानाची टपरी चालवणारा अण्णा यांच्यासारखा कार्यकर्ता नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष ते विधानसभेचा...

आपल्याला कॉमन मॅनला सुपरमॅन करायचं आहे नानाभाऊ..

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे विधानसभेत बोलताना संसदीय भाषण न करता बहुतांशवेळा राजकीय स्वरूपाचे भाषणच करतात, हे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सव्वादोन वर्षांच्या कारकिर्दीतही दिसून आले होते. त्याची आठवण त्यांनी सोमवारी पुन्हा एकदा विधानसभेत करून दिली आणि कॉँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी...
Skip to content