HomeArchive300 म्हशींसाठी देवदूत...

300 म्हशींसाठी देवदूत ठरले आमदार प्रकाश सुर्वे

Details
300 म्हशींसाठी देवदूत ठरले आमदार प्रकाश सुर्वे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईसह पश्चिम उपनगरात गेल्या शुक्रवारी व शनिवारी दोन दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसांचा फटका जनावरांनासुद्धा बसला आहे. प्रभाग २६ लक्ष्मी नगर, बारक्या रामा कंपाऊंड येथे ५ फूट पाण्यात सुमारे 250 ते 300 म्हशी येथील तबेल्यात अडकल्या होत्या. गेल्या शुक्रवारची रात्र त्यांनी येथील तुंबलेल्या पाण्यात घालवली होती.

या घटनेची माहिती मागाठाणे येथील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पालिकेच्या आर दक्षिण विभागाला येथील पाण्याचा निचरा करण्याचे आदेश दिले. आमदार प्रकाश सुर्वे हे देवदूतासारखे धाऊन आल्याने येथील 250 ते 300 म्हशींचे जीव वाचले अशी माहिती येथील तबेलेधारकांनी दिली.

 
आमदार प्रकाश सुर्वे यांनी संपूर्ण मतदारसंघात पायपीट करत येथील साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा करण्याचे आदेश दिले. प्रशासनाने ठोस पावले उचलत येथील पाण्याचा निचरा वेळीच केल्याने येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली नाही अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. यावेळी शाखाप्रमुख विठ्ठल नलावडे, सचिन केळकर, बापूसाहेब चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पावसात अडकलेल्या मगाठाणे येथील नागरिकांना जर कोणतीही मदत लागल्यास त्यांना मदतीचा हात पुढे करत आमदार सुर्वे यांनी सुमारे दीड लाख एसएमएस आणि वॉट्सअप त्यांच्या मोबाईल क्रमांक 9821034923 सह पाठवले. तसेच सोशल मीडियाचा वापर करत त्यांनी सदर मेसेज फेसबुकवरूनसुद्धा शेअर केला असे समजते.
 
येथील खडी मशीनमधून येणारे पावसाचे पाणी नाल्यात जाते. त्यातच येथील नाला अरूंद केल्याने तो तुडूंब भरून वाहू लागतो, त्यामुळे लगतच्या लक्ष्मीनगर आणि या बारक्या रामा कंपाऊंडमधील तबेल्यात शिरते. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होते. गेल्या वर्षी अशाचप्रकारे लक्ष्मीनगरातील घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे सदर नाला लवकर रूंद करण्याचे आश्वासन आमदार सुर्वे यांनी येथील नागरिकांना दिले आहे.
 
प्रभाग ५ पांडे नगर दहिसर (पूर्व) येथे साचलेले स्वतः आमदार सुर्वे यांनी उभे राहून साफ करून घेतले. सोबत नगरसेवक संजय घाडी उपस्थित होते. प्रभाग ११ श्रीकृष्ण नगर येथील नदीची पातळी वाढल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यासाठी स्वतः उभे राहून त्यांनी येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. यावेळी विधानसभा संघटक अशोक म्हामूणकर, उपविभागप्रमुख सुनील डहाळे उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 25 येथील जानूपाडा-पांडेनगर-वैभवनगर या विभागांमधे नगरसेविका माधुरी योगेश भोईर आणि म.न.पा आधिकाऱ्यांसमवेत नाल्यांची पाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले. यावेळी सोबत शाखाप्रमुख आत्माराम कांबळी, अनिल पटेल आणि पदाधिकारी उपस्थित होते.
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईसह पश्चिम उपनगरात गेल्या शुक्रवारी व शनिवारी दोन दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसांचा फटका जनावरांनासुद्धा बसला आहे. प्रभाग २६ लक्ष्मी नगर, बारक्या रामा कंपाऊंड येथे ५ फूट पाण्यात सुमारे 250 ते 300 म्हशी येथील तबेल्यात अडकल्या होत्या. गेल्या शुक्रवारची रात्र त्यांनी येथील तुंबलेल्या पाण्यात घालवली होती.

या घटनेची माहिती मागाठाणे येथील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पालिकेच्या आर दक्षिण विभागाला येथील पाण्याचा निचरा करण्याचे आदेश दिले. आमदार प्रकाश सुर्वे हे देवदूतासारखे धाऊन आल्याने येथील 250 ते 300 म्हशींचे जीव वाचले अशी माहिती येथील तबेलेधारकांनी दिली.

 
आमदार प्रकाश सुर्वे यांनी संपूर्ण मतदारसंघात पायपीट करत येथील साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा करण्याचे आदेश दिले. प्रशासनाने ठोस पावले उचलत येथील पाण्याचा निचरा वेळीच केल्याने येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली नाही अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. यावेळी शाखाप्रमुख विठ्ठल नलावडे, सचिन केळकर, बापूसाहेब चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पावसात अडकलेल्या मगाठाणे येथील नागरिकांना जर कोणतीही मदत लागल्यास त्यांना मदतीचा हात पुढे करत आमदार सुर्वे यांनी सुमारे दीड लाख एसएमएस आणि वॉट्सअप त्यांच्या मोबाईल क्रमांक 9821034923 सह पाठवले. तसेच सोशल मीडियाचा वापर करत त्यांनी सदर मेसेज फेसबुकवरूनसुद्धा शेअर केला असे समजते.
 
येथील खडी मशीनमधून येणारे पावसाचे पाणी नाल्यात जाते. त्यातच येथील नाला अरूंद केल्याने तो तुडूंब भरून वाहू लागतो, त्यामुळे लगतच्या लक्ष्मीनगर आणि या बारक्या रामा कंपाऊंडमधील तबेल्यात शिरते. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होते. गेल्या वर्षी अशाचप्रकारे लक्ष्मीनगरातील घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे सदर नाला लवकर रूंद करण्याचे आश्वासन आमदार सुर्वे यांनी येथील नागरिकांना दिले आहे.
 
प्रभाग ५ पांडे नगर दहिसर (पूर्व) येथे साचलेले स्वतः आमदार सुर्वे यांनी उभे राहून साफ करून घेतले. सोबत नगरसेवक संजय घाडी उपस्थित होते. प्रभाग ११ श्रीकृष्ण नगर येथील नदीची पातळी वाढल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यासाठी स्वतः उभे राहून त्यांनी येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. यावेळी विधानसभा संघटक अशोक म्हामूणकर, उपविभागप्रमुख सुनील डहाळे उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 25 येथील जानूपाडा-पांडेनगर-वैभवनगर या विभागांमधे नगरसेविका माधुरी योगेश भोईर आणि म.न.पा आधिकाऱ्यांसमवेत नाल्यांची पाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले. यावेळी सोबत शाखाप्रमुख आत्माराम कांबळी, अनिल पटेल आणि पदाधिकारी उपस्थित होते.
 ”
 
 
 
 

Continue reading

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...

साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे उद्यापासून!!

पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे...
Skip to content