Homeबॅक पेजअमरावतीत मध्यरात्री माथेफिरूंनी...

अमरावतीत मध्यरात्री माथेफिरूंनी फोडल्या तीस गाड्या

अमरावती शहरामध्ये एका दुचाकीने जाणाऱ्या तीन युवकांनी रस्त्याने जाणाऱ्या तब्बल जवळपास ३० ते ३५ गाड्या फोडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस गाड्या फोडणाऱ्यांचा शोध घेत आहे. शहरात मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे पोलीसयंत्रणा संतर्क झाली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास तीन युवक पंचवटी चौकातून मोपेडने निघाले. यावेळी त्यांनी ज्या चारचाकी गाड्या दिसल्या त्यावर दगडफेक केली. लाचलचुपत प्रतिबंधक ऑफिसच्या समोरील इमारतीच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या गाड्यांनासुद्धा या माथेफिरूंनी लक्ष्य केले. हे तीनही युवक पंचवटीपासून तर तपोवन गेटच्या आत गेले. मात्र यादरम्यान ज्या काही चारचाकी गाड्या त्यांना मार्गात दिसल्या त्या त्यांनी दगड मारून फोडल्या. पंचवटी ते तपोवनपर्यंतचे सिसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content