Homeबॅक पेजअमरावतीत मध्यरात्री माथेफिरूंनी...

अमरावतीत मध्यरात्री माथेफिरूंनी फोडल्या तीस गाड्या

अमरावती शहरामध्ये एका दुचाकीने जाणाऱ्या तीन युवकांनी रस्त्याने जाणाऱ्या तब्बल जवळपास ३० ते ३५ गाड्या फोडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस गाड्या फोडणाऱ्यांचा शोध घेत आहे. शहरात मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे पोलीसयंत्रणा संतर्क झाली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास तीन युवक पंचवटी चौकातून मोपेडने निघाले. यावेळी त्यांनी ज्या चारचाकी गाड्या दिसल्या त्यावर दगडफेक केली. लाचलचुपत प्रतिबंधक ऑफिसच्या समोरील इमारतीच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या गाड्यांनासुद्धा या माथेफिरूंनी लक्ष्य केले. हे तीनही युवक पंचवटीपासून तर तपोवन गेटच्या आत गेले. मात्र यादरम्यान ज्या काही चारचाकी गाड्या त्यांना मार्गात दिसल्या त्या त्यांनी दगड मारून फोडल्या. पंचवटी ते तपोवनपर्यंतचे सिसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content