Homeबॅक पेजअमरावतीत मध्यरात्री माथेफिरूंनी...

अमरावतीत मध्यरात्री माथेफिरूंनी फोडल्या तीस गाड्या

अमरावती शहरामध्ये एका दुचाकीने जाणाऱ्या तीन युवकांनी रस्त्याने जाणाऱ्या तब्बल जवळपास ३० ते ३५ गाड्या फोडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस गाड्या फोडणाऱ्यांचा शोध घेत आहे. शहरात मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे पोलीसयंत्रणा संतर्क झाली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास तीन युवक पंचवटी चौकातून मोपेडने निघाले. यावेळी त्यांनी ज्या चारचाकी गाड्या दिसल्या त्यावर दगडफेक केली. लाचलचुपत प्रतिबंधक ऑफिसच्या समोरील इमारतीच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या गाड्यांनासुद्धा या माथेफिरूंनी लक्ष्य केले. हे तीनही युवक पंचवटीपासून तर तपोवन गेटच्या आत गेले. मात्र यादरम्यान ज्या काही चारचाकी गाड्या त्यांना मार्गात दिसल्या त्या त्यांनी दगड मारून फोडल्या. पंचवटी ते तपोवनपर्यंतचे सिसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content