Homeबॅक पेजजनरेटिव्ह एआय स्टार्टअप्ससाठी...

जनरेटिव्ह एआय स्टार्टअप्ससाठी एडब्ल्यूएसकडून २३० दशलक्ष डॉलर

ऍमेझॉन वेब सर्विसेसने (एडब्ल्यूएस) जनरेटिव्ह एआय स्टार्टअप्ससाठी २३०दशलक्ष यूएस डॉलरची घोषणा करीत ग्लोबल जनरेटिव्ह एआय एक्सेलरेटरच्या विस्ताराची नुकतीच घोषणा केली. याचे उद्दिष्ट ८० संस्थापक आणि नवोदितांना (आशिया-पॅसिफिक आणि जपान एपीजेमधील २०) स्टार्टअप्सना या क्षेत्रात आणण्याचे आहे.

त्यांच्या गरजेनुसार तांत्रिक आणि व्यावसायिक प्रोग्रामिंगद्वारे त्यांच्या वाढीला गती देणे हा यामागचा उद्देश आहे. कंपनी या प्रदेशातील जनरेटिव्ह एआय स्पॉटलाइट प्रोग्रामअंतर्गत १२० प्री-सीड आणि सीड-स्टेज रेडी स्टार्टअप्स निवडेल, ज्यापैकी ४० भारतातील असतील.

एडब्ल्यूएस इंडियाचे स्टार्टअप इकोसिस्टमचे प्रमुख अमिताभ नागपाल म्हणाले की, जनरेटिव्ह एआय व्यवसायांना नवकल्पना वाढवण्याची, उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रचंड क्षमता देते. प्रारंभिक टप्प्यातील जनरेटिव्ह एआय दोन वेगळे पूरक कार्यक्रम जे स्टार्टअप्सच्या जीवनासाठी अनुकूल आहेत. ग्लोबल जनरेटिव्ह एआय एक्सीलरेटर आणि एपीजे जनरेटिव्ह एआय स्पॉटलाइट निवडक स्टार्टअप्सना त्यांच्या प्रगतीला गती देण्यासाठी, एडब्ल्यूएस क्रेडिट्स, टूल्स आणि कौशल्ये प्रदान करण्यासाठी डिझाइन केले आहेत. आम्ही भारतातील स्टार्टअप्सना या कार्यक्रमांसाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित करतो आणि देशात जनरेटिव्ह एआयआधारित बदल घडवून आणणाऱ्या स्टार्टअपला सक्षम बनवण्याची अपेक्षा करतो.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content