Homeबॅक पेजजनरेटिव्ह एआय स्टार्टअप्ससाठी...

जनरेटिव्ह एआय स्टार्टअप्ससाठी एडब्ल्यूएसकडून २३० दशलक्ष डॉलर

ऍमेझॉन वेब सर्विसेसने (एडब्ल्यूएस) जनरेटिव्ह एआय स्टार्टअप्ससाठी २३०दशलक्ष यूएस डॉलरची घोषणा करीत ग्लोबल जनरेटिव्ह एआय एक्सेलरेटरच्या विस्ताराची नुकतीच घोषणा केली. याचे उद्दिष्ट ८० संस्थापक आणि नवोदितांना (आशिया-पॅसिफिक आणि जपान एपीजेमधील २०) स्टार्टअप्सना या क्षेत्रात आणण्याचे आहे.

त्यांच्या गरजेनुसार तांत्रिक आणि व्यावसायिक प्रोग्रामिंगद्वारे त्यांच्या वाढीला गती देणे हा यामागचा उद्देश आहे. कंपनी या प्रदेशातील जनरेटिव्ह एआय स्पॉटलाइट प्रोग्रामअंतर्गत १२० प्री-सीड आणि सीड-स्टेज रेडी स्टार्टअप्स निवडेल, ज्यापैकी ४० भारतातील असतील.

एडब्ल्यूएस इंडियाचे स्टार्टअप इकोसिस्टमचे प्रमुख अमिताभ नागपाल म्हणाले की, जनरेटिव्ह एआय व्यवसायांना नवकल्पना वाढवण्याची, उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रचंड क्षमता देते. प्रारंभिक टप्प्यातील जनरेटिव्ह एआय दोन वेगळे पूरक कार्यक्रम जे स्टार्टअप्सच्या जीवनासाठी अनुकूल आहेत. ग्लोबल जनरेटिव्ह एआय एक्सीलरेटर आणि एपीजे जनरेटिव्ह एआय स्पॉटलाइट निवडक स्टार्टअप्सना त्यांच्या प्रगतीला गती देण्यासाठी, एडब्ल्यूएस क्रेडिट्स, टूल्स आणि कौशल्ये प्रदान करण्यासाठी डिझाइन केले आहेत. आम्ही भारतातील स्टार्टअप्सना या कार्यक्रमांसाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित करतो आणि देशात जनरेटिव्ह एआयआधारित बदल घडवून आणणाऱ्या स्टार्टअपला सक्षम बनवण्याची अपेक्षा करतो.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content