Tuesday, February 4, 2025
Homeटॉप स्टोरीमुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादाने होणार...

मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादाने होणार होता 2100 कोटींचा घोटाळा?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी कोविडच्या माध्यमातून मुंबईत 5000 खाटांच्या हॉस्पिटलच्या नावाने 2100 कोटींच्या जमीन घोटाळ्याचे नियोजन केले होते. राज्य सरकारच्या मालकीची ही जमीन स्वत:च्या परिचित बिल्डरकडून 2100 कोटी रुपये देऊन विकत घ्यायची असे षडयंत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सुरू केले होते, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत केला.

23 ऑक्टोबर, 2020 रोजी डॉ. किरीट सोमैया यांनी एका पत्रकार परिषदेद्वारा ठाकरे सरकारच्या या घोटाळाचा खुलासा केला होता. मुलुंड पूर्वमधील स्वास कन्स्ट्रक्शन कंपनीची जमीन या 5000 खाटांच्या हॉस्पिटलसाठी योग्य असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या कमिटीने रिपोर्ट दिला. ही जमीन आयुक्तांनी रुपये 2100 कोटींमध्ये विकत घेण्याचे निर्देशही दिले. आयुक्तांच्या निदर्शनाखाली या कमिटीने स्वास कन्स्ट्रक्शन कंपनीची ही जमीन 5000 खाटांच्या हॉस्पिटलसाठी उचित असल्याचा रिपोर्ट व निर्णय दिला. ती जमीन घेण्याची प्रक्रियाही सुरू झाली. 5000 खाटांच्या हॉस्पिटलसाठी 2100 कोटी रुपयांची जमीन व 9500 कोटी रुपयांचे बांधकाम, हॉस्पिटलचे साहित्य व त्यासोबतचे कन्व्हेन्शन सेंटर असे मिळून एकंदर 12000 कोटी रुपयांचा प्रकल्प मुंबई महापालिका आयुक्तांनी गैरकायदेशीररित्या पुढे सरकवला, असेही ते म्हणाले.

या घोटाळ्याविरुद्ध महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॉ. सोमैयांनी 30 ऑक्टोबर, 2020 रोजी यांच्याकडे तक्रार दिली होती. राज्यपालांनी ही याचिका महाराष्ट्राच्या लोकायुक्तांकडे तपासासाठी पाठविली. आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेसचे, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हा घोटाळा थांबवण्याचे आवाहन केले होते. अशा 5000 खाटांच्या हॉस्पिटलचा निर्णय कोणाचा हे एक गूढ रहस्यच आहे. मुंबई महापालिका, आरोग्य मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय, कोविड टास्क फोर्स, नगर विकास मंत्रालय अश्या सगळ्याच विभागांनी हा निर्णय आमचा नाही, आम्ही असे हॉस्पिटल बांधण्याची शिफारस केलेली नाही असे स्पष्टपणे सांगितले. मुंबई महापालिकेने आमच्या एका माहिती अधिकार अर्जाच्या अंतर्गत कळवले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 जुलै 2020 रोजी कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत महापालिका आयुक्तांच्या “कानात” (खाजगीत) ही गोष्ट सांगितली आणि म्हणून महापालिका आयुक्तांनी सगळे नियम धाब्यावर बसून 4 दिवसांत मुलुंड येथील मुख्यमंत्र्यांच्या परिचित बिल्डरची, स्वास कन्स्ट्रक्शनची जमीन या 5000 खाटांच्या हॉस्पिटलसाठी ताब्यात घेण्याचा उपद्व्याप सुरू केला, असेही सोमैया यांनी सांगितले.

आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी 6 ऑक्टोबर 2020 रोजी राज्य सरकारचे मुख्य सचिव यांना पत्र/अहवाल सादर केला आणि 5000 खाटांचे हॉस्पिटल कसे आवश्यक आहे व त्यासाठी मुलुंड येथील स्वास कन्स्ट्रक्शन कंपनी/बिल्डरची जमीन अत्यंत योग्य आहे, तिथे हॉस्पिटल उभे करावे, त्यासाठी मुंबई महापालिकेनी सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे असे त्यात म्हटले. ठाकरे सरकारने महापालिकेचा हा अहवाल (रिपोर्ट) हातात घेऊन स्वास बिल्डरकडून जमीन विकत घेण्याची प्रक्रियाही सुरू केली. यासाठी नगरविकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जलदगतीने कार्यवाही सुरू केली. 10 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र सरकारने ही जागा संपादित करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे मदत मागितली. हा 12000 कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचे सगळे पुरावे आम्ही लोकायुक्तांना दिल्यानंतर आता 11 जानेवारी 2021 रोजी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला एक पत्र पाठवून असे कळवले आहे की, 5000 खाटांच्या हॉस्पिटलकरिता मुंबई महापालिकेकडून कोणतीही जागा निश्चित करण्यात आलेली नाही. महापालिकेने यासंदर्भात जमीन निश्चित करण्याची जी प्रक्रिया केली होती ती आता आम्ही रद्द केली आहे. आमचे याआधीचे सगळे रिपोर्ट रद्द समजावे. त्यानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्तांचा 5000 खाटांच्या हॉस्पिटलच्या नावाने 2100 कोटींच्या जमीन खरी घोटाळा बारगळला, असा दावा किरीट सोमैया यांनी केली आहे.

Continue reading

जॅकी श्रॉफ, श्वेता बच्चन आदींनी लुटला पुष्पोत्सवाचा आनंद!

मुंबई महापालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (पूर्वीच्या राणीच्या बागेत) ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पुष्पोत्सवाला साधारण दीड लाख मुंबईकरांनी भेट दिली. यामध्ये अभिनेता जॅकी...

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...
Skip to content