HomeArchiveसागर सरहदी यांचा...

सागर सरहदी यांचा `बाजार’ २४ सप्टेंबरला!

Details
सागर सरहदी यांचा `बाजार’ २४ सप्टेंबरला!

    20-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
प्रसिद्ध दिग्दर्शक सागर सरहदी यांच्या गाजलेल्या `बाजार’ या चित्रपटाचे सादरीकरण मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा रंगस्वर विभाग आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट येथे होईल. रंगस्वर आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या सदस्यांना यावेळी प्राधान्याने प्रवेश दिला जाईल.
 
 
एक अबोल, घुसमटलेली व्यथा. एका घराची, एका कुटुंबाची नव्हे, तर एका समाजाची, एका शहराचीच! ‘बाजार’ या व्यथेला वाचा देण्याचा प्रयत्न करतो. हैदराबाद संस्थान भारतीय प्रजासत्ताकात विलीन झालं. निजामी गेली, नवाबी गेली. निजामाने कुचकामी करून अजगरासारखं सुस्त बनवून ठेवलेल्या कामचुकार लोकांनी आपल्याकडे असलेली संपत्ती आळसात राहून, ऐशारामात बेजबाबदार खर्च करून संपवली आणि मग उरलेल्या पुंजीत दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत यांना पडली. हातापायाला अन् स्वभावाला कामाची सवय नाही आणि त्याचवेळी पोटालाही भुकेची सवय नाही, अशी कधी विचार न केलेली समस्या या लोकांसमोर ‘आ’ वासून उभी राहिली.
 
 
या दुर्दशेच्या गाड्याखाली भरडली गेली ती ‘स्त्री’. हे कोणे एकेकाळचे सुखवस्तू लोक नोकरी वगैरेची लाचारी करण्यापेक्षा घरच्या स्त्रीची विक्री करणे, योग्य समजू लागले. काहीवेळी तर स्वत: स्त्रियासुद्धा ‘हाच एक तरणोपाय आहे’, असं समजू लागल्या आणि स्त्री-शरीराचा एक मोठा बाजार ‘निकाह, शादी’ या प्रतिष्ठित, गोंडस नावांच्या आड सुरू झाला. कथानकाच्या केंद्रस्थानी स्मिता पाटीलची ‘नजमा’ आहे. नसीरूद्दीन शाह, सुलभा देशपांडे, सुप्रिया पाठक, फारूख शेख आदींचा अभिनय यातून पाहयला मिळतो. ‘बाजार’ची सगळ्यात मोठी ताकद आहे खय्याम यांचं संगीत.”

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“प्रसिद्ध दिग्दर्शक सागर सरहदी यांच्या गाजलेल्या `बाजार’ या चित्रपटाचे सादरीकरण मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा रंगस्वर विभाग आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट येथे होईल. रंगस्वर आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या सदस्यांना यावेळी प्राधान्याने प्रवेश दिला जाईल.”
 
 
“एक अबोल, घुसमटलेली व्यथा. एका घराची, एका कुटुंबाची नव्हे, तर एका समाजाची, एका शहराचीच! ‘बाजार’ या व्यथेला वाचा देण्याचा प्रयत्न करतो. हैदराबाद संस्थान भारतीय प्रजासत्ताकात विलीन झालं. निजामी गेली, नवाबी गेली. निजामाने कुचकामी करून अजगरासारखं सुस्त बनवून ठेवलेल्या कामचुकार लोकांनी आपल्याकडे असलेली संपत्ती आळसात राहून, ऐशारामात बेजबाबदार खर्च करून संपवली आणि मग उरलेल्या पुंजीत दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत यांना पडली. हातापायाला अन् स्वभावाला कामाची सवय नाही आणि त्याचवेळी पोटालाही भुकेची सवय नाही, अशी कधी विचार न केलेली समस्या या लोकांसमोर ‘आ’ वासून उभी राहिली.”
 
 
“या दुर्दशेच्या गाड्याखाली भरडली गेली ती ‘स्त्री’. हे कोणे एकेकाळचे सुखवस्तू लोक नोकरी वगैरेची लाचारी करण्यापेक्षा घरच्या स्त्रीची विक्री करणे, योग्य समजू लागले. काहीवेळी तर स्वत: स्त्रियासुद्धा ‘हाच एक तरणोपाय आहे’, असं समजू लागल्या आणि स्त्री-शरीराचा एक मोठा बाजार ‘निकाह, शादी’ या प्रतिष्ठित, गोंडस नावांच्या आड सुरू झाला. कथानकाच्या केंद्रस्थानी स्मिता पाटीलची ‘नजमा’ आहे. नसीरूद्दीन शाह, सुलभा देशपांडे, सुप्रिया पाठक, फारूख शेख आदींचा अभिनय यातून पाहयला मिळतो. ‘बाजार’ची सगळ्यात मोठी ताकद आहे खय्याम यांचं संगीत.”

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content