Details
“शरदराव! `कृष्ण’ नाही, निदान `मोहन’ तरी बना!”
01-Jul-2019
”
योगेश वसंत त्रिवेदी
[email protected]
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।।
धर्माला ग्लानी आली, धर्म संकटात आला तर दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करtन तो पुनर्स्थापित करण्यासाठी भगवान विष्णू पुन्हा अवतार घेईल, असे सार भगवान श्रीकृष्ण या विष्णूच्या अवताराने म्हटले आहे. महाभारत झाले आणि महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश सांगितला ती होती 18 अध्यायांची श्रीमद्भगवद्गीता. यात भगवान श्रीकृष्णाने राजकारण काय असते ते समस्त ब्रह्मांडाला दाखवून दिले. भगवान श्रीकृष्णाने राजकारण करताना धर्म, सत्य, शांती, सज्जनता, शालीनता, सौहार्द, समन्वय, सहकार्य, सौजन्य अशा तमाम सद्गुणांचे दर्शन घडविले. म्हणून भगवान श्रीकृष्ण हे आद्य राजकारणी म्हटले जातात.
भगवान श्रीकृष्णानंतर चाणक्य, कौटिल्य असे राजकारणी होऊन गेले पण 70 च्या दशकात खरा राजकारणी पाहयला मिळाला तो शरद पवार यांच्या रूपाने. तसे बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, मनोहर जोशी हेही चाणक्यच म्हणवले जात होते. पण बाळासाहेब, महाजन आज हयात नाहीत आणि मनोहर जोशी हे `आता उरलो मी केवळ मार्गदर्शनापुरता’ या भूमिकेत आहेत. पण आता सक्रीय राजकारणात चार चाणक्यांपैकी उरलेत ते केवळ आणि केवळ शरद पवार. अर्थात असे दहा शरद पवार मागे टाकून पुढे जाणारा नवा चाणक्य देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने पुढे आला आहे. देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असे दोन चाणक्य सध्या जोरात आहेत. पण आपण विचार करतोय तो 70 व्या दशकात निर्माण झालेल्या चाणक्य शरद पवार यांचा. भगवान श्रीकृष्णाने धर्म, सत्य आणि सत्कर्मासाठी राजकारण केले पण राजकीय पंडितांनी किंबहुना पवार विरोधकांनी शरदरावांच्या नावापुढे कुटील, कपटी, कावेबाज, धूर्त, मुरब्बी अशी विशेषणे लावली. पवार धूर्त आणि मुरब्बी आहेत यात वादच नाही. पण कुटील, कपटी, कावेबाज कसे?
महाराष्ट्राचे थोर सुसंस्कृत शालीन नेते यशवंतराव चव्हाण यांनी एक तरूण हुशार मुलगा राजकारणात आणला. यशवंतरावांनी आपल्या परिवारातल्या कुणासही राजकारणात आणलं नाही. पण जो मुलगा राजकारणात आणला त्याचे नाव शरद. हेच आपले शरद पवार. वयाच्या अवघ्या तिशीत शरदराव महाराष्ट्राच्या राजकारणात आले. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती आणि त्यावेळेला तरूण चंद्रशेखर, मोहन धारिया आणि कृष्णकांत या काँग्रेसी नेत्यांनी इंदिराजींना लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. पण इंदिराजींनी तो न मानता चंद्रशेखर, मोहन धारिया, कृष्णकांत यांना तुरूंगात डांबले. अनभिक्त सम्राज्ञी इंदिराजींनी 1977 च्या जानेवारीत आणीबाणी उठवून लोकसभेच्या निवडणुका घोषित केल्या आणि देशाच्या राजकीय क्षीतिजावर भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल, समाजवादी आणि संघटना काँग्रेस अशा चार पक्षांची जनता पार्टी जन्माला आली. मोहन धारिया, चंद्रशेखर कृष्णकांत हे या जनता पार्टीचे अविभाज्य भाग बनले. नव्हे केवळ भागच नाही तर जनता पार्टीचे नेतृत्त्वही चंद्रशेखर यांनी केले.
याचवेळी महाराष्ट्रात वसंतदादा पाटील आणि नाशिकराव तिरपुडे यांचे मंत्रिमंडळ होते आणि शरद पवार या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. पण राजकारणाची दिशा कशी वाहते ती कशी ओळखावी याचे बाळकडू मिळालेले शरद पवार यांनी वसंतदादांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्ष यांच्या मदतीने पुरोगामी लोकशाही दल स्थापन करुन वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी 18 जुलै 1978 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद पटकावले. त्यावेळी वृत्तपत्रात आणि राजकीय वर्तुळात, `शरद पवारांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसला’ असा वाक्प्रचार वापरण्यात आला होता. अर्थात दोन वर्षांपूर्वीच्या एका दिवाळी अंकात एक लेख प्रसिध्द झाला त्यात यशवंतराव व शरदराव यांच्या निकटवर्तीयाने शरदरावांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता तर शरद पवारांना दादांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून पुलोद स्थापन करण्यास यशवंतरावांची फूस होती, असे नमूद केले होते. आता यशवंतरावही नाहीत आणि ते लेखकही नाहीत. आहेत ते केवळ चाणक्य शरद पवार.
शरद पवारांनी काँग्रेस सोडण्याची ती काही पहिली वेळ नव्हती. यशवंतराव आणि वसंतदादाही काँग्रेसमधून बाहेर पडले होते आणि नाशिकराव तिरपुडे, रामराव आदिक, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ हे निष्ठावंत केवळ इंदिरा गांधींच्या पाठीशी होते. शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदेही काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्यांमध्ये होते. यशवंतराव चव्हाणांनी मनाचा मोठेपणा दाखवून लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर असलेले पंतप्रधानपद इंदिराजींच्या `हाती’ सुपूर्द केले अन्यथा इतिहास बदलला असता. पण पंतप्रधान न बनलेले यशवंतरराव उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. ज्या इंदिराजींच्या हाती यशवंतरावांनी पंतप्रधानपद सुपूर्द केले त्याच इंदिराजींनी यशवंतरावांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी ताटकळत ठेवले होते, हा इतिहास कोणी विसरलेले नाही आणि यशवंतरावांच्या चुका दुरूस्त करुन पुढे निघालेले त्यांचे मानसपुत्र शरदराव यांनी राजीव गांधींना औरंगाबादेत बोलवून जाहीर सभेत आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यावेळी राजीव गांधींचे हितचिंतक त्यांना सांगत होते की शरदरावांना पक्षात घेऊ नका पण राजीव गांधी यांनी मनाचा मोठेपणा दाखवीत शरदरावांना पक्षात सामावून घेतले. म्हणूनच कदाचित आता राजीव गांधींचे समर्थन राहुल, सोनिया, प्रियंकापेक्षा जास्त शरदराव करीत असावेत. तसे राजीव गांधी हे खरे अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणावे लागतील. कारण राजीव गांधी यांचा पिंड हा राजकारणी नव्हता. पण संजय गांधींच्या अपघातामुळे राजीव गांधींना इंदिराजींनी पुढे आणले (अनेक निष्ठावंत कार्यकर्ते नेते पक्षात असले तरी).
शरद पवार यांनी औरंगाबादेत काँग्रेस प्रवेश केल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर त्यांचा 25 जून 1988 रोजी राज्याभिषेक झाला. काय योगायोग पाहा आणिबाणी 25 जून 1977 ला आणली आणि त्याच्या बरोबर अकरा वर्षांनी पुन्हा दुसऱ्यांदा शरदराव मुख्यमंत्री बनले. सलग पाच वर्षे शरदराव मुख्यमंत्री कधीच राहू शकले नाहीत. जरी त्यांनी चार वेळा महाराष्ट्राचे नेतृत्त्व केले असले तरी. त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द किती काळाची होती हे पाहयला गेलो तर पहिल्यांदा 18 जुलै 1978 रोजी पुलोद सरकारचे मुख्यमंत्री झालेले शरदराव 17 फेब्रुवारी 1980 रोजी इंदिराजींच्या फटक्याने सरकार बरखास्त झाल्यामुळे पायऊतार झाले. 25 जून 1988 रोजी काँग्रेसी मुख्यमंत्री झालेले शरदराव विधानसभेच्या निवडणुकांमुळे 3 मार्च 1990 आणि 4 मार्च 1990 ते 25 जून 1995 असे या पदावर राहिले. 1962 साली पंडितजींच्या मदतीसाठी हिमालयाच्या मदतीला यशवंतरावांचा सह्याद्री धावून गेला तद्नंतरच 1991 साली पी. व्ही. नरसिंहराव यांच्यासारख्या प्रकांडपंडित पंतप्रधानांच्या संरक्षणा(मंत्री) साठी यशवंतररावांचा हा मानसपुत्र केंद्रात गेला.
सुधाकरराव नाईक महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी होते आणि शरदराव केंद्रात रक्षामंत्री होते तेव्हा 6 डिसेंबर 1992 साली बाबरी पतनानंतर देशभरात दंगली उसळल्या. सुधाकरराव नाईकांनी महाराष्ट्रात अनेकांच्या आवळलेल्या नाड्या शरदरावांना खटकत असल्यामुळे दंगल नियंत्रणात आणू शकत नसल्याचा आरोप ठेवून शरदराव महाराष्ट्रात आले. 6 मार्च 1993 रोजी ते चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले. ते काँग्रेसचेच पण अवघ्या 6 दिवसात 12 मार्च 1993 रोजी यशवंतरावांच्या जयंतीदिनी मुंबईत 12 बॉम्बस्फोट झाले. चाणक्य शरद पवारांनी 13 बॉम्बस्फोट झाल्याचे सांगून तेरावे नाव मशिदीचे टाकले. 1990 पासून शिवसेना भाजप युती फॉर्मात होती. 1995 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युती सत्तेवर आली. 45 अपक्ष आमदार, त्यात पवारविरोधाची मजबूत फळी. 14 मार्च 1993 रोजी डॉ. मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीचे सरकार आले.
महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या पक्षाने कोणता उमेदवार उभा करायचा ही कलासुध्दा शरद पवारांच्या अंगी असल्याची चर्चा राजकीय पंडितांमध्ये सुरू असे. विधान परिषदेत प्रमोद नवलकर विरोधी पक्षनेते होत असताना मखराम पवार आणि टी. एम. कांबळे या दोन आमदारांना असंलग्न घोषित करण्यात येऊन रा. सु. गवई यांना विरोधी पक्षनेतेपद शरद पवारांनी मिळवून दिले. तेव्हा शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी हे कसले विरोधी पक्षनेते? हे तर सरकारमान्य विरोधी पक्षनेते!, असे उद्गार काढले होते. लातूर किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा भूकंपावर चर्चा होत असताना विधान परिषदेत विरोधी पक्षनेते सुधीर जोशी यांनी, `पाहा शरदराव काय काय मॅनेज करू शकतात. महाराष्ट्राचा नकाशा जर पाहिला तर बारामती हा भूकंपप्रवण भाग नाही. म्हणजे जो माणूस भूकंपसुध्दा मॅनेज करू शकतो तो माणूस काय काय नाही मॅनेज करू शकणार?” असा सवाल करून पवारांची खासियत सांगितली होती. एखादा उमेदवार उभा करायचा आणि त्याच्यासमोर दुसरा उमेदवार पण आपणच टाकून अधिकृत उमेदवाराचे बारा वाजवायचे हे शरद पवारच करू शकतात, अशी चर्चा महाराष्ट्रातले राजकारणी करीत असत.
मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे? श्रेष्ठींकडे कागाळ्या करणाऱ्यांचा पत्ता कसा कापायचा, याचे तर किस्से भरपूर मिळतील पण एकदा एका नेत्याचे नाव मंत्रीपदासाठी घेतले जात होते आणि अचानक मंत्रिमंडळाच्या यादीतून ते नाव गायब झाले. विधानभवनात प्रा. मधु दंडवते यांना ते नेते भेटले आणि आपली कैफियत मांडू लागले. तेव्हा प्रा. दंडवते यांनी त्या नेत्याला विचारले की तुम्हाला शरद पवारांनी सांगितले तेव्हा त्यांनी सफारी परिधान केला होता का? तो नेता हो म्हणाला. पण विचारले, का? तेव्हा दंडवते यांनी सांगितले की, पवारांच्या सफारीला चार खिसे असतात आणि प्रत्येक खिशात वेगवेगळी यादी असते. तुम्हाला यादी दाखवली ती वेगळ्या खिशातली. दंडवते यांच्या किश्श्यावर तो नेता पाहतच राहिला. असे अनेक नेत्यांना `पाहतच’ ठेवण्याचे काम झालेले आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यावर जातीयवादी, धर्मांध असा आरोप करणाऱ्या शरदरावांनी यांची साथ अणि सोबत कुठेकुठे घेतली हे काही लपून राहिलेले नाही. 1978 साली संघ नेत्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसणारे शरद पवार वाजपेयी पंतप्रधान असताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून लाल दिव्याची गाडी घेऊन वावरत होते. 2014 साली न मागता देवेंद्र फडणवीस सरकारला पाठींबा देणे हा इतिहास सर्वश्रूतच आहे.
1999 साली सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाचा मुद्दा काढून शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारीक अन्वर यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. पण 1999 ते आजतागायत त्यांची साथ सोडलेली नाही. मग सत्ता असो की विरोध पक्ष. वांद्रे वरळी सागरी सेतूच्या उद्घाटनाला सोनिया गांधी आल्या होत्या आणि त्यांना खुश करण्यासाठी शरद पवारांनी राजीव गांधींचे नांव सागरी सेतूला सुचविले आणि याबाबतच्या ठरावाची फाईल सत्वर मंजूर करण्याचे आदेशही दिले. का? राजीव गांधींशिवाय मुंबईत कोणत्या मान्यवरांचा जन्म झाला नव्हता? की केवळ गांधी परिवाराचे प्रेम? भूखंडाचे श्रीखंडचा आरोप मृणाल गोरे यांनी सभागृहात केला आणि तेव्हा छगन भुजबळ यांनी या भूखंडाच्या श्रीखंडाचे राज ठाकरे यांनी काढलेले व्यंगचित्र सभागृहात झळकवले होते. हेच शरद पवार, मृणाल गोरे, छगन भुजबळ आणि राज ठाकरे एकत्र यावेत हीच तर पवारांची किमया.
आयुष्यभर काँग्रेसला शिव्या घालणारे नेते हातात हात घेऊन चालतात तेव्हा निष्ठा, तत्त्व हे शब्द मागे पडतात. घराणेशाहीचा आरोप कुणीही कुणावर करू शकत नाही. पण स्वतःच्या मुलांना `सांभाळण्या’साठी दुसऱ्यांना तरी कमी लेखू नका. नाही नाही म्हणता पार्थला मैदानात उतरविले. आता रोहितही उतरणार. मग रणजितसिंह मोहिते पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांनी काय घोडे मारले? राष्ट्रवादी काँग्रेसचे झुंझार नेते वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांची राज्यसभेची जागा मिळेल म्हणून त्यांच्या पत्नीने नोकरीचा राजीनामा दिला. परंतु वसंत चव्हाण यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याऐवजी आपली लाडकी लेक राज्यसभेवर पाठवली. `आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे’ अशी निदान तुमच्याकडून तरी अपेक्षा नाही. शेतकऱ्यांचे, दुष्काळाचे राजकारण करण्यापेक्षा या राष्ट्रीय आपत्तीत सरकारला योग्य सल्ले देण्यासाठी पुढे यावे, ही अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेने केली तर चुकीचे निश्चितच ठरणार नाही.
चंद्रशेखर आणि मोहन धारिया हे आपले मित्र होते. मोहन धारिया हे वादातीत व्यक्तिमत्व होते. मोहन धारिया यांनी केलेले वनराईचे काम, अमरीश पटेल यांचे शिरपूर पॅटर्न, अर्जुन खोतकर यांचे जालन्यातले काम पाहा! अशी असंख्य कामं महाराष्ट्रात झाली आहेत आणि होत आहेत. विधायक चळवळीचा इतिहास पोपटराव पवारांनीपण दाखवला आहे. सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर यांची कामे पुढे आली. मोहन धारिया यांचे वनराईचे काम आणि भंवरलाल गांधी यांच्यासारख्या खानदेशातल्या भगीरथाचे काम पाहिल्यानंतर फालतू टक्क्याटोणप्यांचे राजकारण करण्याऐवजी शरदराव! तुम्ही भगवान श्रीकृष्ण बनू शकला नाहीत पण शकुनी तरी बनू नका. निदान श्रीकृष्णाचे नामसाधर्म्य असलेले मोहन (धारिया) तरी बना. महाराष्ट्र निश्चित देशाला दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही.”
“योगेश वसंत त्रिवेदी
[email protected]
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।।
धर्माला ग्लानी आली, धर्म संकटात आला तर दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करtन तो पुनर्स्थापित करण्यासाठी भगवान विष्णू पुन्हा अवतार घेईल, असे सार भगवान श्रीकृष्ण या विष्णूच्या अवताराने म्हटले आहे. महाभारत झाले आणि महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश सांगितला ती होती 18 अध्यायांची श्रीमद्भगवद्गीता. यात भगवान श्रीकृष्णाने राजकारण काय असते ते समस्त ब्रह्मांडाला दाखवून दिले. भगवान श्रीकृष्णाने राजकारण करताना धर्म, सत्य, शांती, सज्जनता, शालीनता, सौहार्द, समन्वय, सहकार्य, सौजन्य अशा तमाम सद्गुणांचे दर्शन घडविले. म्हणून भगवान श्रीकृष्ण हे आद्य राजकारणी म्हटले जातात.
भगवान श्रीकृष्णानंतर चाणक्य, कौटिल्य असे राजकारणी होऊन गेले पण 70 च्या दशकात खरा राजकारणी पाहयला मिळाला तो शरद पवार यांच्या रूपाने. तसे बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, मनोहर जोशी हेही चाणक्यच म्हणवले जात होते. पण बाळासाहेब, महाजन आज हयात नाहीत आणि मनोहर जोशी हे `आता उरलो मी केवळ मार्गदर्शनापुरता’ या भूमिकेत आहेत. पण आता सक्रीय राजकारणात चार चाणक्यांपैकी उरलेत ते केवळ आणि केवळ शरद पवार. अर्थात असे दहा शरद पवार मागे टाकून पुढे जाणारा नवा चाणक्य देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने पुढे आला आहे. देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असे दोन चाणक्य सध्या जोरात आहेत. पण आपण विचार करतोय तो 70 व्या दशकात निर्माण झालेल्या चाणक्य शरद पवार यांचा. भगवान श्रीकृष्णाने धर्म, सत्य आणि सत्कर्मासाठी राजकारण केले पण राजकीय पंडितांनी किंबहुना पवार विरोधकांनी शरदरावांच्या नावापुढे कुटील, कपटी, कावेबाज, धूर्त, मुरब्बी अशी विशेषणे लावली. पवार धूर्त आणि मुरब्बी आहेत यात वादच नाही. पण कुटील, कपटी, कावेबाज कसे?
महाराष्ट्राचे थोर सुसंस्कृत शालीन नेते यशवंतराव चव्हाण यांनी एक तरूण हुशार मुलगा राजकारणात आणला. यशवंतरावांनी आपल्या परिवारातल्या कुणासही राजकारणात आणलं नाही. पण जो मुलगा राजकारणात आणला त्याचे नाव शरद. हेच आपले शरद पवार. वयाच्या अवघ्या तिशीत शरदराव महाराष्ट्राच्या राजकारणात आले. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती आणि त्यावेळेला तरूण चंद्रशेखर, मोहन धारिया आणि कृष्णकांत या काँग्रेसी नेत्यांनी इंदिराजींना लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. पण इंदिराजींनी तो न मानता चंद्रशेखर, मोहन धारिया, कृष्णकांत यांना तुरूंगात डांबले. अनभिक्त सम्राज्ञी इंदिराजींनी 1977 च्या जानेवारीत आणीबाणी उठवून लोकसभेच्या निवडणुका घोषित केल्या आणि देशाच्या राजकीय क्षीतिजावर भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल, समाजवादी आणि संघटना काँग्रेस अशा चार पक्षांची जनता पार्टी जन्माला आली. मोहन धारिया, चंद्रशेखर कृष्णकांत हे या जनता पार्टीचे अविभाज्य भाग बनले. नव्हे केवळ भागच नाही तर जनता पार्टीचे नेतृत्त्वही चंद्रशेखर यांनी केले.
याचवेळी महाराष्ट्रात वसंतदादा पाटील आणि नाशिकराव तिरपुडे यांचे मंत्रिमंडळ होते आणि शरद पवार या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. पण राजकारणाची दिशा कशी वाहते ती कशी ओळखावी याचे बाळकडू मिळालेले शरद पवार यांनी वसंतदादांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्ष यांच्या मदतीने पुरोगामी लोकशाही दल स्थापन करुन वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी 18 जुलै 1978 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद पटकावले. त्यावेळी वृत्तपत्रात आणि राजकीय वर्तुळात, `शरद पवारांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसला’ असा वाक्प्रचार वापरण्यात आला होता. अर्थात दोन वर्षांपूर्वीच्या एका दिवाळी अंकात एक लेख प्रसिध्द झाला त्यात यशवंतराव व शरदराव यांच्या निकटवर्तीयाने शरदरावांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता तर शरद पवारांना दादांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून पुलोद स्थापन करण्यास यशवंतरावांची फूस होती, असे नमूद केले होते. आता यशवंतरावही नाहीत आणि ते लेखकही नाहीत. आहेत ते केवळ चाणक्य शरद पवार.
शरद पवारांनी काँग्रेस सोडण्याची ती काही पहिली वेळ नव्हती. यशवंतराव आणि वसंतदादाही काँग्रेसमधून बाहेर पडले होते आणि नाशिकराव तिरपुडे, रामराव आदिक, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ हे निष्ठावंत केवळ इंदिरा गांधींच्या पाठीशी होते. शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदेही काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्यांमध्ये होते. यशवंतराव चव्हाणांनी मनाचा मोठेपणा दाखवून लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर असलेले पंतप्रधानपद इंदिराजींच्या `हाती’ सुपूर्द केले अन्यथा इतिहास बदलला असता. पण पंतप्रधान न बनलेले यशवंतरराव उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. ज्या इंदिराजींच्या हाती यशवंतरावांनी पंतप्रधानपद सुपूर्द केले त्याच इंदिराजींनी यशवंतरावांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी ताटकळत ठेवले होते, हा इतिहास कोणी विसरलेले नाही आणि यशवंतरावांच्या चुका दुरूस्त करुन पुढे निघालेले त्यांचे मानसपुत्र शरदराव यांनी राजीव गांधींना औरंगाबादेत बोलवून जाहीर सभेत आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यावेळी राजीव गांधींचे हितचिंतक त्यांना सांगत होते की शरदरावांना पक्षात घेऊ नका पण राजीव गांधी यांनी मनाचा मोठेपणा दाखवीत शरदरावांना पक्षात सामावून घेतले. म्हणूनच कदाचित आता राजीव गांधींचे समर्थन राहुल, सोनिया, प्रियंकापेक्षा जास्त शरदराव करीत असावेत. तसे राजीव गांधी हे खरे अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणावे लागतील. कारण राजीव गांधी यांचा पिंड हा राजकारणी नव्हता. पण संजय गांधींच्या अपघातामुळे राजीव गांधींना इंदिराजींनी पुढे आणले (अनेक निष्ठावंत कार्यकर्ते नेते पक्षात असले तरी).
शरद पवार यांनी औरंगाबादेत काँग्रेस प्रवेश केल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर त्यांचा 25 जून 1988 रोजी राज्याभिषेक झाला. काय योगायोग पाहा आणिबाणी 25 जून 1977 ला आणली आणि त्याच्या बरोबर अकरा वर्षांनी पुन्हा दुसऱ्यांदा शरदराव मुख्यमंत्री बनले. सलग पाच वर्षे शरदराव मुख्यमंत्री कधीच राहू शकले नाहीत. जरी त्यांनी चार वेळा महाराष्ट्राचे नेतृत्त्व केले असले तरी. त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द किती काळाची होती हे पाहयला गेलो तर पहिल्यांदा 18 जुलै 1978 रोजी पुलोद सरकारचे मुख्यमंत्री झालेले शरदराव 17 फेब्रुवारी 1980 रोजी इंदिराजींच्या फटक्याने सरकार बरखास्त झाल्यामुळे पायऊतार झाले. 25 जून 1988 रोजी काँग्रेसी मुख्यमंत्री झालेले शरदराव विधानसभेच्या निवडणुकांमुळे 3 मार्च 1990 आणि 4 मार्च 1990 ते 25 जून 1995 असे या पदावर राहिले. 1962 साली पंडितजींच्या मदतीसाठी हिमालयाच्या मदतीला यशवंतरावांचा सह्याद्री धावून गेला तद्नंतरच 1991 साली पी. व्ही. नरसिंहराव यांच्यासारख्या प्रकांडपंडित पंतप्रधानांच्या संरक्षणा(मंत्री) साठी यशवंतररावांचा हा मानसपुत्र केंद्रात गेला.
सुधाकरराव नाईक महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी होते आणि शरदराव केंद्रात रक्षामंत्री होते तेव्हा 6 डिसेंबर 1992 साली बाबरी पतनानंतर देशभरात दंगली उसळल्या. सुधाकरराव नाईकांनी महाराष्ट्रात अनेकांच्या आवळलेल्या नाड्या शरदरावांना खटकत असल्यामुळे दंगल नियंत्रणात आणू शकत नसल्याचा आरोप ठेवून शरदराव महाराष्ट्रात आले. 6 मार्च 1993 रोजी ते चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले. ते काँग्रेसचेच पण अवघ्या 6 दिवसात 12 मार्च 1993 रोजी यशवंतरावांच्या जयंतीदिनी मुंबईत 12 बॉम्बस्फोट झाले. चाणक्य शरद पवारांनी 13 बॉम्बस्फोट झाल्याचे सांगून तेरावे नाव मशिदीचे टाकले. 1990 पासून शिवसेना भाजप युती फॉर्मात होती. 1995 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युती सत्तेवर आली. 45 अपक्ष आमदार, त्यात पवारविरोधाची मजबूत फळी. 14 मार्च 1993 रोजी डॉ. मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीचे सरकार आले.
महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या पक्षाने कोणता उमेदवार उभा करायचा ही कलासुध्दा शरद पवारांच्या अंगी असल्याची चर्चा राजकीय पंडितांमध्ये सुरू असे. विधान परिषदेत प्रमोद नवलकर विरोधी पक्षनेते होत असताना मखराम पवार आणि टी. एम. कांबळे या दोन आमदारांना असंलग्न घोषित करण्यात येऊन रा. सु. गवई यांना विरोधी पक्षनेतेपद शरद पवारांनी मिळवून दिले. तेव्हा शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी हे कसले विरोधी पक्षनेते? हे तर सरकारमान्य विरोधी पक्षनेते!, असे उद्गार काढले होते. लातूर किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा भूकंपावर चर्चा होत असताना विधान परिषदेत विरोधी पक्षनेते सुधीर जोशी यांनी, `पाहा शरदराव काय काय मॅनेज करू शकतात. महाराष्ट्राचा नकाशा जर पाहिला तर बारामती हा भूकंपप्रवण भाग नाही. म्हणजे जो माणूस भूकंपसुध्दा मॅनेज करू शकतो तो माणूस काय काय नाही मॅनेज करू शकणार?” असा सवाल करून पवारांची खासियत सांगितली होती. एखादा उमेदवार उभा करायचा आणि त्याच्यासमोर दुसरा उमेदवार पण आपणच टाकून अधिकृत उमेदवाराचे बारा वाजवायचे हे शरद पवारच करू शकतात, अशी चर्चा महाराष्ट्रातले राजकारणी करीत असत.
मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे? श्रेष्ठींकडे कागाळ्या करणाऱ्यांचा पत्ता कसा कापायचा, याचे तर किस्से भरपूर मिळतील पण एकदा एका नेत्याचे नाव मंत्रीपदासाठी घेतले जात होते आणि अचानक मंत्रिमंडळाच्या यादीतून ते नाव गायब झाले. विधानभवनात प्रा. मधु दंडवते यांना ते नेते भेटले आणि आपली कैफियत मांडू लागले. तेव्हा प्रा. दंडवते यांनी त्या नेत्याला विचारले की तुम्हाला शरद पवारांनी सांगितले तेव्हा त्यांनी सफारी परिधान केला होता का? तो नेता हो म्हणाला. पण विचारले, का? तेव्हा दंडवते यांनी सांगितले की, पवारांच्या सफारीला चार खिसे असतात आणि प्रत्येक खिशात वेगवेगळी यादी असते. तुम्हाला यादी दाखवली ती वेगळ्या खिशातली. दंडवते यांच्या किश्श्यावर तो नेता पाहतच राहिला. असे अनेक नेत्यांना `पाहतच’ ठेवण्याचे काम झालेले आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यावर जातीयवादी, धर्मांध असा आरोप करणाऱ्या शरदरावांनी यांची साथ अणि सोबत कुठेकुठे घेतली हे काही लपून राहिलेले नाही. 1978 साली संघ नेत्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसणारे शरद पवार वाजपेयी पंतप्रधान असताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून लाल दिव्याची गाडी घेऊन वावरत होते. 2014 साली न मागता देवेंद्र फडणवीस सरकारला पाठींबा देणे हा इतिहास सर्वश्रूतच आहे.
1999 साली सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाचा मुद्दा काढून शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारीक अन्वर यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. पण 1999 ते आजतागायत त्यांची साथ सोडलेली नाही. मग सत्ता असो की विरोध पक्ष. वांद्रे वरळी सागरी सेतूच्या उद्घाटनाला सोनिया गांधी आल्या होत्या आणि त्यांना खुश करण्यासाठी शरद पवारांनी राजीव गांधींचे नांव सागरी सेतूला सुचविले आणि याबाबतच्या ठरावाची फाईल सत्वर मंजूर करण्याचे आदेशही दिले. का? राजीव गांधींशिवाय मुंबईत कोणत्या मान्यवरांचा जन्म झाला नव्हता? की केवळ गांधी परिवाराचे प्रेम? भूखंडाचे श्रीखंडचा आरोप मृणाल गोरे यांनी सभागृहात केला आणि तेव्हा छगन भुजबळ यांनी या भूखंडाच्या श्रीखंडाचे राज ठाकरे यांनी काढलेले व्यंगचित्र सभागृहात झळकवले होते. हेच शरद पवार, मृणाल गोरे, छगन भुजबळ आणि राज ठाकरे एकत्र यावेत हीच तर पवारांची किमया.
आयुष्यभर काँग्रेसला शिव्या घालणारे नेते हातात हात घेऊन चालतात तेव्हा निष्ठा, तत्त्व हे शब्द मागे पडतात. घराणेशाहीचा आरोप कुणीही कुणावर करू शकत नाही. पण स्वतःच्या मुलांना `सांभाळण्या’साठी दुसऱ्यांना तरी कमी लेखू नका. नाही नाही म्हणता पार्थला मैदानात उतरविले. आता रोहितही उतरणार. मग रणजितसिंह मोहिते पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांनी काय घोडे मारले? राष्ट्रवादी काँग्रेसचे झुंझार नेते वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांची राज्यसभेची जागा मिळेल म्हणून त्यांच्या पत्नीने नोकरीचा राजीनामा दिला. परंतु वसंत चव्हाण यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याऐवजी आपली लाडकी लेक राज्यसभेवर पाठवली. `आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे’ अशी निदान तुमच्याकडून तरी अपेक्षा नाही. शेतकऱ्यांचे, दुष्काळाचे राजकारण करण्यापेक्षा या राष्ट्रीय आपत्तीत सरकारला योग्य सल्ले देण्यासाठी पुढे यावे, ही अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेने केली तर चुकीचे निश्चितच ठरणार नाही.
चंद्रशेखर आणि मोहन धारिया हे आपले मित्र होते. मोहन धारिया हे वादातीत व्यक्तिमत्व होते. मोहन धारिया यांनी केलेले वनराईचे काम, अमरीश पटेल यांचे शिरपूर पॅटर्न, अर्जुन खोतकर यांचे जालन्यातले काम पाहा! अशी असंख्य कामं महाराष्ट्रात झाली आहेत आणि होत आहेत. विधायक चळवळीचा इतिहास पोपटराव पवारांनीपण दाखवला आहे. सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर यांची कामे पुढे आली. मोहन धारिया यांचे वनराईचे काम आणि भंवरलाल गांधी यांच्यासारख्या खानदेशातल्या भगीरथाचे काम पाहिल्यानंतर फालतू टक्क्याटोणप्यांचे राजकारण करण्याऐवजी शरदराव! तुम्ही भगवान श्रीकृष्ण बनू शकला नाहीत पण शकुनी तरी बनू नका. निदान श्रीकृष्णाचे नामसाधर्म्य असलेले मोहन (धारिया) तरी बना. महाराष्ट्र निश्चित देशाला दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही.”