HomeArchiveरसायनमुक्त खाद्य लढ्यासाठी...

रसायनमुक्त खाद्य लढ्यासाठी हजारो तरूणांची शिवाजी पार्कवर गर्दी

Details
रसायनमुक्त खाद्य लढ्यासाठी हजारो तरूणांची शिवाजी पार्कवर गर्दी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

आज किसानदिनानिमित्त आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि रासायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे मानवी आरोग्य कसं धोक्यात आलं आहे, याची समाजाला जाणीव करून देण्यासाठी अंबागोपाल फाऊंडेशन तसेच टाटा मेमोरीयल हॉस्पिटल यांच्या वतीने “शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर” होश किसान दौडचं आयोजन करण्यात आलं होतं.

 
सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून सुदृढ जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क येथे ‘होश वॉकेथॉन’चं आयोजन करण्यात आलं होतं. या वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या कॅन्सर पेशंट्ससह खासदार राहुल शेवाळे आणि ‘अंबागोपाल फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी.

दिवसेंदिवस शेतीमध्ये वाढत चाललेला खतांचा वाढता वापर, अन्नभेसळ, भाज्या-फळं ताजी दिसावीत किंवा लवकर पिकावीत म्हणून वापरण्यात येणारी रसायनं या सगळ्यात कुठंतरी माणूसच माणसाचा भक्षक बनत चालला आहे. या सगळ्याला कुठंतरी आळा बसावा याकरीता रविवारी सकाळी “किसान दौड” या जनजागृती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. साधारण 10 हजार लोकांनी तसंच मावळमधील शेतकऱ्यांनी उपस्थिती लावून वॉकेथॉनमध्ये सहभाग दर्शवला. यासोबतच या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून अंबागोपाल फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश शेट्टी स्वत: उपस्थित होते. त्याचबरोबर खासदार राहुल शेवाळे, टाटा मेमोरीयल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. यावेळी सिक्कीम राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यदेखील 100 टक्के सेंद्रीय शेती असलेले राज्य करू असा निर्धार हरीश शेट्टी यांनी व्यक्त केला. विषेश बाब म्हणजे यावेळी टाटा हॉस्पिटलमधील गुणवंती संघवी या कँसर पीडितेने कार्यक्रमाचे उद्घाटन करून भेसळयुक्त अन्नापासून दूर राहण्याचा संदेश दिला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

आज किसानदिनानिमित्त आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि रासायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे मानवी आरोग्य कसं धोक्यात आलं आहे, याची समाजाला जाणीव करून देण्यासाठी अंबागोपाल फाऊंडेशन तसेच टाटा मेमोरीयल हॉस्पिटल यांच्या वतीने “शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर” होश किसान दौडचं आयोजन करण्यात आलं होतं.

 
सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून सुदृढ जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क येथे ‘होश वॉकेथॉन’चं आयोजन करण्यात आलं होतं. या वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या कॅन्सर पेशंट्ससह खासदार राहुल शेवाळे आणि ‘अंबागोपाल फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी.

दिवसेंदिवस शेतीमध्ये वाढत चाललेला खतांचा वाढता वापर, अन्नभेसळ, भाज्या-फळं ताजी दिसावीत किंवा लवकर पिकावीत म्हणून वापरण्यात येणारी रसायनं या सगळ्यात कुठंतरी माणूसच माणसाचा भक्षक बनत चालला आहे. या सगळ्याला कुठंतरी आळा बसावा याकरीता रविवारी सकाळी “किसान दौड” या जनजागृती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. साधारण 10 हजार लोकांनी तसंच मावळमधील शेतकऱ्यांनी उपस्थिती लावून वॉकेथॉनमध्ये सहभाग दर्शवला. यासोबतच या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून अंबागोपाल फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश शेट्टी स्वत: उपस्थित होते. त्याचबरोबर खासदार राहुल शेवाळे, टाटा मेमोरीयल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. यावेळी सिक्कीम राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यदेखील 100 टक्के सेंद्रीय शेती असलेले राज्य करू असा निर्धार हरीश शेट्टी यांनी व्यक्त केला. विषेश बाब म्हणजे यावेळी टाटा हॉस्पिटलमधील गुणवंती संघवी या कँसर पीडितेने कार्यक्रमाचे उद्घाटन करून भेसळयुक्त अन्नापासून दूर राहण्याचा संदेश दिला.”
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content