HomeArchiveरसायनमुक्त खाद्य लढ्यासाठी...

रसायनमुक्त खाद्य लढ्यासाठी हजारो तरूणांची शिवाजी पार्कवर गर्दी

Details
रसायनमुक्त खाद्य लढ्यासाठी हजारो तरूणांची शिवाजी पार्कवर गर्दी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

आज किसानदिनानिमित्त आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि रासायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे मानवी आरोग्य कसं धोक्यात आलं आहे, याची समाजाला जाणीव करून देण्यासाठी अंबागोपाल फाऊंडेशन तसेच टाटा मेमोरीयल हॉस्पिटल यांच्या वतीने “शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर” होश किसान दौडचं आयोजन करण्यात आलं होतं.

 
सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून सुदृढ जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क येथे ‘होश वॉकेथॉन’चं आयोजन करण्यात आलं होतं. या वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या कॅन्सर पेशंट्ससह खासदार राहुल शेवाळे आणि ‘अंबागोपाल फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी.

दिवसेंदिवस शेतीमध्ये वाढत चाललेला खतांचा वाढता वापर, अन्नभेसळ, भाज्या-फळं ताजी दिसावीत किंवा लवकर पिकावीत म्हणून वापरण्यात येणारी रसायनं या सगळ्यात कुठंतरी माणूसच माणसाचा भक्षक बनत चालला आहे. या सगळ्याला कुठंतरी आळा बसावा याकरीता रविवारी सकाळी “किसान दौड” या जनजागृती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. साधारण 10 हजार लोकांनी तसंच मावळमधील शेतकऱ्यांनी उपस्थिती लावून वॉकेथॉनमध्ये सहभाग दर्शवला. यासोबतच या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून अंबागोपाल फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश शेट्टी स्वत: उपस्थित होते. त्याचबरोबर खासदार राहुल शेवाळे, टाटा मेमोरीयल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. यावेळी सिक्कीम राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यदेखील 100 टक्के सेंद्रीय शेती असलेले राज्य करू असा निर्धार हरीश शेट्टी यांनी व्यक्त केला. विषेश बाब म्हणजे यावेळी टाटा हॉस्पिटलमधील गुणवंती संघवी या कँसर पीडितेने कार्यक्रमाचे उद्घाटन करून भेसळयुक्त अन्नापासून दूर राहण्याचा संदेश दिला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

आज किसानदिनानिमित्त आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि रासायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे मानवी आरोग्य कसं धोक्यात आलं आहे, याची समाजाला जाणीव करून देण्यासाठी अंबागोपाल फाऊंडेशन तसेच टाटा मेमोरीयल हॉस्पिटल यांच्या वतीने “शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर” होश किसान दौडचं आयोजन करण्यात आलं होतं.

 
सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून सुदृढ जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क येथे ‘होश वॉकेथॉन’चं आयोजन करण्यात आलं होतं. या वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या कॅन्सर पेशंट्ससह खासदार राहुल शेवाळे आणि ‘अंबागोपाल फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी.

दिवसेंदिवस शेतीमध्ये वाढत चाललेला खतांचा वाढता वापर, अन्नभेसळ, भाज्या-फळं ताजी दिसावीत किंवा लवकर पिकावीत म्हणून वापरण्यात येणारी रसायनं या सगळ्यात कुठंतरी माणूसच माणसाचा भक्षक बनत चालला आहे. या सगळ्याला कुठंतरी आळा बसावा याकरीता रविवारी सकाळी “किसान दौड” या जनजागृती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. साधारण 10 हजार लोकांनी तसंच मावळमधील शेतकऱ्यांनी उपस्थिती लावून वॉकेथॉनमध्ये सहभाग दर्शवला. यासोबतच या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून अंबागोपाल फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश शेट्टी स्वत: उपस्थित होते. त्याचबरोबर खासदार राहुल शेवाळे, टाटा मेमोरीयल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. यावेळी सिक्कीम राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यदेखील 100 टक्के सेंद्रीय शेती असलेले राज्य करू असा निर्धार हरीश शेट्टी यांनी व्यक्त केला. विषेश बाब म्हणजे यावेळी टाटा हॉस्पिटलमधील गुणवंती संघवी या कँसर पीडितेने कार्यक्रमाचे उद्घाटन करून भेसळयुक्त अन्नापासून दूर राहण्याचा संदेश दिला.”
 

Continue reading

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...

साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे उद्यापासून!!

पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे...
Skip to content