HomeArchiveम्हाडाचे ८०० कोटी...

म्हाडाचे ८०० कोटी ३ महिन्यांत मिळणार – मधु चव्हाण

Details
म्हाडाचे ८०० कोटी ३ महिन्यांत मिळणार – मधु चव्हाण

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्य सरकारने नुकतीच २६ हजार कोटी रूपयांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नव्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वेची जमीन तत्काळ खरेदी करण्यासाठी सरकारने म्हाडाकडून ८०० कोटींची मागणी केली आहे. सरकार हा निधी तीन महिन्यांत व्याजासह परत करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.

म्हाडाकडे केलेल्या निधीच्या मागणीला कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला होता. म्हाडाकडे निधीच नसताना पैशांची मागणी करणे अयोग्य असल्याचे सांगत म्हाडातील या कर्मचारी संघटनांनी निधी देण्यास विरोध दर्शविला. मात्र सभापती मधु चव्हाण यांनी त्यांच्या दालनात म्हाडा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून राज्य सरकारला म्हाडाचे ८०० कोटी दिल्याने म्हाडा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर काहीच परिणाम होणार नाही असे स्पष्ट सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८०० कोटी व्याजासहित परत देण्याची हमी दिली असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांच्या वेतानासाठी २५ कोटी लागतात आणि म्हाडा वेतन देण्यास समर्थ आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन प्रत्यनशील असून त्यासाठी रेल्वेची जमीन घेण्यासाठी शासनाने म्हाडाकडून ८०० कोटींचा निधी मागितला आहे. हा निधी तीन महिन्यात व्याजासह म्हाडाला परत मिळणार आहे. तसेच शासनाने यापूर्वी म्हाडाकडून विविध प्रकल्पांसाठी घेतलेला निधीही गृहनिर्माण योजनांसाठीच वापरण्यात येणार आहे. म्हाडाकडे गृहनिर्माण प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेला निधी लगेचच खर्च होणार नसल्यामुळे म्हाडाची वेगवेगळ्या बँकेत असलेली अनामत रक्कम मोडण्यात येणार असून त्यासाठी बँका तयार असल्याचे ते म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्य सरकारने नुकतीच २६ हजार कोटी रूपयांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नव्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वेची जमीन तत्काळ खरेदी करण्यासाठी सरकारने म्हाडाकडून ८०० कोटींची मागणी केली आहे. सरकार हा निधी तीन महिन्यांत व्याजासह परत करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.

म्हाडाकडे केलेल्या निधीच्या मागणीला कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला होता. म्हाडाकडे निधीच नसताना पैशांची मागणी करणे अयोग्य असल्याचे सांगत म्हाडातील या कर्मचारी संघटनांनी निधी देण्यास विरोध दर्शविला. मात्र सभापती मधु चव्हाण यांनी त्यांच्या दालनात म्हाडा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून राज्य सरकारला म्हाडाचे ८०० कोटी दिल्याने म्हाडा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर काहीच परिणाम होणार नाही असे स्पष्ट सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८०० कोटी व्याजासहित परत देण्याची हमी दिली असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांच्या वेतानासाठी २५ कोटी लागतात आणि म्हाडा वेतन देण्यास समर्थ आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन प्रत्यनशील असून त्यासाठी रेल्वेची जमीन घेण्यासाठी शासनाने म्हाडाकडून ८०० कोटींचा निधी मागितला आहे. हा निधी तीन महिन्यात व्याजासह म्हाडाला परत मिळणार आहे. तसेच शासनाने यापूर्वी म्हाडाकडून विविध प्रकल्पांसाठी घेतलेला निधीही गृहनिर्माण योजनांसाठीच वापरण्यात येणार आहे. म्हाडाकडे गृहनिर्माण प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेला निधी लगेचच खर्च होणार नसल्यामुळे म्हाडाची वेगवेगळ्या बँकेत असलेली अनामत रक्कम मोडण्यात येणार असून त्यासाठी बँका तयार असल्याचे ते म्हणाले.”

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content