HomeArchiveदया पवार स्मृती...

दया पवार स्मृती पुरस्कार प्रदान!

Details
दया पवार स्मृती पुरस्कार प्रदान!

    23-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
शुक्रवारी मुंबईत मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ‘पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार २०१९’ प्रदान करण्यात आले. कवयित्री मल्लिका अमर शेख, शाहीर शीतल साठे, कथाकार मेघना पेठे यांना त्यांच्या आजपर्यंतच्या कामगिरीसाठी पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. रोख ११ हजार, शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचे पुरस्काराचे २२वे वर्ष आहे.
 
 
हिंदी साहित्यिक ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या जूठन आत्मकथनाच्या उष्टं, या मराठी अनुवादासाठी मंगेश बनसोड यांना बलुतं पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रंथाली चळवळीच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. बलुतं पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. रोख ११ हजार, पुरस्कार आणि गोधडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
 
भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आलबेल आहे, असे नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न सार्वकालीक आहे. इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य कधीच नव्हते, असे सांगत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा एकाकी द्यावा लागतो, हे अत्यंत दुख:द आहे, असे मत कथाकार मेघना पेठे यांनी यावेळी व्यक्त केले.
 
 
देशात अस्मितांचे तण माजले आहे. त्यामुळे दुखरेपणा वाढला असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जास्त घाला पडत आहे. बलुतंमधील दुख: केवळ दलित्वाचं नाही. ते अखिल मानव जातीचे आहे. म्हणूनच माझ्यासारख्या निम्न मध्यवर्गीय दलित नसलेल्या व्यक्तीस बलुतं भावले, असे सांगत दलित साहित्यातले शब्द पुढच्या पिढ्यांना समजण्याची सोय का नसावी, असा मुद्दा त्यांनी मांडला.
मराठीत बलुतं जितके महत्त्वाचे आहे, तितके जूठन हिंदीत आहे, असे सांगून मैला वाहणारे व गटार साफ करणाऱ्यांची वेदना इतरांपर्यंत पोहोचावी, अशी जूठनच्या अनुवादामागची भूमिका होती, असे मंगेश बनसोड म्हणाले.
 
 
देशात आज कलाकार व अल्पसंख्याक यांच्यासाठी परस्थिती ठिक नाही. भारतातले खरे राजकारण सांस्कृतिक असून ते कलाकार चालवतात. पण, त्यांना स्थान मात्र दिले जात नाही, असा मुद्दा शाहीर शीतल साठे यांनी मांडला.
 
 
भारतात सरकारांना आता पुस्तकाची भीती वाटू लागली आहे. याचा अर्थ समाजाची अधोगती चालू आहे, असे ज्येष्ठ पत्रकार प्रतीमा जोशी म्हणाल्या. दलित शब्दावर बंदी घालून आज दलित साहित्य व चळवळीचा वारसा पुसून टाकला जातो आहे. अशा काळात दलित चळवळीशी जोडून घेण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न असल्याचे प्रतिष्ठानच्या संयोजिक व कवयित्री प्रज्ञा दया पवार म्हणाल्या.
प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हीराबाई दया पवार यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. पुरस्कार्थीचा परिचय विणा सानेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन बाळ सराफ यांनी केले. व्यासपीठावर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रतीमा जोशी, समीक्षक डॉ. हरिश्चंद थोरात आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे होते.”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
“शुक्रवारी मुंबईत मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ‘पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार २०१९’ प्रदान करण्यात आले. कवयित्री मल्लिका अमर शेख, शाहीर शीतल साठे, कथाकार मेघना पेठे यांना त्यांच्या आजपर्यंतच्या कामगिरीसाठी पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. रोख ११ हजार, शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचे पुरस्काराचे २२वे वर्ष आहे.”
 
 
“हिंदी साहित्यिक ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या जूठन आत्मकथनाच्या उष्टं, या मराठी अनुवादासाठी मंगेश बनसोड यांना बलुतं पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रंथाली चळवळीच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. बलुतं पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. रोख ११ हजार, पुरस्कार आणि गोधडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे.”
 
 
“भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आलबेल आहे, असे नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न सार्वकालीक आहे. इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य कधीच नव्हते, असे सांगत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा एकाकी द्यावा लागतो, हे अत्यंत दुख:द आहे, असे मत कथाकार मेघना पेठे यांनी यावेळी व्यक्त केले.”
 
 
“देशात अस्मितांचे तण माजले आहे. त्यामुळे दुखरेपणा वाढला असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जास्त घाला पडत आहे. बलुतंमधील दुख: केवळ दलित्वाचं नाही. ते अखिल मानव जातीचे आहे. म्हणूनच माझ्यासारख्या निम्न मध्यवर्गीय दलित नसलेल्या व्यक्तीस बलुतं भावले, असे सांगत दलित साहित्यातले शब्द पुढच्या पिढ्यांना समजण्याची सोय का नसावी, असा मुद्दा त्यांनी मांडला.”
“मराठीत बलुतं जितके महत्त्वाचे आहे, तितके जूठन हिंदीत आहे, असे सांगून मैला वाहणारे व गटार साफ करणाऱ्यांची वेदना इतरांपर्यंत पोहोचावी, अशी जूठनच्या अनुवादामागची भूमिका होती, असे मंगेश बनसोड म्हणाले.”
 
 
“देशात आज कलाकार व अल्पसंख्याक यांच्यासाठी परस्थिती ठिक नाही. भारतातले खरे राजकारण सांस्कृतिक असून ते कलाकार चालवतात. पण, त्यांना स्थान मात्र दिले जात नाही, असा मुद्दा शाहीर शीतल साठे यांनी मांडला.”
 
 
“भारतात सरकारांना आता पुस्तकाची भीती वाटू लागली आहे. याचा अर्थ समाजाची अधोगती चालू आहे, असे ज्येष्ठ पत्रकार प्रतीमा जोशी म्हणाल्या. दलित शब्दावर बंदी घालून आज दलित साहित्य व चळवळीचा वारसा पुसून टाकला जातो आहे. अशा काळात दलित चळवळीशी जोडून घेण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न असल्याचे प्रतिष्ठानच्या संयोजिक व कवयित्री प्रज्ञा दया पवार म्हणाल्या.”
“प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हीराबाई दया पवार यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. पुरस्कार्थीचा परिचय विणा सानेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन बाळ सराफ यांनी केले. व्यासपीठावर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रतीमा जोशी, समीक्षक डॉ. हरिश्चंद थोरात आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे होते.”

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content