HomeArchiveडॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी...

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदेंचे संसदेत खासगी विधेयक

Details
डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदेंचे संसदेत खासगी विधेयक

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
डॉक्टर आणि रूग्णालयांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी अस्तित्वातील कायदे निष्प्रभ ठरत असल्यामुळे स्वतः डॉक्टर असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या कायद्याचे खासगी विधेयक मांडले.

डॉक्टर तसेच रूग्णालयांवर हल्ल्यांचे प्रकार वाढत आहेत. डॉक्टरांच्या हेतूवरच शंका घेऊन रूग्णाच्या नातलगांकडून हल्ले केले जातात. पोलीस आणि सरकार हे हल्ले रोखण्यास तसेच हल्लेखोरांना अटक करून न्यायपालिकेमार्फत त्यांना शिक्षा देण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळेच हे प्रकार वाढत असून ते रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी खासदार डॉ. शिंदे यांनी यापूर्वी लोकसभेत केली होती. मात्र, या मागणीची दखल घेतली न गेल्यामुळे शुक्रवारी खा. डॉ. शिंदे यांनी लोकसभेत याबाबतचे खासगी विधेयक मांडले. याअंतर्गत हल्लेखोरांना किमान सहा महिने ते कमाल पाच वर्षे तुरूंगवास आणि किमान पाच हजार ते कमाल पाच लाख रूपयांचा आर्थिक दंड या शिक्षेची तरतूद आहे. तसेच, हल्ल्यात स्थावर, जंगम मालमत्तेचे जे नुकसान होईल, त्याचीही वसुली हल्लेखोराकडून करण्याची तरतूद या खासगी विधेयकात आहे.

आर्थिक दंड भरण्याची क्षमता हल्लेखोरांची नसल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही विधेयकात आहे. त्याचबरोबर, उपचार करण्यापूर्वी रूग्ण आणि नातलगांना रूग्णाची सद्यस्थिती, करावे लागणारे वैद्यकीय उपचार आणि त्यासाठी राबवली जाणारी प्रक्रिया, या उपचारांचे होऊ शकणारे परिणाम, त्यातील संभाव्य धोके यांची संपूर्ण कल्पना लिखित स्वरूपात देण्याची जबाबदारी डॉक्टरांवर टाकण्यात आली आहे. या कठोर कलमांमुळे डॉक्टर अथवा रूग्णालयांवर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोर दहादा विचार करतील. हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांना शिक्षा होण्याऐवजी हल्ला होऊच नये, यादृष्टीने कायद्यात कठोर कलमांची तरतूद करण्यात आल्याचे खा. शिंदे यांनी सांगितले. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यासही या कायद्यामुळे मदत होईल, असेही त्यांनी या विधेयकात म्हटले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
डॉक्टर आणि रूग्णालयांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी अस्तित्वातील कायदे निष्प्रभ ठरत असल्यामुळे स्वतः डॉक्टर असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या कायद्याचे खासगी विधेयक मांडले.

डॉक्टर तसेच रूग्णालयांवर हल्ल्यांचे प्रकार वाढत आहेत. डॉक्टरांच्या हेतूवरच शंका घेऊन रूग्णाच्या नातलगांकडून हल्ले केले जातात. पोलीस आणि सरकार हे हल्ले रोखण्यास तसेच हल्लेखोरांना अटक करून न्यायपालिकेमार्फत त्यांना शिक्षा देण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळेच हे प्रकार वाढत असून ते रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी खासदार डॉ. शिंदे यांनी यापूर्वी लोकसभेत केली होती. मात्र, या मागणीची दखल घेतली न गेल्यामुळे शुक्रवारी खा. डॉ. शिंदे यांनी लोकसभेत याबाबतचे खासगी विधेयक मांडले. याअंतर्गत हल्लेखोरांना किमान सहा महिने ते कमाल पाच वर्षे तुरूंगवास आणि किमान पाच हजार ते कमाल पाच लाख रूपयांचा आर्थिक दंड या शिक्षेची तरतूद आहे. तसेच, हल्ल्यात स्थावर, जंगम मालमत्तेचे जे नुकसान होईल, त्याचीही वसुली हल्लेखोराकडून करण्याची तरतूद या खासगी विधेयकात आहे.

आर्थिक दंड भरण्याची क्षमता हल्लेखोरांची नसल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही विधेयकात आहे. त्याचबरोबर, उपचार करण्यापूर्वी रूग्ण आणि नातलगांना रूग्णाची सद्यस्थिती, करावे लागणारे वैद्यकीय उपचार आणि त्यासाठी राबवली जाणारी प्रक्रिया, या उपचारांचे होऊ शकणारे परिणाम, त्यातील संभाव्य धोके यांची संपूर्ण कल्पना लिखित स्वरूपात देण्याची जबाबदारी डॉक्टरांवर टाकण्यात आली आहे. या कठोर कलमांमुळे डॉक्टर अथवा रूग्णालयांवर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोर दहादा विचार करतील. हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांना शिक्षा होण्याऐवजी हल्ला होऊच नये, यादृष्टीने कायद्यात कठोर कलमांची तरतूद करण्यात आल्याचे खा. शिंदे यांनी सांगितले. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यासही या कायद्यामुळे मदत होईल, असेही त्यांनी या विधेयकात म्हटले आहे.”

Continue reading

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...
Skip to content